Siddhivinayak Mandir - Suyash Kala Krida Mandal

Siddhivinayak Mandir - Suyash Kala Krida Mandal Siddhivinayak Mandir Thane East
सुयश कला क्रीडा मंडळ

11/02/2022
02/01/2019
19/01/2017
गणपती बाप्पा मोरया
05/03/2016

गणपती बाप्पा मोरया

16/01/2016

प्रत्येक माणसामध्ये कुठलीतरी कला असणे आवश्यक आहे

अखिल भरतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचे मत

ठाणे, दि. ८ : सुरवातीलाच ठाण्यात आल्याचा आनंद व्यक्त करीत त्यांनी ठाण्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. गावावरून येताना कपड्याचा एकाच जोड होता मात्र माझ्यासोबत कला- क्रीडा आणि माझे नाटक मात्र. त्यामुळे इथपर्यंतचा पल्ला गाठू शकलो. प्रत्येक माणसामध्ये कुठलीतरी कला असणे आवश्यक आहे. असे मत शह्याण्णवाव्या अखिल भरतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केले.

सुयश कला- क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गंगाराम गवाणकर यांच्या मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण यावरिल मुलाखतीने शुक्रवार दि. ८ जानेवारी २०१५ रोजी श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण, ठाणे पूर्व येथे गुंफले गेले. जयू भटकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

मुंबईत आलो तेव्हा हुतुतूमध्ये पारंगत असल्याने मुंबईत आल्यावर एका स्पर्धेमध्ये खेळी करून मिळवलेल्या दहा रुपये बक्षिसामधून नाईट स्कूलमध्ये प्रवेश व पुस्तके घेतली होती. जिद्द आणि प्रयत्न केल्यास सर्व शक्य होते असे गवाणकर यांनी सांगितले. एकोणीसशे ऐंशी साली वस्त्रहरण आले. सुरवातीला नाटक चालत नव्हते. त्यावेळी ते पुण्यामध्ये जाऊन विसर्जित करायचे असे ठरले होते. मात्र पुण्यामध्ये नाटक लावले आणि त्या नाटकाला पु. ल. देशपांडे, त्यांच्या पत्नी अशी दहा बारा दिग्गज माणसे प्रयोगाला पहिल्या रांगेत बसली होती. यावर पु. ल. नी हे नाटक पाहण्यापेक्षा मला यात भूमिका करायला मिळाली असती तर उत्तम झाले असते असे पत्र पाठवले होते. पु. ल. च्या त्या ओळी आम्ही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केल्या आणि प्रयोग हाऊस फुल्ल होऊ लागला. चांगला प्रतीसाद मिळू लागल्यावर आत्ता आपले नाटक लंडनला घेऊन जायचे असे ठरले. मग पैसे गोळा करायचे होते. मग डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी नाटकात काम करावे अशी विचारणा केली असताना त्यांनी मी प्रमुख भूमिका करणार असे सांगितले. यामध्ये प्रमुख भूमिका कोणती हे काही कळेना. मग घाणेकरच म्हणाले अरे वस्त्रहरण दुर्योधन करणार न मग प्रमुख भूमिका तीच. मग घाणेकर वस्त्रहरणमध्ये दुर्योधन साकारणार अशी बातमी प्रसिद्ध झाल्यावर प्रयोगाला तुफान गर्दी झाल्याचे गवाणकर यांनी सांगितले. त्यानंतर लंडनला जाताना तेथील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गिरणीत, गोदीत काम करणारी बावीस माणसे लंडनला निघाली असताना विमानात घडलेल्या व लंडनमध्ये घडलेल्या अनेक गमती जमती सांगून त्यांनी रसिक प्रेक्षकांना हसवले. शेवटी आज इथे पोहचलो आहे, त्याचे श्रेय माझ्या समोर बसलेल्या रसिक मायबाप कांना प्रेक्षकांना जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, नगरसेवक गिरीश राजे, मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, कार्यवाहक सतीश सावंत आदि उपस्थित होते.

16/01/2016

समाजात बदलासाठी प्रत्येकाने निश्चय करणे महत्वाचे

सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण

ठाणे, ता. १० : समाजात बदल होण्यासाठी कुटुंबात बदल व्हावा लागेल, कुटुंबात बदल होण्यासाठी व्यक्तीत बदल होणे आवश्यक असते. या माध्यमातूनच देश बदलणे शक्य होईल. मात्र यासाठी प्रत्येकाने निश्चय करणे महत्वाचे असल्याचे मत लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले

सुयश कला- क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प लक्ष्मीनारायण यांच्या समाजातील घडामोडी यावरिल मार्गदर्शनपर व्याख्यानाने शनिवार दि. ९ जानेवारी २०१६ रोजी श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे अयोजित करण्यात आले होते.

आपण साक्षर झालो आहोत मात्र सुशिक्षित होत नाही अशी खंत व्यक्त करीत पालकांनी मुलांना चांगल्या गोष्टींचे वळण लावले पाहिजे. सर्वात आधी आपण सुरु केले पाहिजे असा सल्ला त्यांनी पालकांना दिला. एखाद्याच्या घरी जाताना मिठाई नेण्यापेक्षा पुस्तके घेऊन जावी. आपल्याकडे एलईडी आहे, महागडा स्मार्ट फोन आहे यात आनंद मानण्यापेक्षा माझ्याकडे हजारो पुस्तके आहेत असा अभिमान बाळगायला शिका असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्याकडे परीक्षेत किती मार्क मिळाले यामध्ये स्पर्धा असते. मात्र आपला मुलगा किती चांगला नागरिक झाला, त्याच्यावरचे संस्कार याविषयी कोणी विचार करत नाही. समाज सुधारण्यासाठी निर्माण होणारा चांगला नागरिक हा प्रत्येक घरातूनच तयार होत असतो. चांगला समाज निर्माण करणे हे कुटुंबाच्या हातात असते असे लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.

गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक कशी केली जाते याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी, सावधानतेसाठी ठाणे पोलिसांच्या वतीने दहा व्हिडीओ प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मीनारायण यांनी यावेळी दिली. जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी कोणालाही कार्ड किंवा पिन क्रमांक देऊ नये अशी विनंती केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी देखील आमचे बिट मार्शल कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगल्यासाठी केलेला कायदा तोडण्यात जेव्हा सामान्य नागरिकांचा सहभाग असतो त्यावेळी त्याचा सर्वात अधिक त्रास हा पोलिसांना होत असल्याचे लक्ष्मीनारायण यांनी यावेळी नमूद केले.

Address

Siddhivinayak Mandir Marg
Thane
400603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhivinayak Mandir - Suyash Kala Krida Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Siddhivinayak Mandir - Suyash Kala Krida Mandal:

Share

Category