श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक माहिती - Rupesh kumar

  • Home
  • India
  • Surat
  • श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक माहिती - Rupesh kumar

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक माहिती - Rupesh kumar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक माहिती - Rupesh kumar, Religious organisation, Surat.

llश्री स्वामी समर्थ ll*दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग अंतर्गत*    *भव्य महारोजगार मेळावा*🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🌟 *2000+ रिक्त पदांसा...
19/08/2024

llश्री स्वामी समर्थ ll
*दिंडोरी प्रणित स्वयंरोजगार विभाग अंतर्गत*
*भव्य महारोजगार मेळावा*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
🌟 *2000+ रिक्त पदांसाठी महाभरती*
🌟 *50 + अधिक कंपन्यांचा सहभाग*

⛳ बॅक ऑफिस ⛳ कॉलिटी ⛳प्रोडक्शन⛳ सुपरवायझर⛳ अकाउंट ⛳ हेल्पर ⛳ डिलिव्हरी बॉय ⛳बँकिंग⛳ अकाउंटंट⛳ डाटा एन्ट्री ⛳ टीम लीडर⛳ फील्ड सर्विसेस ⛳ रिटेल ⛳सिक्युरिटी ⛳ ई - कॉमर्स ⛳फॅसिलिटी मॅनेजमेंट ⛳सेल्स मार्केटिंग ⛳ नर्सिंग ⛳ हाऊस किपिंग ⛳कॉल सेंटर ⛳लॉजिस्टिक्स ⛳ आयटी. आय (सर्व ट्रेड)⛳

*नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्ण संधी* ❗

🔸दिनांक 04 सप्टेंबर 2024, बुधवार ,वेळ - सकाळी 10:00 ते संध्याकाळी 05:00 पर्यंत

🔷 प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन :
*गुरूपुत्र कृषीरत्न. आ.आबासाहेब मोरे*

🔸 *स्थळ - दिघी मँगझिन सेवा केद्रं , गणेश नगर कमान , भोसरी आळंदी रोड, पिन कोड 411015 , पुणे .*

🔸वय मर्यादा - 18 ते 45
🔸शैक्षणिक पात्रता - 10 पास /नापास ते ग्रॅज्युएशन व उच्च पदवीधर ( कोणत्याही शाखेतील)

Pre Register on :
🔸7755941753
Dindori pranit swayamrojgar app
Link -srg.dindoripranit.org
अधिक माहिती साठी :
9822946238
9822047671
9975082528
9881521413

01/01/2024

नविन वर्षाची सुरवात स्वामीच्या नामस्मरणाने करू सर्वांनी लिहा ॥ ब्रह्मांडनायक ॥ श्री स्वामी समर्थ ...!!

🌞🌞🌞  🌞 🌞🌞🌞 🌞  गुरुचरित्र पारायण  🌞 🛶🛶🛶🛶🛶🛶🛶मित्रांनो ! गुरूचरित्रात काय लिहिले आहे याची माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला क...
21/12/2023

🌞🌞🌞 🌞 🌞🌞🌞
🌞 गुरुचरित्र पारायण 🌞
🛶🛶🛶🛶🛶🛶🛶
मित्रांनो ! गुरूचरित्रात काय लिहिले आहे याची माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला केंव्हाही ,कुठेही आणि कुणालाही वाचता येते.! सामूहिक वाचन करणे हे सध्या बरेच ठिकाणी चालू असते.! मनाला स्थीर करण्यासाठी ! दुःखापासून काही काळ दूर रहाण्यासाठी ठीक आहे.!!
पण गुरूचरित्र पारायण करताना मात्र तुम्हाला काही पथ्ये पाळावीच लागतात.! सर्वात प्रथम देहशुद्धी,मनशुद्धी,घरात शुचिता असणे ही प्रमुख अट आहे.!!
दररोज नित्य संध्या,सूर्योपासना व घरातील देवांची नित्य पूजा करणारा
साधक हा या पारायणाचे फल निश्चित
आपल्या पदरी पाडून घेऊ शकतो.!!
गुरूचरित्र सप्ताह वाचन करत असताना
एका आसनावर स्थीर बसावे.आसन सोडून उठू नये.!कुठेही लक्ष देणे,बोलणे
वर्ज्य.! ब्रह्यचर्य पाळावे.! हविषान्न एकवेळ घ्यावे. संध्याकाळी फक्त दूध
प्यावे.!पलंग, बेड व खाटेवर झोपू नये.
भूमीशय्या तीही चटयीवर,पांढरे घोंगडे
अंथरावे.सप्ताहाच्या ७ व्या दिवशी महानैवेद्य समाराधना करण्यास हरकत नाही.!! किंवा सात दिवसाच्या व्रताचे
फल पदरात पाडून घेण्यासाठी भागवत
सप्ताहाप्रमाणे आडव्या दिवशी समाराधना करणे चांगले.!
पहिल्या दिवशी -पूर्वाभिमुख पूजा मांडणी करून शुचिर्भूत होऊन आचमन प्राणायाम करावा.! मंगलपाठ करून संकल्प करावा.! पोथी व प्रतिमेची पंचोपचार पूजा करावी पोथी वाचन सुरू करावे.!!---
गुरूचरित्रात एकूण ५२ आध्याय आहेत !!!! !!!!!
पहिल्या दिवशी १ ते ७ आध्याय.!
दुसरे दिवशी ८ ते १८ आध्याय !
तिसरे दिवशी १९ ते २८ आध्याय.!
चौथे दिवशी २९ ते ३४ आध्याय.!
पाचवे दिवशी ३५ ते ३७ आध्याय.!
सहावे दिवशी ३८ ते ४३ आध्याय.!
सातवे दिवशी ४४ ते ५२ आध्याय !
अशाप्रकारे नीट एकाग्रतेने मन लावून समजून वाचले तर याची अनूभूती येत
राहील व मी गुरूचरित्र पारायण केले!
असे खऱ्या अर्थाने जाणवेल.!!
●●●गुरूचरित्र ग्रंथ परिचय ●●●
मंगलाचरण गणपती सरस्वती,ब्रह्मा, विष्णु ,महेश , गंधर्वयक्षकिन्नर,पाराशरादी ऋषी कवि वाल्मिकी ऋषी यांना वंदन
व प्रार्थना करून" सरस्वती गंगाधर" रचित सिद्धनामधारक संवादातून हे गुरूचे चरित्र सर्वांना समजेल अशा पद्धतीने ओवीबद्ध केलेले आहे.!! श्रीनृसिंहसरस्वती उपाख्यान पहिल्या आध्यायात दिलेले आहे.!चारी वेद पुराणे याचे वर्णन-कलियुगाला ब्रह्मदेव गुरूमहिमा सांगतात.!प्रलय झाल्यावर वटपत्रावर शयन केलेल्या अव्यक्त रूपी नारायणाने (बाळकृष्ण) सृष्टीची रचना केल्याचे वर्णन.चारी युगाचे वर्णन, कलीयुगाचे लक्षण वर्णन केलेले आहे.!
"छेद करीन धर्मासी । आपण असे निरंकुशी । निरानंद परियेसीं ।। निद्रा-कलह माझे प्राण ।।परद्रव्यहारक परस्त्रीरत ।। हे दोघे माझे भ्रात । प्रपंच मत्सर दंभक ।। प्राणसखे माझे असती।।
अशारितीने दुष्ट, दांभिक,भ्रष्ट नाटकी, खोटारडे,पापकर्मी जन हे माझे स्थान आहे हे प्रत्यक्ष कली ब्रह्मदेवाला सांगतो.!
त्याचबरोबर धार्मिक, सदाचारी,धार्मिक,
पुण्यकर्मी,सत्यवचनी,एकपत्नी,
परोपकारी जन हे माझे वैरी आहेत, असेही सांगतो.!!ब्रह्मा कलीला सांगतात की, गुरूसेवक,हरिहरांचे भक्त,मातापिता सेवक,विवेकी सत्वगुणी पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना तू छळू नकोस.गुरूचे महत्त्व वर्णन करताना "पैलपुत्र"नावाचा वैदिक ब्राह्मण व त्याचा शिष्य "दीपक" याचे आख्यान वर्णन केलेले आहे..!! गुरूचे आवतार महात्म्य वर्णन करताना राजा"अंबरीश" याचे एकादशीचे व्रताची कथा, दुर्वास ऋषीनी घेतलेली परिक्षा याचे वर्णन आहे. ! अत्री ऋषीची कथा पुण्यतेज पतिव्रता "अनसूया" यापासून ब्रह्मा विष्णु महेश यांचा बालरूपी दत्तात्रय आवतार झाला.!याचे सविस्तर वर्णन केले आहे.! पीठापूर येथील विप्र"आपळराज" व त्याची भार्या "सुमती" यांना दत्तत्रयाच्या कृपेने पुत्र प्राप्ती झाली. त्यानिमित्ताने दत्तगुरूचा "श्रीपाद श्रीवल्लभ" आवतार झाला.! याचे वर्णन आहे.!! गोकर्ण महाबळेश्वर याचा महिमा वर्णन केलेला आहे. ज्यात रावणाची गणपतीची कथा उद्बोधक आहे. "गोकर्ण" स्थानाचे महात्म्य वर्णन करणारी कथा आहे.!!"स्कंदपुराणातील" ही कथा आहे.! शापभ्रष्ट महापापी चांडाळी ही शापमुक्तीसाठी गोकर्ण महाबळेश्वर येथे यात्री लोकांबरोबर गेली असता.तिच्या कडून माघ मासातील शिवरात्रीचे दिवशी अन्न पाणी मिळाले नाही म्हणून आपोआप उपवास घडला व निषिथ काली बेलपत्र पिंडीवर पडल्याने अगणित पुण्य झाले व ती शापमुक्त होऊन शिवदूताच्या आज्ञेने शिवलोकाला प्राप्त झाली.अशी कथा आहे.!प्रदोष व्रताचे महात्म्य. पुत्रप्राप्ती. तस्करवध.!
श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथा. कुरवपूर क्षेत्र महात्म्य. श्री नृसिंहसरस्वती
यांचे बाललीला वर्णन. करंजन नगरी गमन.विप्राची जठरव्याधी हरण कथा.
क्रूर यवनाला शासन तसेच सायंदेव शिष्याला वरप्रदान.तीर्थयात्रेचे निरूपण.
गुरूसेवेचे महात्म्य वर्णन. अमरापूर महिमा व भिल्लवडी स्थानाचे वर्णन.
ब्राह्मण दैन्य हरण.! औदुंबर वृक्ष महात्म्य. योगिनी सद्गुरु दर्शन घेण्यासाठी प्रतिदिन येतात याचे वर्णन.
ब्रह्मसमंध परिहार. पुत्रप्रेत घेऊन शोक करणाऱ्या जननीच्या पुत्राला जीवदान. वंध्यत्व असलेल्या म्हशीला दुग्ध दोहन.
ब्रह्मराक्षस मुक्ती.!त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन घडविले.वेदांचे सविस्तर वर्णन.मदोन्मत्त विप्राला शाप !! भस्ममहिमा वर्णन." पतिव्रताधर्म' निरूपण.मृत ब्राह्मण जिवंत केला.!
रुद्राक्ष महिमा वर्णन. रुद्राध्याय महात्म्य वर्णन.!सिमंतिनी आख्यान. नित्य धार्मिक आचार विचार व कर्ममार्गाचे
निरुपण.!एकाच वेळी एकाच पाकातून
असंख्य जनाना नगरभोजन.वृद्ध व वंध्यत्व असणाऱ्या स्त्रीला कन्या पुत्र
प्राप्ती.!शुष्क काडीला पाने फुले आणली.! काशीयात्रेचे वर्णन. त्वष्ट
पुत्राचे आख्यान.!सायंदेवाला इच्छित वरप्राप्ती.!अनंतव्रत महामा !श्री शैल्य
शिवरात्री वर्णन.!द्विज कुष्टरोग निवारण.
नरहरी कविश्वराला वरप्रदान.!एकाच वेळी आठही शिष्यांच्या घरी आठ रूपाने
जाणे.!शूद्राला वरप्रदान !अमरजा संगमी
गंधर्वपुर तीर्थमहिमा वर्णन.!!गुरूगीता !!
व शेवटी सद्गुरूचे निजानंद गमन.!!
■■■■■■■■■■■■■■
गुरूचरित्र पारायण करायचे असेल तर
आत्मशुद्धी करताना. आदले दिवशी कमीतकमी १०८ दीर्घ प्राणायाम व ५००० गायत्रीमंत्र जप करावा.!!
(१)-शक्यतो शनिवारी सुरू करून शुक्रवारी समाप्ती करावी.!शुक्रवार हा
श्रीनृसिंहसरस्वती यांचा निजानंदकालाचा
दिवस आहे.!हे सातही दिवस प्रातःकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोषारती, व रात्री शेजारती करावी.!
(२)- अखंड तेलाचा दिवा लावावा. तसेच रोजचे वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवा लावावा.!वाचन संपल्यानंतर पोथीची पूजा करताना शक्यतो शमीपत्रे
वहावी.महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची
भाजी असावी.!उर्वरित दिवस भजन
कीर्तन अभंग गायन करावे.!
(३)-"दत्तजयंती" दिवशी सातवा दिवस येत असेल तर त्या दिवशी उपवास करून आठवे दिवशी समाप्ती करावी.
दांपत्य भोजन द्यावे. व धार्मिक सत्शील
ब्राह्मण शोधून त्याला योग्य ती दक्षिणा
द्यावी. आँनलाइन दिली तरी चालेल.!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
संकल्प विषयक माहिती ग्रंथात दिलेली
असते.!!!!
श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती कृत तीन संस्कृत श्लोकाचे मंत्र नेहमी पठण करावे.!!
●● सौभाग्यवर्धक श्लोक ●●
(१)--जीवयामास भर्तारं, मृतं सत्या हि मृत्युहा । मृत्युंजयः स योगिन्द्रः,सौभाग्यं मे प्रयच्छतु ।।१।।
[ सतीचा पति मृत झाला असता त्याला ज्याने जिवंत केले तो मृत्युनाशक मृत्युंजय दत्तयोगिन्द्र मला सौभाग्य देवो.]
●● संततिवर्धक श्लोक ●●
(२)--दूरीकृत्य पिशाचार्ति जीवयित्वा मृतं सुतम् । यो$भूदभीष्टदः सिद्धः स नः संततिवृद्धिकृत ।।२।।
[साध्वीची पिशाच्च पीडा दूर करून व तिच्या मेलेल्या पुत्रास जिवंत करून जो
अभिष्ट फल देता झाला तो दत्त आमची
संतति वृद्धी करणारा होवो.]
●● संपत्तीवर्धक श्लोक ●●
(३)--दरिद्रविप्रगेहे यः शाकं भुक्त्वोत्तमश्रियम् । ददौ श्रीद्त्तदेवः स
दारिद्र्याच्छिप्रदो$वतु.।।३।।
[दरिद्री विप्राच्या घरामध्ये घेवड्याची शाक खाऊन त्याला ज्याने उत्तम संपत्ती
दिली असा तो भाग्यदाता श्रीदत्तदेव आमचे दारिद्र्यापासून रक्षण करो.]
मित्रांनो हे सर्व नीट वाचून घ्या !
गुरुचरित्र पारायण करणे सोपे नाही
योग्य पथ्यपाणी होत असेल व मनाची एकाग्रता असेल तरच गुरूची भक्ती
साध्य होते व गुरूची कृपा होते.!!!!
श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दत्तात्रय गुरू देवताभ्यो नमः।।
♂ श्रीदत्तार्पणाय मस्तु ♂

20/12/2023

श्री स्वामी समर्थ
आज पासून सुरू होणारे गुरूचरित्र पारायण सोहळा सगळ्यांचे मनापासुन स्वागत
पुस्तकात जे नियम दिले ते काटेकोर पणे पाळणे
परान्न वर्ज्य
ब्रम्हचर्य पालन
कांदा लसूण वर्ज्य
जमीनीवर झोपणे
अंत्यविधी वैगैरे बाहेरगावी न जाणे
काळे कपडे परिधान न करणे
गुरूचरित्र काळात कटू वचन न बोलणे (इतरवेळी पण बोलू नये)
केस सोडून बसू नये कुंकू लावणे
किमान दोन दोन बांगड्या घालते
नवीन सेवेकरी असतील त्यांनी जवळच्या केंद्रात/आम्हाला कोणालाही फोन करणे व शंका समाधान करणे
आपल्या मनाने चुकीचे नियम पाळून नयेत
गुरूचरित्र म्हणजे भाव भक्ती शक्ती आणि गुरूच्या महतीची प्रचिती आहे
आपण एकटे पारायण करत नाही आहोत सामुदायिक पारायण सोहळा आहे तर सगळ्यांनी आपल्या कडून कुठलीही चुक होणार नाही ही काळजी घेणे जर पुण्य सामुदायिक पणे लाभते तसं पाप आपल्या माथी घेऊ नये
आपण सगळे नियम पाळू शकतो त्यांनी गुरूचरित्र पारायण सोहळ्यात सहभागी असावे
विष्णू सहस्त्रनाम रात्री ठीक 8.30मिनिटयांनी असेल
सुतक वृध्दी काही अडचण आहे त्यांनी सहभागी होऊ नये

जिथे सगळं असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ ❤️
07/11/2023

जिथे सगळं असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ ❤️

गुरुचरित्रात अप्रत्यक्ष पापांपासून गुरुमहाराजांनी उद्धार केल्याची कैक उदाहरणे आहेत . आता अप्रत्यक्ष पाप म्हणजे आपल्या अज...
09/10/2023

गुरुचरित्रात अप्रत्यक्ष पापांपासून गुरुमहाराजांनी उद्धार केल्याची कैक उदाहरणे आहेत . आता अप्रत्यक्ष पाप म्हणजे आपल्या अज्ञानात घडलेले पाप . अर्थात काहीही म्हटले तरी पाप ते पापच . ते मग प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष .. याचे उदाहरण पाहू गेल्यास ----
बाविसाव्या अध्यायात गुरुमहाराज एका अत्यंत गरीब अशा ब्राह्मणाघरी भिक्षेला गेले . गृहस्वामिनीने यथोचित आदरसत्कार करून म्हटले यजमान भिक्षेसाठी गेले आहेत तेव्हा ते येताच आपणास वाढते . यावर गुरुमहाराज म्हणाले ,दारात म्हैस आहे तेव्हा तिचे दूध दिल्यास पुरेसे होईल . गृहस्वामिनी म्हणाली ,ती दंतहीन वृद्ध वांझ म्हैस असून तिचा उपयोग आम्ही मृत्तिका वाहून नेण्याकरिता करतो . आज कोणी तिला मृत्तिकेसाठी नेण्यास न आल्याने ती येथे दिसत आहे .
यावर गुरुमहाराजांनी तिचे दूध काढून देण्यास सांगितले आणि गुरुवाक्यावर विश्वास ठेवत त्या स्त्रीने दूध काढले . दोन भांडी भरून दूध आले . त्या स्त्रीने अत्यंत आश्चर्याने आणि आनंदाने ते दूध तापविले आणि गुरुमहाराजांना पिण्यास दिले . प्रसन्न होऊन संतोषाने गुरुमहाराज आशीर्वाद देऊन निघून गेले ,
आता यात अप्रत्यक्ष पाप म्हणजे वृद्ध अशा जनावराकडून केलेल्या श्रमावर उपजीविका . दोन्ही बाजूंनी गुरुमहाराजांनी कल्याण केले ,त्या प्राण्याला होणाऱ्या कष्टापासून सोडवले आणि उद्धार केला . गुरुमहाराजांचे दर्शन कोणत्याही जन्मात होवो ,सद्गती निश्चित आहे आणि ब्राह्मणाकडून होत असलेले अप्रत्यक्ष पाप दूर केले .खेरीज दारिद्र्य दोष घालविले . गुरुमहाराज केवळ ऐहिक भोग देत नाहीत तर उद्धारात येणारे पापरूपी अडथळे नाहीसे करतात श्री गुरुदेव दत्त !!! -

श्री शिवाय नमस्तुभ्यं🙏🕉️🍀🙏🕉️🍀🙏🕉️🍀🙏🕉️🍀🙏***********       ।।बेलाच्या झाडाचे महत्त्व।।***********बेल या वनस्पतीचे जेवढे अध्...
29/08/2023

श्री शिवाय नमस्तुभ्यं
🙏🕉️🍀🙏🕉️🍀🙏🕉️🍀🙏🕉️🍀🙏

***********
।।बेलाच्या झाडाचे महत्त्व।।
***********
बेल या वनस्पतीचे जेवढे अध्यात्मिक महत्त्व आहे. तेवढेच आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.
१) बेलाच्या पानाचा 30ml रस रोज सकाळी उपाशीपोटी पिल्याने मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो.

२) बेलाच्या पानाचा दोन दोन थेंब रस डोळ्यांमध्ये टाकल्याने डोळ्याचे विकार दूर होतात.

३)ज्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता असते अशा लोकांनी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची तीन-चार पाने चावून खावीत.

४) दहा-पंधरा बेलाची पाने चेचून एक कप तिळाचे तेल गरम करून घ्यावेत हे तेल कानामध्ये टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात.

५) बेलाच्या पानाचा रस पिल्याने किडनी व यकृताच्या समस्या दूर होतात.

६) कच्चा बेलफळाचा रस पिल्याने पोटाच्या समस्या जसे पोटामध्ये मुरडा येणे पोट दुखणे आतड्यावर सूज असणे अल्सरेटिव कोलाइटिस यासारख्या समस्या दूर होतात.

७) बेल पानाचा रस 30 ते 40 ml सकाळी उपाशीपोटी पिल्याने हृदयाच्या सर्व समस्या निघून जातात व त्याचे कार्य सुधारते.

८) बेलफळ हे शरीरातील उष्णता नष्ट करण्यासाठी खूप गुणकारी आहे.

९) बेल पानाचा रस नियमित पिल्याणे शरीरामध्ये रक्त वाढ होते. व कॅन्सरसारख्या आजारापासून शरीराचे रक्षण करते.

१०) सात ते आठ बेलपान चा एक कप काढा बनवून सकाळी उपाशीपोटी पील्याने शरीरामधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रनात ठेवते.

११) बेलाच्या पानाचा रस ४-५ चमचे सकाळी उपाशीपोटी पिल्याने अपचन गॅसेस मलावरोध यासारख्या समस्या त्वरित नष्ट होतात.

१२)थायरॉईड या आजारावर आठ ते दहा बेलाच्या पानाचा काढा सकाळी उपाशीपोटी घ्यावे.

१३) वारंवार ताप येणे खोकला येणे या आजारावर बेलाच्या पानाचा दोन चमचे रस सकाळी संध्याकाळी प्यावे.

बेल या वनस्पतीचे पानाचे फळाचे सालीचे मुळीचे अध्यात्म मध्ये वेगवेगळे फायदे आहेत.
आरोग्य मध्येही खूप गुणकारी फायदे आहेत.
या वनस्पतीचे संवर्धन केले पाहिजे संगोपन केले पाहिजे.आपले आजार नष्ट करण्यासाठी निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी वापर करावा.
...निरोगी राहा .आनंदि रहा.

12/07/2023

सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीला आलेला
स्वामी अनुभव...
श्री स्वामी समर्थ 🌼🌺🙏🏻

श्रीगुरू पौर्णिमा माहितीदिनांक ०३/०७/२०२३ रोजी सोमवारी आषाढ शुक्ल श्रीगुरूपौर्णिमा आहे....आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त कर...
03/07/2023

श्रीगुरू पौर्णिमा माहिती

दिनांक ०३/०७/२०२३ रोजी सोमवारी आषाढ शुक्ल श्रीगुरूपौर्णिमा आहे....

आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हिंदु धर्मांतमहर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. म्हणुनच गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.

॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
गुरु साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥

या श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे.

आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत. मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू.
अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.
खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.
सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्य दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.

सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।
इतरांची लेखा कोण करी ॥

किंवा

सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ।
धरावे जे पाय आधी आधी ॥
ही आपल्या मनावर केलेली खोल नोंदणी आहे. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत.

उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, श्रीगुरु श्रीपाद वल्लभ, श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज, श्रीगुरु स्वामी समर्थ महाराज,मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ......

ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे. नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना केलेत नमन. त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती.
असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते.
त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याच उदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.
गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी.

महर्षी व्यास ह्यांना जगद्गुरू मानतात. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात.

गुरूला अनन्य भावे शरण जाणाऱ्या. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की..

सद्गुरू साईखा असता पाठीसारखा ।
इतरांची लेखा, कोण करी ।

गुरूपौर्णिमेच्या दिवशी काय करावे?

१. यादिवशी केवळ गुरूच (शिक्षकच) नाही, तर आई-वडिल, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे.

२. यादिवशी वस्त्र, फळ, फुले व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. कारण गुरूचा आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो.

३. व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास-मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे.

४. हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरूप्रती दाखविलेला विश्वास, आदर आहे.

Tarak Mantra: श्री स्वामी समर्थांच्या 'या' मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख    कथाएकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोग...
20/06/2023

Tarak Mantra: श्री स्वामी समर्थांच्या 'या' मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख कथा
एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यु होईल. संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल ?संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली ?लहान मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले खरं आहे, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमवा, आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दान धर्म केल्यानंतरचं मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही.वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्‍न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते.वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते.आपल्या यातना दूर करायच्या असतील, आपल्या मनातली घालमेल दूर करायची असेल आणि समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारकमंत्राचे पठण करूया.

तारकमंत्राचे पठण

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य
अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविणा
काळही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी.

उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे
जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा, अशक्यही शक्य करतील स्वामी.

खरा होई जागा श्रद्धेस हित कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त आठव कितीदा
दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्यही शक्य करतील स्वामी.

विभूती नमननाम ध्यानादी तिर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तिर्थ घेई
आठवी रे प्रचिती न सोडती तयाजया स्वामी घेई हाती अशक्यही शक्य करतील स्वामी.

श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू

🚩 ll श्री स्वामी समर्थ ll🙏🙏   आपण सर्वच श्रद्धावान स्वामीवेडे आहोत याबद्दल तिळमात्र शंका नाही....आयुष्यात येणार्‍या अनेक...
25/04/2023

🚩 ll श्री स्वामी समर्थ ll🙏🙏

आपण सर्वच श्रद्धावान स्वामीवेडे आहोत याबद्दल तिळमात्र शंका नाही....आयुष्यात येणार्‍या अनेक लहान सहान संकटाना तोंड देत असताना आपण नेहमीच स्वामींचा धावा करतो आणि प्रत्येक वेळेला ते न थकता येतात....
पण समजा कधी असे झाले तर........
आपण फार अडचणीत आहोत आणि आपण स्वामींचा धावा केला आणि स्वामी बोलले...

1️⃣ आज नाही जमणार रे यायला....
2️⃣ आज पाहुणे आलेत घरी....
3️⃣ बाहेर गेलो होतो यायला उशीर होईल...
4️⃣ आज गर्दी आहे दवाखान्यात त्यामुळे नाही येऊ शकत...
5️⃣ आज भरपूर काम होते थकलोय....
6️⃣ अंतर लांब आहे त्यामुळे नेहमीच यायला नाही जमत रे.....
7️⃣ घरी परत जाताना अंधार होतो...

अशी उत्तरे देऊन आपल्या संकट काळात स्वामी नाही आले तर....अश्या वेळेला काय होईल याची कल्पनाही करवत नाही ना.....
पण अशी कुठलीही कारणे न देता मी हाक मारताच स्वामी मला भेटायला येतातच...
मग स्वामींनी हाक मारल्यावर मलाही कारण न देता जाता आलं पाहिजे...

प्रत्येक आरतीला, असो किंवा ग्राम अभियान व इतर केंद्राचे कामकाज केंद्रात स्वामी येतात म्हणजे येतातचं...म्हणजे मलाही कुठलं ही कारणे अथवा सबब न सांगता केंद्रात गेलच पाहिजे.

✨☝🏻☺️धरा स्वामींचे चरण....
✨आयुष्य होईल सुखाचे कारण....

🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏

श्री जनकल्याण योजनेचे महत्वआपण दिलेलं छोटेसे दान हे थेट आशिया खंडातील सर्वात मोठे असे अध्यात्मिक सद्गुरू प.पु मोरेदादा च...
19/04/2023

श्री जनकल्याण योजनेचे महत्व

आपण दिलेलं छोटेसे दान हे थेट आशिया खंडातील सर्वात मोठे असे अध्यात्मिक सद्गुरू प.पु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी जात असून येथे रुग्णांना मोफत-माफक सेवा तुमच्या आमच्या छोट्याश्या देणगीतून होणार आहे.

सद्गुरू प.पु.मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये निर्माण होणार आहे. जिथे येणाऱ्या भाविक सेवेकर्यांना "दवा आणि दुवा" ह्याचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

आपणांस खालील पुण्य मिळते:

1) एखाद्याला जीवनदान
2) अन्नदान
3) ज्ञानदान
4) एखाद्याला रोजगार मिळून त्याच्या घरी चूल पेटणार
5) " सर्वात महत्वाचे म्हणजे भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करता स्वामी स्वरूप त्रिकालज्ञानी प.पु गुरुमाऊलींचा दान देणाऱ्या कुटुंबास आयुष्यात कधीही कुठल्याच हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही असा दिव्य आशीर्वाद मिळणार आहे".

जनकल्याण योजना रूपयांचं दान का गरजेचं आहे?

◆ वेद, शास्त्रे व अठरा पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे.

"गुरु कारण आणि गुरू तारण पण ते केव्हा? जेव्हा (गुरूचरित्र अध्याय ४८) शेतकरी आणि बसप्पा सारखे भक्त गुरू वाक्य मज कामधेनू असे मानुन गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी ऐकतात."

मग जर गुरू आपल्याला सांगतात त्याला आपण किती प्रतिसाद देतो?

जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सद्गुरू मोरे दादा हॉस्पिटल हे गरीब व गरजू लोकांसाठी मोफत व माफक दरात उपचार देवून जिवनदान देणार आहे. तसेच अन्नदान, रोजगार निर्मिती, विद्यादान सुद्धा होणार आहे. आपल्या कष्टाच्या एका रूपयातून अशा अक्षय स्वरूपाचं पुण्य कमावण्याची संधी गुरूंनी आपल्याला दिली आहे.

चला तर मग आपण जनकल्याण योजनेत सहभागी व्हा व इतरांना सहभागी करून घ्या.

आपण आपली देणगी कमीत कमी 151 रुपये करू शकता,काही शंका असल्यास कॉल करून विचारू ही शकता.

Link

http://www.dindoripranit.org/jankalyan-yojna

अधिक माहितीसाठी संपर्क-🪀9156563272./📱-7498004046

श्री स्वामी समर्थ

Address

Surat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक माहिती - Rupesh kumar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक माहिती - Rupesh kumar:

Share