श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर

  • Home
  • India
  • Raichur
  • श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर

श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर श्री क्षेत्र कुरवपुर येणाऱ्या भक्तांसाठी नाम-मात्र दरात निवास व मोफत भोजन व्यवस्था संपर्क 08762440232

*"अधिक मास महात्म्य कथासार अध्याय :  १४"**"अंबरीष राजाची कथा"*भगवान म्हणाले, "लक्ष्मी, दुर्वास ऋषींनी देवेंद्राची खूप सम...
29/05/2026

*"अधिक मास महात्म्य कथासार अध्याय : १४"*

*"अंबरीष राजाची कथा"*

भगवान म्हणाले, "लक्ष्मी, दुर्वास ऋषींनी देवेंद्राची खूप समजून घातली; पण तो पुनः पुन्हा विनवणी करू लागला, की "मुनिवर्य तुम्ही त्या अंबरीष राजाकडे एकदा जावे आणि पहावे तरी काय काय होईल ते ! "

मग दुर्वास ऋषींना नाही म्हणवेना. त्यांनी मनात विचार केला, की काही हरकत नाही. या निमित्ताने तरी देवेंद्राच्या आग्रहामुळे आपण अंबरीषराजाकडे जावे आणि त्या पुण्यवंताचे दर्शन तरी घ्यावे; पण त्याच्या त्या पुण्याईच्या सत्त्वहरणाचे काय -- ? आणि देवेंद्राचा तर त्याच गोष्टीबद्दल आग्रह आहे. असो. पाहू या तरी पुढे काय होते ते ! "

तो अधिकमास चालू होता. अंबरीष राजाने नेहमीप्रमाणे द्वादशीचे व्रत केले होते; पण दशमीला फक्त एकवेळ भोजन, एकादशीला संपूर्ण कडक उपवास आणि द्वादशीला सूर्योदयापूर्वी पारणे म्हणजे त्या साधनद्वादशीला ब्राह्मणांची सहस्रभोजने !

मग दुर्वास ऋषींनी ती संधी साधून एकादशीच्या रात्रीच आपल्या साठ सहस्र शिष्यांसह अंबरीष राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला. तो एवढ्या संख्येचा शिष्य समुदाय आणि स्वत: दुर्वास ऋषी आलेले पाहताच अंबरीष राजा आनंदाने म्हणाला, “वाहवा ! आज माझा भाग्योदयच झाला. इतकी सहस्रभोजने मला साधनद्वादशीच्या पारण्याला घडणार! ऋषिवर्य आपले थोर उपकार आहेत! "

झाले ! आगतस्वागत आटोपले. विश्रांतीची व्यवस्था झाली. पंचपंच उष:काल झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, "राजा, आम्ही सर्वजण भुकेलेलो आहोत. नदीवर जाऊन स्नानादी प्रातः कर्मे आटोपून येतो, तोवर आमच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करून ठेव ! "

त्यावर अंबरीष राजा म्हणाला, 'मुनिवर्य, आपण काळजी करू नये. आपणा सर्वांची भोजनाची उत्तम व्यवस्था होईलच; पण आज साधनद्वादशी आहे हे लक्षात असू द्या. अगदी पहाटेच आपण नदीवरून लवकर परत यावे. कारण सूर्योदयापूर्वी पारणे पार पडले पाहिजे! नेम चुकता कामा नये!"

" ठीक आहे!" असे म्हणून दुर्वास ऋषी आणि त्यांचे ते साठ सहस्र शिष्यगण नदीवर स्नानासाठी निघून गेले. अंबरीष राजाने त्या सर्वांच्या यथेच्छ भोजनासाठी षड्स पाकसिद्धता करून ठेवली.

मग राजाने आपला नित्यनेम स्नान, देवपूजा वगैरे आटोपून नैवेद्य, वैश्वदेव करून काकबळी बाहेर टाकला आणि तो त्या अतिथींची मार्गप्रतीक्षा करू लागला.

सूर्योदयाची वेळ होत चालली. अरुणोदय झाला तरीही तो

ऋषींचा मेळा नदीवरून राजवाड्याकडे आला नाही म्हणून राजाने काही दूत नदीवर पाठविले. त्यांना लवकर येण्यासाठी निरोप दिला; परंतु दुर्वास ऋषी आणि शिष्यगण स्नान करून संध्या, जप, तर्पण करण्यात गुंग झाले होते. काहीजण म्हणाले, " सूर्य उगवल्याशिवाय सूर्याला अर्घ्य तरी कसे देणार ? सूर्योदय होईपर्यंत नदीवरच थांबले पाहिजे ! "

"सूर्योदय झाल्याशिवाय ऋषिगण भोजनासाठी येत नाहीत. हा निरोप राजाला कळला तेव्हा राजा तर पार घाबरून गेला. सूर्योदयापूर्वी भोजने झालीच पाहिजेत. हा तर साधन द्वादशीव्रताचा नियम आहे! आणि... तो नियम आज पाळला जाणार नाही असे दिसते. आता काय करावे ? राजाला मोठी काळजी लागली.

बरे ! आपण भोजन अगोदर घेऊन द्वादशी साधावी तर ते दुर्वास ऋषी भलतेच रागीट आहेत. ते शाप देतीलच ! व्रताचा भंग होऊ नये म्हणून आता काय करावे? असा विचार करता करता राजाला एक उपाय सापडला.

मग अंबरीष राजाने विष्णूला तुळशीपत्र वाहून तीर्थ घेतले आणि सूर्योदयापूर्वी साधनद्वादशी व्रताची सांगता केली. आता राहिले ते फक्त भोजनच !

थोड्या वेळात दुर्वास ऋषी आणि शिष्यगण सर्वजण नदीवरून सूर्याला अर्घ्य देऊन राजवाड्यात आले, तेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले, 'राजा, थोडा उशीर झाला; पण द्वादशीव्रताचा भंग झाला, असे मानू नकोस. चला आता भोजनाची सिद्धता करा. पाने वाढा! "

राजा म्हणाला, "मुनिवर्य, माझ्या व्रताचा भंग झाला नाही. सूर्योदयापूर्वी मी महाविष्णूचे तीर्थ घेतले आणि वेळ साधली. आता चला आपण सर्वजण भोजन करा ! "
काय ? तू तीर्थ घेऊन द्वादशीव्रत पूर्ण केलेस ?... अरे चांडाळा, तीर्थ घेतलेस ते भोजनाच्या जागी ना ? मग ते तू भोजनच केलेस की ! आणि आता आम्ही काय त्या उष्ट्या अन्नाचे भोजन करावे ? छे! छे! आता आम्हांला ते भोजन नको! चला रे शिष्यांनो, परत चला. निघा येथून !" असे म्हणत दुर्वास ऋषी रागारागाने तणतणत निघाले.

राजा अंबरीष हात जोडून नम्रपणाने म्हणाला, "मुनिवर्य, असा राग करू नका. अन्नाला डावलून जाऊ नका. त्यावर दुर्वास ऋषी संतापून म्हणाले, "राजा, तुला मोठा गर्व झाला आहे ! तुला वाटले मीच साधनद्वादशीचे हे व्रत नेमनिष्ठेने पाळले; पण आम्हांला भोजनाचे निमंत्रण देऊन आम्ही येण्यापूर्वीच तू तीर्थप्राशन करून का होईना आधी द्वादशी सोडलीस ! हे महापाप केले आहेस !

"या पापाचे फळ म्हणून मी तुला शाप देतो" की तुला मुक्ती मिळणार नाही! शंभर वेळा गर्भवास पत्करून शतजन्म दुःखे भोगावी लागतील ! जा! आम्ही आता येथून उपाशी पोटीच जाणार! आम्हांला नको ते तुझे उष्टे अन्न ! तीर्थ घेऊन सोडली द्वादशी आणि आमंत्रित ठेवले उपाशी! वाहवा रे राजा अंबरीष ! "

अंबरीष राजा पुनः पुन्हा विनवीत होता तरीही तो कोपिष्ट दुर्वास ऋषी शांत होईना. तो म्हणतच राहिला, "राजा, तू हे महापाप केले आहेस. मी तुला शाप दिला आहे ! शतजन्म तुला गर्भवासाची दुःखे भोगावीच लागलील

मग अंबरीष राजाने प्रभू विष्णूचा धावा केला. त्याने प्रार्थना केली, “भगवंता, मी हे तुझे साधनद्वादशीचे व्रत नेमनिष्ठेने केले; पण त्या व्रताचा भंग होऊ नये म्हणून तुझे तीर्थ घेतले तर हे काय माझ्यावर या शापाचे अरिष्ट कोसळेले! देवा, आज माझी लाज राखली पाहिजेस ! या ऋषीने माझे आज जणू सत्त्वहरणच केले आहे !" तेवढ्यात चमत्कार झाला. भगवान विष्णू स्वतः गरुडावर

आरूढ होऊन आले आणि राजा अंबरीषापुढे येऊन दुर्वास ऋषींना म्हणाले, " हे मुनिश्रेष्ठा, अबंरीष राजा हा माझा परमश्रेष्ठ भक्त आहे ! त्याला दिलेला हा शाप आता मलाच भोगावा लागणार आहे !"

तरीही दुर्वास ऋषींना संताप आवरेना. त्यांनी आपली एक जटा उपटून जमिनीवर आपटली. त्या जटेतून एक भयंकर कृत्या राक्षसी उत्पन्न झाली. ती अंबरीषावर धावून गेली. ती अंबरीषाला खाऊन टाकणार तोच...

भगवान विष्णूंनी आपले सुदर्शनचक्र तिच्यावर सोडले. त्या चक्राने कृत्येला ठार केले आणि मग ते सुदर्शनचक्र. दुर्वास ऋषीच्या भोवती गरगर फिरू लागले ! " हे चक्र आपणाला आता ठार मारणार या भीतीने दुर्वास ऋषी पळत सुटले. चक्राने त्यांचा पिच्छा सोडला नाही. शेवटी दुर्वास ऋषी विष्णूला शरण गेले. चक्र आवरण्यास त्यांनी विनंती केली. विष्णू म्हणाले, 'माझा परमभक्त हा अंबरीषच त्याला आवरील !" मग अंबरीषाने त्या चक्राला शांत केले. दुर्वासाचे संकट टळले. त्यांनी क्षमा मागून मग द्वादशीचे ते भोजन करून आपला शाप मागे घेतला. विष्णू म्हणाले, 'लक्ष्मी, अशी आहे अंबरीष राजाच्या भक्तिसामर्थ्याची कथा. आता पुढे पंधराव्या अध्यायात एक आगळीच कथा मी तुला सांगणार आहे. ती तू शांतपणे ऐक !

अध्याय चौदावा समाप्त!
*।। श्रीकृष्णार्पणमस्तू ।।*

*"श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर 087624 40232 "*

Shri kshetra Akkalkot darshan 087624 40232
28/05/2026

Shri kshetra Akkalkot darshan 087624 40232

28/05/2026

Shri kshetra pithapuram darshan

Shri kshetra Gangapur Darshan 087624 40232
28/05/2026

Shri kshetra Gangapur Darshan 087624 40232

*॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥**"कृतार्थ करण्या जन्म आपुला "नित्य भजा "गुरूवरा स्मरा" हो "दिगंबरासी स्मरा स्मरा" हो "दत्...
28/05/2026

*॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥*

*"कृतार्थ करण्या जन्म आपुला "नित्य भजा "गुरूवरा स्मरा" हो "दिगंबरासी स्मरा स्मरा" हो "दत्तगुरूंना" स्मरा"*

*"श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो."*

*"श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो"* 087624 40232

*"अधिक मास माहात्म्य कथासार अध्याय- १३"**अध्याय तेरावा : द्वादशीचा महिमा*भगवान विष्णू म्हणाले, “लक्ष्मी, आता पंचपर्वामधी...
28/05/2026

*"अधिक मास माहात्म्य कथासार अध्याय- १३"*

*अध्याय तेरावा : द्वादशीचा महिमा*

भगवान विष्णू म्हणाले, “लक्ष्मी, आता पंचपर्वामधील द्वादशी तिथीचा महिमा तुला सांगतो. द्वादशीचे हे पुण्यव्रत तीन दिवस पाळावे लागते. दशमी तिथीला फक्त एकच वेळ भोजन घ्यायचे म्हणजे अर्धा उपवास करायचा. मग दुसरे दिवशी एकादशी संपूर्ण एक दिवस उपवास करायचा आणि तिसऱ्या दिवशी द्वादशीला शक्य तितक्या लवकर त्या एकादशीचे पारणे करायचे. म्हणजे ब्राह्मणासह यजमानाने मिष्टान्न भोजन करायचे! द्वादशीला दिवसा झोपू नये !

वर्षातील प्रत्येक महिन्यात दोन द्वादशी तिथी असतात. त्याही वरीलप्रमाणे तीन दिवस व्रत पाळूनच कराव्यात; परंतु अधिकमासातील एक जरी द्वादशी तीन दिवस व्रत पाळून तरी त्या बाकीच्या सर्व द्वादशीचे पुण्य पदरी पडते. केली

द्वादशीपर्वाच्या व्रतात साधनद्वादशी हा एक विशेष पुण्यकारक योग असतो. साधनद्वादशी म्हणजे सूर्योदयापूर्वीच एकादशीचे पारणे करणे. द्वादशीला सूर्योदयापूर्वीच ब्राह्मणासह यजमानाने भोजन घेणे; पण हा पर्वकाळ वेळेतच साधला पाहिजे.

ती वेळ जर चुकली तर राजा अंबरीषाप्रमाणे यजमानाची फजिती होते. ती अंबरीष राजाची कथा मी तुला अगदी सविस्तर सांगतोच.

पण अधिकमासातील एका द्वादशीला तरी मुख्य म्हणजे अन्नदान करणे हेच फारच मोठे पुण्यकर्म आहे. त्या पर्वकाळात ब्राह्मणाला भोजन, वस्त्र, पात्र, फळे, तांबूल आणि तुपात तळलेले तीस तीन अनारसे, धोंडे (मोदक) किंवा बत्तासे, खारका, सुपाऱ्या इ. दान दिले पाहिजे. आप्तेष्टांसह पुरणाच्या धोंड्याचे भोजन केले पाहिजे. आता साधनद्वादशीचे कडक व्रत करणाऱ्या अंबरीष राजाची कथा सांगतो. ती मन लावून ऐकावीस. त्या कथेमुळे तुला द्वादशीचा. विशेष महिमा कळेल.

पूर्वी सूर्यवंशात अंबरीष नावांचा एक सार्वभौम राजा होता. तो मोठा धर्मनिष्ठ, सदाचारी आणि पुण्यवान होता. दर महिन्याला साधनद्वादशीचे व्रत तो नेमनिष्ठेने करायचा. भल्या पहाटेच सूर्योदयापूर्वी येतील तितक्या ब्राह्मणांना तो यथेच्छ भोजन घालायचा.

अंबरीष राजाने अशी कितीतरी सहस्रभोजने घातली. त्याच्या त्या साधनद्वादशीच्या पुण्याईमुळे तो इंद्रपदाला योग्य असा ठरला. आपले पद तो राजा घेईल, की काय याची देवेंद्राला भीती वाटू सागली. आणि म्हणूनच देवेंद्र अगदी अस्वस्थ झाला.

एके दिवशी दुर्वास ऋषी देवेंद्राकडे आले होते. आगतस्वागत झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, "देवेंद्रा, अलीकडे तुझे शरीर अगदीच कृश होत चालले आहे ! "

" काय करणार मुनिवर्य! मी चिंतेने जळत चाललो आहे. पृथ्वीवरील तो अंबरीष राजा अधिकमासातील साधनद्वादशीचा नियम अखंडपणे चालू ठेवीत आहे. त्याची ती थोर पुण्याई म्हणजे मला विघ्नच आहे.' "

देवेंद्राने हे सांगितल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले, "मग काय बिघडले ? द्वादशीचे हे व्रत प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं केले होते. महादेवाने केले होते. तूसुद्धा केले होतेस ना ! "

"ते खरे; पण मुनिवर्य, तो अंबरीष राजा आता माझे, हे इंद्रपद घेईल. मग मी काय करू ? मुनिवर्य, आपण त्या अंबरीषाच्या द्वादशीव्रताचा जर भंग केला... तर..."

देवेंद्राची ती दुर्बुद्धी ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, "छे! छे! ते शक्य नाही! अरे त्या अंबरीषाला प्रत्यक्ष विष्णूचे साहाय्य आहे ! त्याच्या त्या व्रताचा भंग करणे म्हणजे माझ्यावर आपत्तीच की! "

" ते काही नाही ! गुरुवर्य, आपण माझ्यासाठी तरी एकदा समक्ष अंबरीषाकडे जावे आणि पाहावे तरी काय काय होईल ते ! " देवेंद्राने विनंती केली.

विष्णू म्हणाले, " लक्ष्मी, पुढील हकीकत पुढे चौदाव्या अध्यायात मी तुला सांगतो ती ऐकू ! "

अध्याय तेरावा समाप्त!
*।। श्रीकृष्णार्पणमस्तू ।।*

*"श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर 087624 40232 "*

*"अधिक माहात्म्य कथासार अध्याय 12"* *"पौर्णिमा आणि अमावास्या"*भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिकमासातील पंचपर्वापैकी पौ...
27/05/2026

*"अधिक माहात्म्य कथासार अध्याय 12"*

*"पौर्णिमा आणि अमावास्या"*

भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिकमासातील पंचपर्वापैकी पौर्णिमा या तिथीपर्वाची माहिती सांगतो. पौर्णिमेचे पर्व साधून जे लोक स्नानदानादी पुण्यकर्मे करतात त्यांना शंभरपट पुण्याचा लाभ होतो.

*"पौर्णिमेच्या"* दिवशी प्रातः स्नान यथाविधी करावे. नंतर दुपारी ब्राह्मणाला यथाशक्ती अन्न, वस्त्र, पात्र यांचे दान द्यावे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेच्या या व्रताला महत्त्व आहेच.

ज्येष्ठीपौर्णिमा वटसावित्री पूजन ब्रह्मदेव प्रसन्न ! आषाढीपौर्णिमा गुरुपौर्णिमा व्यासपूजन-नारायण प्रसन्न ! - माघीपौर्णिमा मोहिनीराज पूजन-रुद्रदेवता प्रसन्न ! चैत्री अनंत, वैशाखी पितृदेवता, मार्गशीर्षी यक्षकिन्नर, - पौषीपौर्णिमा भवानी देवता, श्रावणी नारळी पौर्णिमा- रक्षाबंधन, असे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला महत्त्व आहे; परंतु अधिकमासातील पौर्णिमेचा पर्वकाळ हा विशेष पुण्यप्रद असतो. या पर्वकाळातील स्नानदानाच्या व्रतामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन इच्छित मनोरथ पूर्ण करतात, मोक्षप्राप्ती होते

आता *"अमावास्या"* या पर्वकाळात विशेष महत्त्व आहे ते पितरांना पिंडदान करण्याचे. पुत्रांनी आपल्या स्वर्गीय पितरांना श्राद्ध करून पिंडदान द्यावे. ब्राह्मणभोजन घालावे. तीळतर्पण आणि पिंडदानामुळे स्वर्गीय पितर संतुष्ट होतात. ते आपल्या वंशजांना शांती, सुख, वैभव आणि प्रगती यांचा आशीर्वाद देतात अधिकमासाच्या अमावास्या पर्वकाळात जर हे व्रत साधले तर पितरांचा उद्धार होऊन त्यांना मोक्षप्राप्ती होते. आणि म्हणूनच या पर्वाचा महत्व विशेष पुण्य कारक आहे

लक्ष्मी, आता पुढे तेराव्या अध्यायात द्वादशीपर्वाचे महत्त्व विस्तारपूर्वक सांगतो. ते तू मनःपूर्वक ऐक!

अध्याय बारावा समाप्त!
*।। श्रीकृष्णार्पणमस्तू ।।*

*"श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर 087624 40232 "*

Shri kshetra Gangapur Darshan 087624 40232
27/05/2026

Shri kshetra Gangapur Darshan 087624 40232

Chitra Nakshtra puja 087624 40232
27/05/2026

Chitra Nakshtra puja 087624 40232

*॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥**"तुम्ही नेहमी "सिद्धमंगल स्तोत्र" म्हणत राहा. "तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की लाभेल...
27/05/2026

*॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥*

*"तुम्ही नेहमी "सिद्धमंगल स्तोत्र" म्हणत राहा. "तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की लाभेल". "सिद्ध, महासिद्ध, महायोगी हे सर्व "श्रीपादांच्या" करचरण द्वयासारखे आहेत'. "त्यांच्याच करवी श्रीपाद त्यांचे संकल्प पूर्ण करून घेतात"*

*"श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो"*

*"श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो"* 087624 40232

Address

Kuravpur Road Yapaldinni
Raichur
584102

Telephone

+919850027017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर:

Share

Category