Sachin Pawar - सचिन पवार

Sachin Pawar - सचिन पवार वारकरी, संपादक, अभ्यासक, किर्तनकार

26/05/2026

भजनाचा नाद लई वाईट ….
#भजन

08/05/2026
01/03/2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात, बीजभाषण करताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेविषयी एक मांडणी केली. त्यांच्या मते, संतपरंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन असल्यामुळे त्या स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाहीत.

या मांडणीशी वारकरी विद्यार्थी म्हणून मी नम्रपणे असहमती नोंदवू इच्छितो.

समर्थ रामदास स्वामींचे वाङ्मयीन कर्तृत्व उच्च असून, दासबोध हा मराठी तत्त्वचिंतनाचा महत्वाचा ग्रंथ आहे मात्र समर्थांचे मोठेपण अधोरेखित करण्यासाठी इतर संतांच्या ग्रंथपरंपरेचे स्वतंत्रत्व नाकारणे आवश्यक नाही. उलट, अशा विधानांमुळे समर्थांचेच विचारविश्व अनावश्यक वादाच्या भोवऱ्यात सापडते. समर्थांना जितके त्यांच्या विरोधकांनी अडचणीत आणले नाही, त्यापेक्षा अधिक त्यांच्या अतिउत्साही समर्थकांनी अशा तुलनात्मक विधानांद्वारे आणले आहे, असे वाटते.

ज्ञानेश्वरी हा ‘श्रेष्ठ ग्रंथ’ असल्याचे संत नामदेव महाराजांनी साडेसातेशे वर्षांपुर्वीच सांगितले आहे. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या गाथेला संत बहिणाबाई ‘तुकारामवेद’ म्हणतात. अशा ग्रंथांचे स्वतंत्र ग्रंथत्व नाकारणे ही संतपरंपरेच्या आत्म्याशी विसंगत भूमिका ठरते. याहून पुढे जाऊन पाहिले, तर किमान अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी हे स्वतंत्र ग्रंथ नाहीत का ?

या विषयी स्पष्ट, शास्त्रीय आणि संतपरंपरेशी सुसंगत उत्तर परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी द्यावे, अशी अपेक्षा आहे. कारण हा प्रश्न केवळ ग्रंथांच्या व्याख्येचा नसून, महाराष्ट्राच्या संतपरंपरेच्या बौद्धिक स्वायत्ततेचा आहे.
Swami Govindadev Giri

29/12/2025

#वारकरी
#अभंग
#संतवाणी
#तुकाराममहाराज
#ज्ञानेश्वरमहाराज
#विठ्ठलभक्ती
#नामस्मरण
#भक्तीमार्ग





#मूल्यशिक्षण
#आध्यात्मिकजीवन

01/12/2025

08/03/2024

आज्जी झोपायची तेंव्हा मी तिचा तळवा मोजायचो . जेमतेम माझ्या वितीत मावायचा . मग तो हळुवार दाबत मी विचार करायचो किती हजार किलोमीटर ह्या तळव्यांनी अनवाणी पायपीट केलीय ? केवळ आपली आणि आपल्या भावंडांची टीचभर पोटे भरण्यासाठी . नुकतीच आपल्याला ओळख झालेल्या अक्षरांशी आपली ओळख पुसू नये यासाठी ? बटूचा सर्वव्यापी तळवा आणि आजीचा सर्वस्पर्शी तळवा मला एक सारखे भयंकर मोठे वाटायचे . बटूच्या तळव्याची भीती आणि आजीच्या तळव्याचा आधार . मी अजून जीव आणि पंजातली ताकद हलकी करत तो हळुवार दाबायचो .आज्जीला बहुदा ते आवडत असावं . ती झोपेत सुखासीन सैल व्हायची . घोरण्याचा आवाज टिपेला लागायचा . ही आज्जी . आईची आई . लेकीचं लग्न झाल्याबरोबर महिन्याभरात नवरा मेल्यावर लेकीकडे म्हणजे माझ्या आईजवळ आलेली . आणि पावण्याजवळ आयते कसे खायचे ? म्हणून काष्टा बांधून पुण्यातल्या वाड्या वस्त्यात अन्नावारी अमोल कष्ट विकीत फिरलेली . सदाशिव पेठेतला गाईचा वाडा , चोळखण आळी , बुधवार पेठ ही आजीची काम करण्याची ठिकाणं . दर रविवारी आम्हा भावंडात आज्जीबरोबर तिच्या कामावर जाण्यासाठी स्पर्धा , भांडणे असायची . कारण फक्त आजीचे नातू म्हणून मिळणारा तिथल्या मालक लोकांचा गोड मुरांबा , दोनाची वा पाचाची नोट . आणि एखादे सिजनल फळ . बस्स !
तेवढ्यासाठी आज्जी त्यादिवशी , रोजच्या पेक्षा अधिक झडझडायची तिच्या सोबतची आमची उपस्थिती त्यांच्यासमोर अधिक डोळाभर दाखवायची . आज्जीत आणि पावण्यात म्हणजे आमच्या बापात जवळीक म्हणजे , एकमेकांनी जेवण केलं का ? हे तिर्हाईताजवळून जाणताना होकार मिळवण्याइतपतच एकमेकांप्रती चिंतेची बाब असणारी गोष्ट असायची. आज्जीने आयुष्याची पंचवीस वर्षे पुण्यातल्या वाड्यात , बंगल्यात देहाचे झाडवन केले . त्यावेळच्या पुण्यातल्या चकचकीत रस्त्यांना आज्जीच्या कष्टाची सुंदर रांगोळी लाभलेली असायची . तिच्या घामावरच आमच्या दंडाच्या बेंडकुळ्या फुगल्या . डोक्यातल्या मेंदूची कुशाग्र म्हणून मशागत झाली . ती इतकी इमानी कि कामासाठी काम कधी करीत न्हवती . ज्या गाईच्या वाड्यात जाण्यासाठी आम्ही भावंड एकमेकांशी भांडायचो. तिथे नंतर नंतर कॉलेजात शिकताना तिच्यासोबत जाण्याची लाज वाटू लागली . मोठ्या मिनतवारीने मी प्राध्यापक झाल्यावर, मला त्याच लोकांना लेकीच्या वंशाची वाढलेली शैक्षणिक वेल दाखवायला , एक दिवस घेऊन गेली . त्यांनी केलेल्या कौतुकात बुडून गेली . पुन्हा पुन्हा आता काम बंद कर म्हटले तर हो म्हणायची . पण हळूच डोळा चुकवून जायची . का विचारले तर ताईंना भेटाय बोलाय जावं वाटतय म्हणायची . तिची तिथल्या माणसात गुतलेली माणुसकी जाणून आम्ही तिला जा म्हणायचो . पण येताना काही आणू नकोस असे बजावून सांगायचो . तरी त्यांना न दुखावता त्यांनी दिलेले काही खायचे आज्जी घेऊन यायचीच . आणि गेल्याबद्दल मला न चुकता दहा रुपये दंड द्यायची . वर आणलेला खाऊ खायचा आग्रह . आज्जी यथावकाश मेली . माझ्या पगारातल्या काही रुपड्यात तिच्या वितभर तळव्यासाठी मुलायम आरामदायी चप्पल घ्यायची संधी सुद्धा मला न देता . आज दारूचे बिल बावीसशे होते पण वूडल्यांडचा बूट घेताना गांड फाटते . महागडा बूट घालू वाटत नाही . आयुष्यभर राब राबलेला आज्जीचा अनवाणी तळवा दिसतो . बुधवारपेठे जवळून जाताना , कितीही देखणा चेहरा पहिला तरी वासना उफाळून येत नाहीत , आज्जीशी गुजगोष्टी केलेल्या आणि हातावर पाच रुपये टेकवलेल्या बायका लख्ख आठवतात . त्यांनी घेतलेले मुके आठवतात . आज्जीला महिला म्हणून स्वतःचे कुठले हक्क कसे बरे कळले नसतील कधीच ? तरीही सावित्री माउलीसारखा आम्ही अक्षरपारखे होऊ नये हा ध्यास बाळगायचा वसा कुठल्याही शाळेत न जाता तिला कुठून शिकायला मिळाला असेल ?
आज्जी आज असती तरी महिला दिनाचा ताल तिने केला नसता हे नक्की . मला आजही तिचा तळवा आठवतो सर्वस्पर्शी ..

-प्रा . सतीश वाघमारे Satish Waghmare

Address

Pune

Telephone

+919922778044

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Pawar - सचिन पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share