Guruji Barbhai jejuri

Guruji Barbhai jejuri कुलदैवत खंडीबा मंदिर जेजुरी

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*गिरीश बारभाई गुरुजी* *खंडोबा मंदिर जेजुरी** *मो.९८५०६४०३७४*        *९४२१९००५०५*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*मकर संक्रांतीचे महत्व व प...
12/01/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरीश बारभाई गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी**
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*मकर संक्रांतीचे महत्व व पूजाची माहिती*

मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयाचा अतिशय महत्त्वाचा सण आहेत , यावर्षी दिनांक १३ जानेवारीला भोगी, १४ जानेवारीला ला मकर संक्रांत, १५ जानेवारीला किंक्रांत हे मंगलमय सण आहेत हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-*

फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, हा काळ अत्यंत पुण्यकाळ असतो.

या तीन दिवसी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चार संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतीनी ही पूजा कशी करावी:-*

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*भोगी:-*

दि. १३/०१/२०२६ मंगळवार ह्या दिवशी भोगी हा सण आहे.
ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*श्री सुर्य संक्रमण:-*

शके १९४७ पौष कृष्ण एकादशी दिनांक १४/०१/२०२६ बुधवार रोजी दुपारी ३वाजून ६ मी. मिनिटांनी सुर्य मकर राशीत प्रवेश करत आहे बालव करणावर संक्रमण होत आहे

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*मकर संक्रांती माहिती*

प्रती वर्षाप्रमाणे या वर्षीची मकर संक्रात शके १९४७ पौष कृष्ण एकादशी बुधवार दिनांक १४/०१/२०२६ रोजी आहे
संक्रातीचा पुण्यकाल पौष कृष्ण एकादशी ला दिनांक १४/०१/२०२६ बुधवार दुपारी ३ वाजून ६ मी. पासुन सूर्यास्तापर्यंत आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संक्रातीच्या दिवशी तीळ मिश्रीत उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीलहोम, तीलतर्पण, तीलभक्षण, व तीलदान आशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संक्रांती फल:-*

*संक्रात वाहन वाघ उपवाहन घोडा आहे.*
*पिवळ्या रंगाचे वस्ञ परिधान केले आहे.हातात गदा घेतलेला आहे. कपाळावर केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाई *घेतलेली आहे. सर्प जाति आहे. पायस भक्षण करते आहे.*
*भुषणार्थ मोती धारण केलेले आहे वारनांव घोरा व* *नाक्षत्रणाव मंदाकिनी असून समुदाय मुहुर्त ३० आहेत* *पूर्वेकडून पश्चिमेमडे *जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे*.
*संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे,कठोर बोलणे,वृक्ष गवत तोडणे,गाई म्हशींची धार काढणे व कामविषयी सेवन ही कामे करू नयेत.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*पुजा साहित्य:-*

पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.

पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.

मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.

मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी कीक्रांत असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणते ही काम करू नये.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*किंक्रांत:-*

दि १६/० १/२०२४ रोजी मंगळवार

पौष शुद्ध षष्ठी हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन आहे ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.
मकर संक्रांती ही वाईट नसते. `संक्रांत आली’ हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थ वापरत असतो. दिनमान वाढत जाणे, त्याच दिवशी, शिशिर ऋतुचा प्रारंभ झाला. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो. *मकर संक्रांतीच्या वेळी काही अफवा पसरवितात त्यावर विश्वास ठवू नका तसेच अफवा पसरवू नका असे आवाहनही मी करतो ही विनंती आहे*

*हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:-*

या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.
नवे भांडे,गाईला घास, अन्न, तीलपात, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्रे, घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे करावीत
*संकल्प*
देशकाल कथन करून मम् आत्मनाह सकल पुराणोक्त फल प्रापत्यर्थ श्री सवीतृ प्रीतीद्वारा सकलपापक्षयपूर्वक स्थिर सौभाग्य कुलाभीवृद्धी धनधान्य समृद्धी दिघायु महेश्वर्य मंगलाभुदय सुखसंपदादी कलपोक्तफल सिद्धये अस्मिन मकरसंक्रमन पुण्यकाले ब्राह्मणाय
(अमुक) दान करीष्य असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राम्हणांचे पूजन करून दान द्यावे दक्षणा द्यावी
संक्रांतीच्या पर्व काळात कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामाविषयी सेवन ही कामे करू नयेत
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरीश बारभाई गुरुजी खंडोबा *मंदिर जेजुरी**
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

12/11/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरीष बारभाई गुरुजी*
*खंडोबा मंदीर जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जेजूर नगरी आजाव गुजरी नांदे मारतंड मल्हारी ।
नाम घेतां विघ्न हरती काळ कापती थार् थार् थार् ।
सभेसी बैसला कैलासराणा म्हाळसा बाणु दोघी या ललना ।
दोही बाजूला शोभे देवांगना ॥
भक्त येती नवस करिती प्रसन्न होती शिव हार हार हार
नाम घेतां विघ्न हरती काळ कापिती थार्‌थार् थार् ।

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*जयमल्हार*

*श्री क्षेत्र जेजुरी येथे प्रतिवार्षिक होणारा खंडोबा देवाचा चंपाषष्ठी (घटस्थापना) उत्सव या वर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शुक्रवार दि.२१/११/२०२५ ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी बुधवार दि. २६/११/२०२५ या काळात संपन्न होणार आहे या उत्सव काळात जेजुरी मध्ये खंडोबा देवाची घटस्थापना असते मणी आणि मल्य या असुरांच्या संहारासाठी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी शंकराने मार्तंड भैरव अवतार घेतला आणि सहा दिवस मणी आणि मल्य या असुरांशी युद्ध केले चंपाषाष्टी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्टि या दिवशी मणी आणि मल्य या असुरांचा संहार केला तेव्हापासून या सहा दिवस काळात देवाची घटस्थापना केली जाते*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*घटस्थापना*

*प्रामुख्याने ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशा सर्वांच्या घरात अथवा आपल्या कुळाच्या रितीरिवाजा प्रमाणे घरामध्ये देवाची घटस्थापना केली जाते आपल्या सर्व देवाना मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी पंचामृताने स्नान घालून देवांना नागवेलीच्या (खायच्या)पानावर मांडतात सहा दिवस देवांची पूजा केली जात नाही घटासाठी एक पत्रावळी घेऊन ती पत्रावळी देव्हाऱ्यासमोर ठेवून पत्रावळीच्या मध्य भागी वाटीभर अक्षदा (तांदूळ)घेऊन त्याच्या मध्य भागी पंचपात्र अथवा तांब्याचा गडवा ठेवतात त्याच्या मध्ये* *पाणी ,हळद,कुंकू,अक्षदा,एक रुपयाचे नाने एक सुपारी टाकतात त्यात पाच नागवेलीची लावतात काही कुळात त्याच्या वरती एक नारळ ठेवतात आशा पद्धतीने देवाची घटस्थापना केली जाते या सहा दिवसात देवाची पाण्याने पूजा करत नाही फक्त रोज देवाला नानाविविध फुले अर्पण करतात सहा दिवस अखंड नंदादीप प्रज्वलित ठेवला जातो सहा दिवस रोज सहकुटुंब मनोभावे देवाची आरती करावी सहाव्या दिवशी चंपाषष्टीला देवाचा घट उठवावा काही लोक या सहा दिवसात देवाचा सहा दिवस तीखट मीठ न खाता उपवास करतात*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*चंपाषाष्टी काळातील देवाचा कुलधर्म कुलाचार*

*या सहा दिवसात जेजुरी मध्ये विविध प्रकारे देवाचा कुलाचार केला जातो रोज देवाच्या*स्वयंभू पिंडीला पंचामृताचा अभिषेक होतो रोज देवाला विविध नैवेद्य दाखवला जातो पंचमीला* *देवाला तेलवणाचा विधी केला जातो या सहा दिवसात रोज येणाऱ्या सर्व भाविकांना अन्नदान होते चंपाषाष्टीला देवाला दही भाताची* *पंचामृताची महापूजा, रुद्राभिषेक पुजा, करून देवाचा जागरण गोंधळ* *कोटमबापूजन,तलीभंडारा पुरण पोळी भरीत रोडग्याचा देवाला नैवेद्य केला जातो असे कुलाचार केले जातात*
*ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे ते प्रत्येक्ष येऊन हे कुलाचार करतात अथवा ज्यांना येणे शक्य नाही असे आपले नाव ,गोत्र सांगून हे कुलाचार आपल्या गुरुजींकडून करून घेतात चंपाषाष्टी नंतर त्यांना त्या कुळाचाराचा भंडाराप्रसाद आपणास पाठवला जातो*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*टीप*
*आपणास आपला कुलधर्म कुलाचार करावयाचा असल्यास मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा दि.२१/११/२०२५ रोजीच्या आधी आपले नाव गोत्र सांगून कुलाचार करावयास सांगणे*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरीश बारभाई गुरूजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*बारभाई गिरिष गुरुजी**खंडोबा मंदिर जेजुरी**मो९८५०६४०३७४*    *९४२१९००५०५*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन माहित...
19/10/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन माहिती*

✨✨✨✨✨✨✨
*नरकचतुर्दशी*

*दि.२०/१०/२५ सोमवार*

*दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते.*
*आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. नरकासुर नावाच्या एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना* *तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी* *इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने* *नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा* *मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक*चतुर्दशी साजरी करतात.*
*मरतांना नरकासुराने* *कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.*’ *कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला*.
✨✨✨✨✨✨✨
*लक्ष्मीपूजन*

*दिनांक २१/१०/२५ मंगळवार रोजी लक्ष्मीपूजन आहे अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करावे*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*लक्ष्मीपूजन मुहूर्त संध्याकाळी ६.११ मी.ते रात्री ८.४० मी.पर्यंत या प्रदोष काळ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करावयाचे आहे*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*दिन दिन दिवाळी.. गाई म्हशी ओवाळी… गायी म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या’…. , ‘उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ अशी गाणी किंवा संवाद ऐकू येऊ लागले की, समजून जावे की, दिवाळी आता जवळ आली आहे*
*अयं दीपावलीमहोत्सवः भवत्कृते भवत्परिवारकृते च क्षेमस्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्घिकारकः भवतु अपि च श्रीमल्हारी म्हाळसकांत देवता कृपाप्रसादेन सकलदुःखनिवृत्तिः आध्यात्मिक प्रगतिः श्रीभगवत्प्राप्तिः च भवतु इति*
✨✨✨✨✨✨✨
*आश्विन कृष्ण पक्ष दिवाळी अमावस्या हा सर्वात मोठा सण आहे*
*आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मीपूजनाकरिता आपण घरातील सोन्याचे दागदागिने, जडजवाहिर, सोन्याचांदीचे जिन्नस व चांदीची नाणी एकत्र करुन, तीच लक्ष्मी आहे व संपत्ती देणारी देवता आहे अशा भावनेने तिची पूजा करतो. असेच लौकिकद्रुष्ट्या सर्वत्र लक्ष्मीपूजन केले जाते*. *लक्ष्मीपूजनाने पैसा, संपत्ती तसेच सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होते अशी आपली श्रद्धा असते.*

*लक्ष्मी ही संपतीची देवता आहे हे खरे आहे. तशीच ती नित्य विष्णूच्या सेवेत असते हे ही तितकेच खरे आहे. हरिप्रिया म्हणजे श्रीहरीला प्रिय अशी ती आहे*. *श्रीविष्णूला सोडून ती जात नाही. अशा परिस्थितीत दिवाळीच्या प्रसंगी* *लक्ष्मीपूजनाचे वेळी तिला आवाहन केल्यास ती एकटी येईल कां ? ती तर विष्णूच्या सेवेत गर्क आहे. श्रीविष्णू हा क्षीरसागरी शेषाच्या शय्येवर विराजमान असून हरीप्रिया लक्ष्मी ही त्याच्या सेवेत रममाण झालेली आहे. ती विष्णूला सोडून कशी येणार*

*श्रीविष्णूला श्रीमान असे म्हटले आहे म्हणजे श्री अर्थात लक्ष्मी, संपत्ती शोभा व सौंदर्य ज्याच्याजवळ नित्य आहे किंवा श्री म्हणजे लक्ष्मीदेवता पत्नीरुपाने ज्याच्याजवळ असते असा महविष्णु. विष्णूला माधव असेही म्हणतात. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती अर्थात लक्ष्मीचा पती. म्हणूनच त्याला श्रीपती असेही* *म्हणतात. विष्णूचे असे स्वरुप पाहता लक्ष्मी विष्णूला सोडून एकटी कशी येणार ? म्हणूनच* *लक्ष्मीपूजनाचे प्रसंगी लक्ष्मीनारायण या दांपत्यास आदराने बोलावले पाहिजे*.

*तुम्हाला लक्ष्मी, संपत्ती वैभव पाहिजे ना? मग लक्ष्मीपूजनाचे दिवशी श्रीविष्णूना आवाहन करून त्यांची यथासांग पूजा करा. तो महाविष्णू भक्तवत्सल आहे. हाकेसरशी धावून येतो असा त्याचा लौकिक आहे. श्री विष्णूंचे आगमन झाले की त्यांचेबरोबर महालक्ष्मी येणारच यात शंका नाही कारण ती नित्य विष्णूसमवेत छायेसारखी वावरत असते. अशा लक्ष्मीचा आदर करा*.
*तेव्हा लक्ष्मीप्राप्तीकरिता लक्ष्मीपूजनाचे दिवशी महाविष्णूला प्रथम आवाहन करून त्याची पूजा करा. त्याचे स्तवन करा. पुरुषसुक्ताचा अभिषेक करा म्हणजे लक्ष्मीदेवतानक्कीच प्रसन्न होईल.विष्णूची पूजा म्हणजेच लक्ष्मीपूजन.*
✨✨✨✨✨✨✨
*लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी. तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे.*
✨✨✨✨✨✨✨
*लक्ष्मीपूजन करताना एका चौरंग घ्यावं. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा कलश घेऊन त्यात थोडे गंगा जल मिसळून 80 टक्के पाण्याने भरुन घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे.* *कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. आता देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. परंतू पुस्तकाचे कव्हर चामड्याचे नसावं. आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे.समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप लावा. पूजा स्थळी (केरसुणीची) लक्ष्मीची पूजा करावी*.
*आता हातात फुलाच्या पाखळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ऊँ महालक्ष्मयै नम: जप करावा षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरती नंतर देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी.*
*पूजनावेळी येतअसल्यास श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे.*
✨✨✨✨✨✨✨
*ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांच्या व्यवहार करु नये.*
*या रात्री अखंड ज्योत जळावी.देवी लक्ष्मीला नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, मूगाचे लाडू, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणतेही पदार्थचे नैवेद्य दाखवल्यास* *देवी प्रसाद ग्रहण करते*.
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,* *धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,* *विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,* *विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
*या अष्टलक्ष्मी तुमच्यावर* *धनाचा वर्षाव करोत*
*आश्‍विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते*. *सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या *अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या* *दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.*
*या दिवशी श्रीविष्णूने* *लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले आणि त्यानंतर ते सर्व देव* *क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे*
*श्री लक्ष्मी व कुबेर : लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे. अनेकांना पैसा* *मिळविण्याची कला साध्य असते; पण तो राखावा कसा हे माहीत नसल्यामुळे* *अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. किंबहुना पैसा* *मिळविण्यापेक्षा तो राखणे, सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे. कुबेर ही देवता `पैसा कसा राखावा', हे शिकविणारी आहे, कारण तो धनाधिपती आहे; म्हणून या पूजेसाठी लक्ष्मी व कुबेर या देवता* *सांगितलेल्या आहेत. सर्वच लोक विशेषत: व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात* *करतात.यथासोपस्कर लक्ष्मीपूजन करावे*
✨✨✨✨✨✨✨
*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*बारभाई गिरिष गुरुजी**खंडोबा मंदिर जेजुरी**मो ९८५०६४०३७४*     *९४२१९००५०५*✨✨✨✨✨✨✨        *धनत्रयोदशी*✨✨✨✨✨✨✨*दिना...
18/10/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
✨✨✨✨✨✨✨
*धनत्रयोदशी*
✨✨✨✨✨✨✨
*दिनांक १८/१०/२०२५ शनिवार या दिवशी धनत्रयोदशी आहे*
✨✨✨✨✨✨✨
*धनत्रयोदशी पुजन संध्याकाळी ७.१६ मी. ते रात्री ८.२० मी. पर्यंत आहे*
✨✨✨✨✨✨✨
*सुवर्ण खरेदी शनिवार १८ ऑक्टोम्बर शुभ मुहुर्त सकाळी ७.५८ मी.पासून सकाळी ९.२५ पर्यंत लाभ अमृत दुपारी १.४७ तेव्हा पासून ते दुपारी ४.४१ पर्यंत*
*लाभ मुहूर्त संध्याकाळी ६.०९ ते रात्री ७.४२ पर्यंत आहे या सर्व काळात सुवर्ण वस्त्रालंकार खरेदी करावी*
💥💥💥💥💥💥💥
*धनत्रयोदशीला यमाला यमदीपदान करावे दक्षिण दिशेला यमाला दीपदान करावे*
✨✨✨✨✨✨✨
*आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानतात.घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसूफ करतात व पुनश्च योग्य ठिकाणी ठेवतात.*
*या दिवशी सायंकाळी तेलाने भरून एक दिवा प्रज्वलित करावा व नंतर त्याची गंधादी उपचारांनी पूजा करून घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवतात.*
✨✨✨✨✨✨✨
*धन्वन्तरी जन्मोत्सव – या दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वन्तरी याचा उत्सव* *वैद्यकाची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करतात. हा देवांचा वैद्य व विष्णूचा एक अवतार मानतात.*
*दुर्वासाने इंद्रास शाप देऊन वैभवहीन केले. तेव्हा ते* *पुनरपि मिळविण्याच्या हेतूने देव-दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून चौदा रत्ने* *निघाली. त्यांत सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंडकमंडलुसहित असा* *धन्वन्तरी हातात अमृतकलश घेऊन बाहेर पडला. हा* *विष्णूचा अवतार असून सर्व वेदांत निष्णात व मंत्रतंत्रातही विशारद होता. याला आदिदेव, अमरवर* *अमृतयोनी, सुधापाणी, अब्ज इत्यादी अन्य नावेही आहेत*
*याच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार* *अमृतरूपाने देवांना प्राप्त झाले. ते जरामृत्युरहित बनले. त्यामुळे त्याला देवांचे वैद्यराजपद लाभले. भागवत पुराणात विष्णूच्या चोवीस अवतारांत धन्वन्तरीचा समावेश केला आहे. विष्णूच्या अवताराची प्रतिष्ठा लाभल्यामुळे* *वैष्णवमूर्ती-समुदायात धन्वन्तरीच्या मूर्तीला स्थान मिळाले. याच्या प्राप्तीसाठी ईशान्य दिशेकडे मुख करून सायंप्रार्थना करावी. धन्वन्तरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून प्राप्त केले आणि भास्कराच्या आयुर्वेदसंहितेच्या आधारे ‘चिकित्सा तत्त्वविज्ञान’ नामक ग्रंथ रचला. तेव्हापासून आयुर्वेदाचा प्रसार सुरू झाला.*

*दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती.*

*आश्विन वद्य त्रयोदशी*
✨✨✨✨✨✨✨
*श्री लक्ष्मीदेवी*

*‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.*

*हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.*

*या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्‍या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.*

*या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते.*
*धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला*

*या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्‍या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मीतत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायूमंडल हे सोन्यासारख्या चमचमणार्‍या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणार्‍या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जिवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते; म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे, म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते.*
✨✨✨✨✨✨✨
*धन्वंतरी जन्म*

*‘धन्वंतरीचा जन्म देव आणि* *राक्षस यांनी केलेल्या*समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला* *भगवान धन्वंतरी एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला* *(समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक* *व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतो.’*
*वैद्य मंडळी या दिवशी* *धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.*
✨✨✨✨✨✨✨
*यमदीपदान*
*प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.*

*मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।*

*त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।*

*अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.*

✨✨✨✨✨✨✨
*धनत्रयोदशी कथा*

*धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम* *राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी* *घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.*
✨✨✨✨✨✨✨
*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
✨✨✨✨✨✨✨

*बारभाई गिरिष गुरुजी**खंडोबा मंदिर जेजुरी**मो.९८५०६४०३७४*    *९४२१९००५०५**दिवाळी आली, दिवाळी आली*,*घरोघरी आनंदाची दिवाळी...
16/10/2025

*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
*दिवाळी आली, दिवाळी आली*,
*घरोघरी आनंदाची दिवाळी आली*.
*चिवड्याची कुरकुरीत चव,*
*लाडूचा गोडवा,*
*सण साजरा करण्याची ओढ ही खूप.*
*फराळाची यादी मोठी,*
*लाडू, चिवडा, शंकरपाळीची खोटी.*
*चकली, करंजी, शेव सगळी,*
*या सणाची शान आहे आगळी.*
*वसुबारस*
*गोवत्स पूजण*

*अश्विन कृ.१२ गुरूद्वादशी दिनांक १७/१०/२०२५ शुक्रवार रोजी आहे*
*सायंकाळी संवत्स गाईचे पूजन करावे*

*मानवी जीवनात कमालीचे सौख्य, समृद्धी, चैतन्य आणणारे हे पर्व. मनोमनीचा अंधार दूर झाला तरच जीवन उजळणार. मग जगातील हा अंधार दूर होण्यासाठी हे स्नेहभावाचे प्रकाश पर्व.*
*या अत्यानंदी पर्वाचा आज प्रारंभ होतोय तो या भारतभूमीला निरामय आरोग्य प्रदान करणाऱ्या गोमातेच्या पूजनाने. घरे सजलीत.. अंगणात गोमयाने सडासमार्जन झालेय. दारासमोर.. उंबरठ्यासमोर रंगीबेरंगी रांगोळी आहेत. तर कुठे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण देणारे किल्लेही. दारोदार आकाशदिवे.. तेवत्या पणत्या.. दिव्यांच्या माळां लुकलुकताहेत. घराघरातील दिवाळी फराळाचा सुवास सांगतोय की आली दिवाळी.. आली.*
*या पर्वाचा प्रारंभ होतो तो कृतज्ञता भावनेने. संपन्न राष्ट्राचा मापदंड हा तिथे असणाऱ्या गोधनावर ठरतो. त्या राष्ट्रातील नागरिकांना सकस अन्न.. दुध, दुग्धजन्य पदार्थ गायींमुळेच प्राप्त होतात. विषमुक्त शुद्ध सेंद्रिय शेतीसाठी तर गोमाता वरदान. आपली संस्कृती गायीला माता मानते. पिढ्यानपिढ्यां आम्हांला निरामय आरोग्य प्रदान करणाऱ्या गोमातेचे वत्सासह पूजन वसुबारस ला होणार.*

*दिनांक १७/१०/२०२५ शुक्रवार रोजी गोवत्सद्वादशी/वसुबारस*
*गुरूद्वादशी आहे*

*आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून निरांजनाने ओवाळून बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी याचा नैवेद्य दाखवतात या* *दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.*
*आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.*

*आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी थोडक्यात जाणून घेऊया.*

*वसुबारस (गोवत्स द्वादशी)*

*श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.*

*या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.*

*तिथी : आश्विन वद्य द्वादशी*

*इतिहास : समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.*

*उद्देश : या व पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे. सायंकाळी सवत्स गायीची पूजा करावी त्यांना बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग यांचा नैवेद्य दाखवून त्यांना तो खाऊ घालावा*

*हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी श्रीदत्त यांच्या प्रथम अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज त्यांनी निजानंदी गमन केले. हा दिवस आजही गुरुद्वादशी म्हणून दत्तसंप्रदायी लोक श्रद्धेने पाळत असतात.*

*शुभ दीपावली*

*बारभाई गिरिष गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*

*गिरीश बारभाई गुरुजी*  *महालक्ष्मी चोंक खंडोबा                 मंदिर जेजुरी*   *मो ९८५०६४०३७४*        *९४२१९००५०५*🚩🚩🚩🚩🚩🚩...
01/10/2025

*गिरीश बारभाई गुरुजी*
*महालक्ष्मी चोंक खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विजयादशमी अर्थात दसरा अश्विन शुद्ध दशमी दि. २/१०/२५ गुरुवार या दिवशी आपल्या घरात कुलदैवतांचा तळीभंडारा विधी करावा या दिवशी कुलदैवताना पंचामृताने स्नान घालावे देवांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा दसऱ्याच्या दिवशी देवीच्या घटाचे पाण्या मध्ये विसर्जन करावे

*तलिभंडारा*

खंडोबा देवांच्या कुळाचाराचा एक भाग म्हणजे तळीभंडारा जेजुरी मध्ये आल्यावर तसेच घरामध्ये दर अमावास्या पौर्णिमेला अथवा चंपाषष्टी दसरा चैत्र पौर्णिमा या दिवशी घरामध्ये तळीभंडारा हा करावाच तळी भंडारासाठी देवासमोर बसून ताम्हणात विड्याची (खायची)पाने,सुपारीचे तुकडे,खोबऱ्याचे तुकडे,भंडारा,एक खोबऱ्याची वाटी एक नारळ एवढे साहित्य घ्यावे आपल्या घरात दिवटी बुधली असल्यास ती तळी भरताना पेटवून ठेवावी पाच सात नऊ पुरुषांनी अथवा उपलब्ध असतील तेवढ्या सर्वांनी देवासमोर बसून ताम्हण हात मध्ये घेऊन ते वर खाली करत खालील प्रमाणे बोलावे
*हर हर महादेव*
*चिंतामणी मोरया*
*आनंदीचा उदो उदो*
*भैरोबाचा चांगभले*
*बोल अहंकरा*
*सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार*
हे बोलून झाल्यावर एक पान जमिनीवर ठेऊन त्यावर ताम्हण ठेवणे देवासमोर पानांचा विडा एक सुपारी एक खोबऱ्याचा तुकडा ठेवणे देवावर भंडारा वाहने देवाला दिवटी ओवाळणे थोडे भंडारा खोबरे हातात घेऊन ते आपल्या दरवाजाच्या बाहेर जाऊन आपण प्रत्येक्ष जेजुरीत मंदिरातच आहोत असे समोर आणून तो भंडारा खोबरे सदानंदाचा येळकोट बोलत उधळणे दिवटी ओवाळणे घरात येऊन थोडा भंडारा घरात फुंकावा पुन्हा देवासमोर बसून ताम्हण हातात घेऊन ते खाली वर करत खालील सर्व बोलावे
*आगड धूम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरीला निळा घोडा पावमे तोडा कमरी*करगोठा बोंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदाही लाल* *तळी आरती करी म्हाळसा सुंदरी देव ओवाळी नाना परी*
*खोबऱ्याचा कुटका भांडाऱ्याचा भडका बोल अहं करा सदानंदाचा येळकोट*
*येळकोट येळकोट जयमल्हार*
*अडकलं के भडकल भडकल* *के भंडारा बोल बोल हजारी* *वाघ्या मुरुळी खंडोबा भगत* *सलाम सलाम* *सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार*
ताम्हण खाली ठेवावे ताम्हणातील भंडारा सर्वांनी लावावा पान सुपारी खोबऱ्याचा प्रसाद सर्वाना द्यावा नैवेद्य देवाला दाखवावा ताम्हणातील नारळ देवा समोर फोडावा सर्वाना प्रसाद वाटावा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरीश बारभाई गुरुजी*
*महालक्ष्मी चोंक खंडोबा मंदिर जेजुरी*
*मो ९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Address

Jejuri Mahalaxhmi Chawk
Pune
412303

Telephone

+919850640374

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guruji Barbhai jejuri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category