12/01/2026
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरीश बारभाई गुरुजी*
*खंडोबा मंदिर जेजुरी**
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*मकर संक्रांतीचे महत्व व पूजाची माहिती*
मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयाचा अतिशय महत्त्वाचा सण आहेत , यावर्षी दिनांक १३ जानेवारीला भोगी, १४ जानेवारीला ला मकर संक्रांत, १५ जानेवारीला किंक्रांत हे मंगलमय सण आहेत हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-*
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, हा काळ अत्यंत पुण्यकाळ असतो.
या तीन दिवसी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चार संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतीनी ही पूजा कशी करावी:-*
जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*भोगी:-*
दि. १३/०१/२०२६ मंगळवार ह्या दिवशी भोगी हा सण आहे.
ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री सुर्य संक्रमण:-*
शके १९४७ पौष कृष्ण एकादशी दिनांक १४/०१/२०२६ बुधवार रोजी दुपारी ३वाजून ६ मी. मिनिटांनी सुर्य मकर राशीत प्रवेश करत आहे बालव करणावर संक्रमण होत आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*मकर संक्रांती माहिती*
प्रती वर्षाप्रमाणे या वर्षीची मकर संक्रात शके १९४७ पौष कृष्ण एकादशी बुधवार दिनांक १४/०१/२०२६ रोजी आहे
संक्रातीचा पुण्यकाल पौष कृष्ण एकादशी ला दिनांक १४/०१/२०२६ बुधवार दुपारी ३ वाजून ६ मी. पासुन सूर्यास्तापर्यंत आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संक्रातीच्या दिवशी तीळ मिश्रीत उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीलहोम, तीलतर्पण, तीलभक्षण, व तीलदान आशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संक्रांती फल:-*
*संक्रात वाहन वाघ उपवाहन घोडा आहे.*
*पिवळ्या रंगाचे वस्ञ परिधान केले आहे.हातात गदा घेतलेला आहे. कपाळावर केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाई *घेतलेली आहे. सर्प जाति आहे. पायस भक्षण करते आहे.*
*भुषणार्थ मोती धारण केलेले आहे वारनांव घोरा व* *नाक्षत्रणाव मंदाकिनी असून समुदाय मुहुर्त ३० आहेत* *पूर्वेकडून पश्चिमेमडे *जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे*.
*संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे,कठोर बोलणे,वृक्ष गवत तोडणे,गाई म्हशींची धार काढणे व कामविषयी सेवन ही कामे करू नयेत.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*पुजा साहित्य:-*
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.
पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.
संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.
मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.
मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी कीक्रांत असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणते ही काम करू नये.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*किंक्रांत:-*
दि १६/० १/२०२४ रोजी मंगळवार
पौष शुद्ध षष्ठी हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन आहे ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.
मकर संक्रांती ही वाईट नसते. `संक्रांत आली’ हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थ वापरत असतो. दिनमान वाढत जाणे, त्याच दिवशी, शिशिर ऋतुचा प्रारंभ झाला. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो. *मकर संक्रांतीच्या वेळी काही अफवा पसरवितात त्यावर विश्वास ठवू नका तसेच अफवा पसरवू नका असे आवाहनही मी करतो ही विनंती आहे*
*हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:-*
या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.
नवे भांडे,गाईला घास, अन्न, तीलपात, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्रे, घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे करावीत
*संकल्प*
देशकाल कथन करून मम् आत्मनाह सकल पुराणोक्त फल प्रापत्यर्थ श्री सवीतृ प्रीतीद्वारा सकलपापक्षयपूर्वक स्थिर सौभाग्य कुलाभीवृद्धी धनधान्य समृद्धी दिघायु महेश्वर्य मंगलाभुदय सुखसंपदादी कलपोक्तफल सिद्धये अस्मिन मकरसंक्रमन पुण्यकाले ब्राह्मणाय
(अमुक) दान करीष्य असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राम्हणांचे पूजन करून दान द्यावे दक्षणा द्यावी
संक्रांतीच्या पर्व काळात कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामाविषयी सेवन ही कामे करू नयेत
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*गिरीश बारभाई गुरुजी खंडोबा *मंदिर जेजुरी**
*मो.९८५०६४०३७४*
*९४२१९००५०५*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩