श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली

श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली Gurur Brahma Gurur Vishnu
Gurur Devo Mahesh Varah
Guru Shakshat Para Brahma
Tasmai Shri Guruve Namah

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे लाभ१. या काळात ‘ओझोन’ हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वांत खालच्या थरात अधिक प्रमाणात आलेल...
29/08/2026

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे लाभ
१. या काळात ‘ओझोन’ हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वांत खालच्या थरात अधिक प्रमाणात आलेला असतो. या ‘ओझोन’मध्ये मानवास श्‍वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (ऑक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्‍वसन केले असता रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.

२. या काळात मंद प्रकाश असतो. डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला, तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहिले, तर डोळ्यांचे विकार जडतात आणि दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये, यासाठी तारका असेपर्यंत उठावे.

३. या काळात पंचतत्त्वांपैकी वायूतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते आणि मानवी शरिरातील अपानवायू हा कार्यरत असतो. अपानवायू मलनिःसारण आणि शरीरशुद्धीचे कार्य करतो. हा वायू कार्यरत असतांना मल बाहेर टाकण्याचे कार्य सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. मूळव्याध होऊ नये आणि उत्तम शरीरशुद्धी व्हावी, यासाठी याच काळात मलनिःसारण करावे, तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यामध्ये ऊर्जा कार्यरत असते.

४. आपल्या शरिरात दिवसभरात जमा झालेली घाण ९ ठिकाणांहून बाहेर पडत असते. २ डोळे, २ नाकपुड्या, २ कान, १ तोंड, १ मूत्रद्वार आणि १ गुदद्वार अशा या ९ ठिकाणांना नवद्वार म्हणतात. या ९ ठिकाणी रात्री शरिरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू आणि विषाणू असतात, जे रोग उत्पन्न करू शकतात. या जीवाणू आणि विषाणू यांना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि आपण रोगास बळी पडू शकतो. हे होऊ नये, यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरिराबाहेर काढून टाकली पाहिजे.

५. सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले, तरी आपण एकदम उत्साही रहातो.

६. या काळात ॐकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्तीसह इतर शक्ती केंद्रे जागृत असतात. या वेळी विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा अधिक काळ स्मरणात रहाते.

७. या काळात आपण ॐ मंत्रजप साधना केल्यास सप्तचक्रे जागृत होतात; कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने अधिक प्रमाणात कंपने निर्माण होऊन यांद्वारे कुंडलिनी जागृती होते.

“नागपंचमी”हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण ! हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी ...
16/08/2026

“नागपंचमी”
हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण ! हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नाग देवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नाग देवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते.

या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत.

नागपंचमीचा इतिहास

१. सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.

२. कालियामर्दनाची तिथी : श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

३. पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी ‘भाऊ म्हणून पूजा करील’, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नाग देवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

४. नाग हा परमेश्वराच्या अवतारांशी, म्हणजेच सगुण रूपांशी संबंधित आहे. सागरमंथनासाठी कूर्मावताराला वासुकी या नागाने साहाय्य केले होते. श्रीविष्णूच्या तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या अंगावर नऊ नाग आहेत इत्यादी. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे, म्हणजे नऊ नागांच्या संघाच्या एका प्रतिकाचे पूजन करणे होय.

५. सागरमंथनाच्या वेळी भगवान शिव जेव्हा हलाहल विष प्यायले तेव्हा शिवाला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले. त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत.

नागपंचमी अशी साजरी करा !

१. उपवास करावा
२. नाग देवतेची पूजा करावी : ‘नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे नाग देवतेला प्रसन्न करून घेणे. या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिव-लहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला ३६४ दिवस उपयुक्‍त ठरतात. स्त्रियांनी नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्याने तिला शक्‍ती-तत्त्व प्राप्त होते.
३. नागाच्या आकृतीची भाऊ म्हणून पूजा करावी : या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे ‘भाऊ’ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते.
४. नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करावे : असे केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात.
५. स्त्रियांनी झोका खेळावा, मेंदी काढवी : यामुळे क्षात्रभाव आणि भक्‍तीभाव वाढून त्यातून सात्त्विकतेच्या लहरी मिळतात.
६. प्रार्थना करावी : या दिवशी पुढील प्रार्थना करावी – ‘आपल्या कृपेने या दिवशी शिवलोकातून प्रक्षेपित होणारी तरंगे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे. माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणार्‍या सर्व अडचणी नष्ट होऊ दे. माझ्या पंचप्राणामध्ये देवतांची शक्‍ती सामावली जाऊन ईश्‍वरप्राप्ती आणि राष्ट्ररक्षण यांसाठी तिचा उपयोग होऊ दे. माझ्या पंचप्राणाची शुद्धी होऊ दे.’
नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्‍वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे बहीणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्‍वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी ‘त्याला सद्बुद्धी, शक्‍ती आणि सामर्थ्य दे.’

नागपंचमीला या कृती टाळा !

नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे यांसारख्या कृती करणे निषिद्ध आहे; मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत.

🪔 दीप पूजन — आषाढ अमावस्याआषाढ अमावस्येला महाराष्ट्रात दीप अमावस्या किंवा दीप पूजन करण्याची सुंदर परंपरा आहे. या दिवशी घ...
12/08/2026

🪔 दीप पूजन — आषाढ अमावस्या

आषाढ अमावस्येला महाराष्ट्रात दीप अमावस्या किंवा दीप पूजन करण्याची सुंदर परंपरा आहे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. हा दिवस अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानला जातो.

🪔 दीप पूजनाची तयारी

पूजेसाठी साहित्य:

* घरातील समई, पणत्या व इतर दिवे
* तेल किंवा तूप
* वाती
* हळद-कुंकू
* अक्षता
* फुले
* गंध
* अगरबत्ती/धूप
* नैवेद्य
* फळे
* पाणी
* स्वच्छ पाट किंवा चौरंग

🙏 दीप पूजन विधी

1. सकाळी किंवा संध्याकाळी घरातील सर्व दिवे स्वच्छ करावेत.
2. पूजा करण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
3. पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर दिवे मांडावेत.
4. दिव्यांना हळद-कुंकू, गंध आणि अक्षता लावाव्यात.
5. दिव्यांमध्ये तेल/तूप आणि वाती ठेवाव्यात.
6. सर्व दिवे प्रज्वलित करावेत.
7. फुले अर्पण करून नैवेद्य दाखवावा.
8. दीपाची आरती करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.

🌺 दीप पूजनामागील भावना

दीप म्हणजे ज्ञान, आशा, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक. घरातील अज्ञान, नकारात्मकता आणि दुःखाचा अंधार दूर होऊन जीवनात ज्ञान आणि सुखाचा प्रकाश यावा, अशी या पूजेची भावना आहे.

🕉️ साधी प्रार्थना

“हे दीपदेवा, आमच्या घरातील अंधकार दूर करून ज्ञान, सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश पसरव. आमच्या कुटुंबाचे सदैव कल्याण कर.”

मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालतांना हे करा !१. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या (गाभार्‍याच्या) बाहेरच्या भागात डाव्...
09/08/2026

मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालतांना हे करा !

१. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या (गाभार्‍याच्या) बाहेरच्या भागात डाव्या कडेस उभे राहून मग प्रदक्षिणेला आरंभ करा. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्या.

२. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करायला विसरू नका. एक छोटीशी प्रार्थना अशी पण असू शकते – ‘हे ….. (देवतेचे नाव उच्चारावे), तुझ्या कृपेने प्रदक्षिणा घालतांना पडणार्‍या माझ्या प्रत्येक पावलागणिक माझी पूर्वजन्मीची पापे जळून जाऊ देत आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे.’

३. हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात.

४. प्रदक्षिणा घालत असतांना गाभार्‍याला बाहेरच्या अंगाने (बाजूने) स्पर्श करू नये.

५. प्रदक्षिणा घालतांना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करावा.

६. सर्वसाधारणतः देवांना सम संख्येने (उदा. २, ४, ६, ८) आणि देवींना विषम संख्येने (उदा. १, ३, ५, ७) प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात.

७. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.

८. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागतभावाने नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी.

गुरुपौर्णिमागुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. ईश्वराचे सगुण रूप असलेल्या गुरूंचे मनोभावे पूज...
28/07/2026

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. ईश्वराचे सगुण रूप असलेल्या गुरूंचे मनोभावे पूजन या दिवशी करतात. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. अशा गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व

१. ‘गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय !

२. गुरुपौर्णिमा या दिवशी गुरु तत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरु कृपेची (ईश्वर कृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.

गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत

प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षि व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतियांची धारणा आहे.

गुरूंप्रती भाव वाढवण्यासाठी हे करा !

1. सेवेच्या माध्यमातून साक्षात् गुरूंच्या सेवेत सहभागी होऊन स्वत:चा उद्धार करून घ्या.

2. भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे, त्या स्थितीत भगवंताला अपेक्षित असे प्रयत्न तळमळीने वाढवा.

3. दिवसभर अधिकाधिक गुरू तत्त्व ग्रहण होण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करा.

4. गुरूंनी आपल्यावर केलेल्या प्रीतीसाठी त्यांच्याप्रती अधिकाधिक कृतज्ञता व्यक्त करा.

5. सकाळी गुरूंची मानस पूजा करा.

6. गुरूंनी दिलेला नामजप (अथवा गुरुमंत्राचा जप) अधिकाधिक करा. गुरु नसल्यास गुरुप्राप्तिसाठी कुलदेवतेचा नामजप करा !

जय श्री केदार हर हर महादेव
15/07/2026

जय श्री केदार
हर हर महादेव

कुंकू का आणि कसे लावावे ?लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदु स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू ल...
14/07/2026

कुंकू का आणि कसे लावावे ?

लहान मुलीपासून वयस्कर स्त्रीपर्यंत सर्व हिंदु स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात. केवळ विधवा कुंकू लावत नाहीत. लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत.

कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ

१. कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन तोंडवळ्याच्या (चेहर्‍याच्या) स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. कपाळावरील स्नायूंचा ताण अल्प होऊन मुख उजळ दिसते.

२. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो.

३. कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत होऊन तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते.

४. कुंकवामध्ये शक्ती असते. कुंकू लावणे, हे पूजा करणे, इतरांना सन्मानित करणे यांसारखे कर्म असल्याने कुंकू लावणार्‍या स्त्रीच्या बोटाला कुंकू लागल्याने कुंकूमधील चैतन्य आणि शक्ती कणांच्या रूपात हातातून देहात पसरते.

५. कुंकू लावल्याने स्त्रीकडे शक्तीचे कण प्रक्षेपित होतात. त्यामुळे तिच्यावर आध्यात्मिक उपाय होतात आणि तिचे रज-तमापासून रक्षण होते. तसेच त्यामुळे तिचे मन शांत रहाते.

कुंकू कधी अन् कसे लावावे ?

भ्रूमध्याच्या ठिकाणी असणार्‍या आज्ञाचक्राची जागृती होण्यासाठी कपाळाला भ्रूमध्यावर शक्तीवर्धक कुंकू लावावे. स्त्रियांनी श्रीदुर्गादेवीच्या शक्तीचे प्रतीक असणारे गोलाकारातील कुंकू कपाळावर लावावे. यामुळे स्त्रियांमध्ये श्रीदुर्गादेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते आणि तिची शक्ती वातावरणात पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होते. अशा स्त्रियांना धर्माचरण आणि साधना करण्यासाठी श्रीदुर्गादेवीची सगुण शक्ती अन् चैतन्य अधिक प्रमाणात मिळते.

१. स्वतःच्या कपाळावर कुंकू लावणे : आंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने कपाळावर कुंकू लावावे. कपाळाला कुंकू चिकटण्यासाठी मेणाचा वापर करावा. कपाळावर प्रथम मेण लावून त्यावर कुंकू लावावे.

२. एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला कपाळावर कुंकू लावणे : पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांनी दुसर्‍यांना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर करावा; कारण दुसर्‍याला स्पर्श करतांना त्याच्यातील वाईट शक्तीचे संक्रमण आपल्या देहात बोटाच्या माध्यमातून होऊ शकते; म्हणून तेजाचे प्राबल्य असलेल्या मध्यमेच्या वापरातून स्वतःच्या देहाचे संरक्षण साधले जाते.

देवतांच्या मूर्ती पडल्यास किंवा पडून भग्न झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात ?१. घरातील मूर्ती खाली पडल्यास मूर्ती खाली ...
06/07/2026

देवतांच्या मूर्ती पडल्यास किंवा पडून भग्न झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात ?

१. घरातील मूर्ती खाली पडल्यास

मूर्ती खाली पडली; पण भग्न झाली नाही, तर प्रायश्‍चित्त घ्यावे लागत नाही. केवळ त्या देवतेची क्षमा मागायची आणि तीलहोम, पंचामृत पूजा, दुग्धाभिषेक इत्यादी विधी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या सांगण्यानुसार करावेत.

२. घरातील पूर्ती भग्न झाल्यास

मूर्ती पडून भग्न झाल्यास तो अपशकून समजण्यात येतो. देवतेचा मुकुट पडणे, हाही एक अपशकून असतो. आगामी संकटाची ती पूर्वसूचना असू शकते. अशा वेळी त्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

३. देवळातील स्थिर मूर्ती

देवळात मूर्तीचे स्थिर आणि चल असे दोन प्रकार आहेत. स्थिर मूर्ती देवळात पक्की बसवलेली असल्यामुळे ती कधीच हलवता येत नाही. त्यामुळे ती पडण्याचा प्रश्‍नच येत नाही; मात्र जेव्हा ती पडते, तेव्हा ती भग्न झाल्यामुळे किंवा तिची झीज झाल्यामुळेच पडते. अशा वेळी त्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

४. देवळातील चल मूर्ती

ही देवळातील उत्सवमूर्ती असल्याने ती इतरत्र हलवता येते. ती मूर्ती भग्न न होता केवळ पडली, तर वरील सूत्र १ मध्ये सांगितल्याप्रमाणे विधी करावेत. त्यानंतर ती मूर्ती पूर्वीप्रमाणे पूजेत पुन्हा ठेवू शकतो; पण मूर्ती भग्न झाल्यास मात्र तिचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

५. घर आणि देऊळ येथील भग्न मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात सामायिक सूत्रे

मूर्ती भग्न होणे, हे आगामी संकटाचे सूचक असते. त्यामुळे घर आणि देऊळ यांतील भग्न मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अघोर होम, तत्त्वोत्तारण विधी (भग्न मूर्तीतील देवतेचे तत्त्व काढून ते नवीन मूर्तीत प्रस्थापित करणे) इत्यादी विधी करण्यास शास्त्रात सांगितले आहे. या विधींमुळे अनिष्टाचे निवारण होऊन शांती मिळते. केवळ भेद एवढाच आहे की, घरी या विधींचे प्रमाण अल्प स्वरूपात असते आणि देवळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शास्त्रोक्त पद्धतीने हे विधी करावे लागतात.

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप का आणि किती करावा ? / अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप का करा...
04/07/2026

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप का आणि किती करावा ? / अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप का करावा ?

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे – विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्ये बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात.

१. श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.

२. कोणत्याही तर्‍हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीतकमी १ ते २ तास किंवा तीन तास `श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप नेहमीच करावा.

३. मध्यम तर्‍हेचा त्रास `श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप कमीतकमी २ ते ४ घंटे तरी करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर तीन माळा जप चालू ठेवावा.

४. तीव्र त्रास असल्यास कमीतकमी ४ ते ६ घंटे जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती अशासारखे विधी करावे.

५. पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते; म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ६ घंटे (७२ माळा) नामजप करावा.

दत्ताच्या नामजपाने रक्षण कसे होते ?

१. दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्‍तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

२. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत गुरफटलेले असतात. त्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात (मृत्युलोकात) अडकतात. दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. ( भूलोक आणि भुवर्लोक यांच्या मध्ये मृत्युलोक आहे.) त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्‍तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी होते.

अहेर करतांना भाव कसा असावा ?‘अहेर’ म्हणजे हिरावून न घेता येणारी गोष्ट.आजकाल मोठमोठ्या महागड्या वस्तू एकमेकांना भेट म्हणू...
09/04/2026

अहेर करतांना भाव कसा असावा ?

‘अहेर’ म्हणजे हिरावून न घेता येणारी गोष्ट.

आजकाल मोठमोठ्या महागड्या वस्तू एकमेकांना भेट म्हणून देणे, यालाच अहेर समजतात; पण खरे पहाता अशा वस्तू देणे, हे भावनेपोटी केलेले कर्म आहे. अहेर हा दुसर्‍या जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीस पोषक असणारा, असा असावा. देवतांप्रती भक्तीभाव वाढवणारी देवतांची सात्त्विक चित्रे आणि नामजप पट्ट्या, ईश्वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारे ग्रंथ, ही अशा प्रकारच्या अहेराची काही उदाहरणे होत.

अहेर करतांना भाव कसा असावा ?

अहेर करतांना बडेजावपणा दाखवला जातो. हे अयोग्य आहे. अहेर अहंरहित आणि निरपेक्ष भावनेने द्यायचा असतो. तसे न दिल्यास देवाण-घेवाण निर्माण होतो.

अहेर स्वीकारणार्‍या जिवानेही ‘अहेर म्हणजे ईश्वराकडून मिळालेला वस्तूरूपी प्रसाद आहे’, असा भाव ठेवायचा असतो.

अहेर करतांना द्यावयाच्या वस्तूला हळद-कुंकू लावा

अहेर म्हणून द्यावयाच्या वस्तूला हळद-कुंकू लावल्यामुळे हळद-कुंकवाकडे ईश्वरी चैतन्याच्या लहरी आकृष्ट होतात. यामुळे भेटवस्तूबरोबरच जिवाला या चैतन्याचा लाभ होते.

Address

SHREE DATTA MANDIR, AT-ROADPALI VILLAGE, SEC-16E, D-MART Road, NEAR HANUMAN TEMPLE, Tal-Panvel, Navi Mumbai
Navi Mumbai
410218

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10am
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+919987888018

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, रोडपाली:

Shortcuts

Share