स्वराज्य, कांजुरमार्ग.

  • Home
  • India
  • Mumbai
  • स्वराज्य, कांजुरमार्ग.

स्वराज्य, कांजुरमार्ग. मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्?

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।

सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।

याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।

शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् माना

वें ।।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।

- समर्थ रामदासस्वामी

११व्या वर्षी देखील मंडळाने नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचा दर्जा आणखी उंचावण्याचा सफल प्रयत्न केला .
13/03/2019

११व्या वर्षी देखील मंडळाने नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचा दर्जा आणखी उंचावण्याचा सफल प्रयत्न केला .

स्वराज्य होलिकोत्सव २०१८ । वर्ष ११वे । कांजुरमधील सर्वात मोठा होलिकोत्सव !
25/05/2018

स्वराज्य होलिकोत्सव २०१८ । वर्ष ११वे । कांजुरमधील सर्वात मोठा होलिकोत्सव !

18/08/2017
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या स्वराज्यतर्फे होलीकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २००८साली या सोहळ्याच्या निमित्तानेच २१ ...
18/03/2017

दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या स्वराज्यतर्फे होलीकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. २००८साली या सोहळ्याच्या निमित्तानेच २१ मार्च २००८रोजी स्वराज्यची स्थापना करण्यात आली होती. २०१७ हे होलीकोत्सवाचे १०वे वर्ष. अशा या अभिमानाच्या १०व्या वर्षाची ही काही क्षणचित्रे.

इतिहासाच्या पानात हरवलेले मराठा वीर....|| बहिर्जी नाईक ||बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्...
13/10/2016

इतिहासाच्या पानात हरवलेले मराठा वीर....
|| बहिर्जी नाईक ||

बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.
महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत.
असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।पुर...
08/03/2015

निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥

सांगशील का रे रायगडा,कसा होता माझा राजा ?घडविले ज्याने स्वराज्यअन् सुखावली प्रजा ?तुझ्या रुपावर भाळून जोम्हटला "करु हीच ...
08/06/2014

सांगशील का रे रायगडा,
कसा होता माझा राजा ?
घडविले ज्याने स्वराज्य

अन् सुखावली प्रजा ?
तुझ्या रुपावर भाळून जो
म्हटला "करु हीच तख्ताला जागा "
सांग ना रे रायगडा,
कसा होता माझा राजा .....?
कहाण्या ऐकल्यात मी
तुझ्या अन् त्याच्याही
देव मानलेच आहे त्याला
अन् मंदिर मानले तुला मी.....
दिसला कसा तो,बसला कसा तो..
चालला कसा तो,बोलला काय तो
पाहूणी अन्याय होताना
गरजला कसा तो .....?
सारेच पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे.....
सारेच अनुभवलेस तू.....जे जे घडले इथे.....
मस्तकावरी त्याच्या राज्याभिषेकाचे
मंगल अक्षतही पडले इथे.....
म्हणून तर आलो मी इथवर
आणखी विचारण्या तुला.....
करशील ना भूतकाळ पुन्हा ताजा
रायगडा ,सांगशील ना तू मला ?
कसा होता माझा राजा.....?

आमचा यंदाचा दिवाळी कंदिल - २०१३ !संकल्पना, कला संकलन आणि सुलेखन - श्री. किरण अडांगळे.
09/11/2013

आमचा यंदाचा दिवाळी कंदिल - २०१३ !
संकल्पना, कला संकलन आणि सुलेखन - श्री. किरण अडांगळे.

निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।पुर...
19/09/2013

निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥

इतिहासाच्या पानात हरवलेले मराठा वीर....|| बाजी प्रभू देशपांडे ||बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिर...
10/06/2013

इतिहासाच्या पानात हरवलेले मराठा वीर....
|| बाजी प्रभू देशपांडे ||

बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.
घोडखिंडीचा लढा
सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते.रायाजी बांदल[१],फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते[२]. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. .
माध्यमांतील आविष्कार
घोडखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहेत. या कथेवर विपुल लिहिले गेले आहे. बाबूराव पेंटर यांनी 'बाजी प्रभू देशपांडे' या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.

प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी,कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी,माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही ना...
30/03/2013

प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी,
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी,
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही,
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही,
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक !

जय देव, जय देव, जय जय शिवराया |
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ||

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला |
आला आला सावध हो शिवभूपाला||
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला,
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला |
जय देव, जय देव, जय जय शिवराया ||

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी |
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी||
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता,
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता |
जय देव, जय देव, जय जय शिवराया ||

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो |
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ||
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया,
भगवन भगवदगीता सार्थ कराया या |
जय देव, जय देव, जय जय शिवराया ||

काल शिवाजी पार्कवर नेहमी प्रमाणेशिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.एक वेळ मि माझा वाढदीवस विसरेण पण ईथुन पुढेआयुष्यात कालचे ...
27/10/2012

काल शिवाजी पार्कवर नेहमी प्रमाणे
शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.
एक वेळ मि माझा वाढदीवस विसरेण पण ईथुन पुढे
आयुष्यात कालचे मा. बाळासाहेबांचे भाषण
नाही विसरु शकणार.
काल मा. बाळासाहेब म्हणाले
की मि आता थकलोय, बोलताना पण धाप लागतेय.
हे ऐकुन मन सुन्न झाले आणि डोळ्यात पाणी आले.
अरे ज्यांनी आम्हाला बोलायला शिकवले,
ज्यांनी आम्हाला लहानाचे मोठे केले,
ज्यांनी आम्हाला स्वाभिमानाने
जगायला शिकवले, आमच्या अस्मितेसाठी जे
आयुष्यभर लढत आहेत अश्या वडीलांच्या समान
असलेल्या मा. बाळासाहेबांच्या तोडुन पडलेले हे
शब्द ऐकताना डोक सुन्न झाल होत राञभर झोप
लागली नाही.
मा. बाळासाहेब आमचे आयुष्य तुम्हाला लाभो हिच
ईश्वर
चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही पुन्हा त्याच
जोमाने परत सभा घेचाल
अशी मनोकामना करतो पण एक
नक्की सांगतो साहेब काल तुम्ही रडवलत.
आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो आणि
एक माणुस
एकच मैदान

समोर असंख्य जनसागर आणि
त्यांना विचारांचे सोने लुटणारे भाषण
करताना तुम्ही हे चिञ आयुष्यभर दिसावे.
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट

Address

LBS Road, KANJURMARG
Mumbai
400078

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज्य, कांजुरमार्ग. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share