हिंदू तृतीयपंथी संघटन

  • Home
  • India
  • Mumbai
  • हिंदू तृतीयपंथी संघटन

हिंदू तृतीयपंथी संघटन अर्धनारी स्वरूप शिवशक्ती तथा सनातन हिंदू धर्म सर्वसमावेशक हैं I
🚩🔱 "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" 🔱🚩

" डॉ. नारायणराव सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: " 🚩✍️ -- श्री. माधवराव सातवसे, मुंबई ✍️ -- श्री. शिरीष पाठक, नाशिक ✍...
25/05/2026

" डॉ. नारायणराव सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: " 🚩
✍️ -- श्री. माधवराव सातवसे, मुंबई
✍️ -- श्री. शिरीष पाठक, नाशिक
✍️ -- श्री. संतोष भोसेकर, पंढरपूर
यांच्या लेखांचे संकलन

१) "बाळाराव" टोपण नाव आलेले डॉ. नारायणराव सावरकर हे बाबाराव आणि विनायक दामोदर यांच्यापेक्षा लहान, सर्वात धाकटे, तिसरे बंधू आणि उत्कृष्ट वक्ते ! त्यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे २५ मे १८८८ रोजी झाला. लहानपणीचे शिक्षण भगूर येथे झाले. ते ४ वर्षाचे असताना भगूरच्या आसपास महामारीची साथ सुरू झाली. त्यात नारायणरावांची आई सौ. राधाबाई यांचा साथीच्या आजाराने मृत्यू झाला. पुढे त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले. २ ही मोठ्या भावांचा प्रभाव नारायणरावांवर पडला.

२) इयत्ता ६ वीत ते इंग्रजी शाळेत जाऊ लागले. ते आपले निबंध उत्कृष्टपणे सभेपुढे मांडू लागले. यांच्या वक्तृत्वाचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं. नवरात्रात नाशिक येथे कालीकामातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यावेळी "वंदे मातरम" या राष्ट्रीय घोषावर बंदी आणली होती. त्या बंदीला जनतेचा मोठा विरोध होता. त्याविरोधातून जनतेतून प्रचंड क्षोभ उसळला. त्यामध्ये श्री बाबासाहेब खरे वकील, बाबाराव सावरकर, नारायणराव सावरकर, श्रीधरपंत वर्तक अशा ११ जणांवर खटला भरण्यात आला. त्यात नारायणरावांना व इतर काही जणांना दोषमुक्त सोडून देण्यात आले. हा खटला 'वंदे मातरम' या नावाने ओळखला गेला.

३) आपल्या बंधूंपासून स्फूर्ती घेऊन त्यांनी "मित्र समाज" या नावाची विद्यार्थी संघटना स्थापन केली. विद्यार्थीदशेत असणाऱ्या नारायणरावांनी आपल्या ओजस्वी वक्तृत्वामुळे तरुणांना मोहित केले आणि क्रांतिकार्याकडे आणले.

४) सन १९०८ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी बडोदा येथे गेले. स्नेही दत्तात्रय केतकर यांच्या सहकार्याने अभिनव भारताची स्थापना बडोद्यात केली. प्रो. माणिकरावांच्या व्यायामशाळेत त्यांनी कुस्ती, मल्लखांब, लाठी, फरीदगाचे उत्तम शिक्षण घेतले.

५) सन १९०४ मध्ये स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' सशस्त्र क्रांतीच्या चळवळीने स्वातंत्र्यपूर्व काळात अखिल भारतीय स्वरूप धारण केले. विशेषतः पश्चिम बंगाल (कलकत्ता) मध्ये खूप जोर दिसत होता. डॉ. केशव बळीराम हेगडेवार क्रियाशील कार्यकर्ता म्हणून काम करीत होते.

६) दिनांक २१ डिसेंबर १९०९ मध्ये नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सन याचा हुतात्मा कोन्हेरे या तरुणांनी वध केला. त्यात अभिनव भारताचे सभासदांना पकडण्यात आले होते. कटाच्या खटल्यात ३८ जणांत नारायणराव हे एक आरोपी होते. त्यांना ६ महिन्याची शिक्षा देण्यात आली.

७) सन १९१० मध्ये डॉक्टर हेडगेवार शिक्षणासाठी कलकत्याला गेले. १९११ मध्ये डॉ. नारायणराव सावरकर यांनीसुद्धा त्याच विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

८) दोन्ही बंधू अंदमानात गेल्यावर क्रांतीकार्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर नारायणराव यांनी समर्थपणे पेलली. दोन्हीबंधूंच्या सुटकेसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. अनंत हरी गद्रे व सेनापती बापट यांच्या सहकार्याने महिन्यात ८०,००० स्वाक्षर्‍या गोळा करून ब्रिटीश सरकारला त्यांनी निवेदन पाठवले. पण सरकार काही बधले नाही.

९) "अभिनव भारत" च्या क्रांतिकार्यात त्यांनी खंड पडू दिला नाही. तर संघटनेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. सततची झडती, जप्ती, अटक असूनही त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करीत.

१०) बऱ्याच अडचणींना न जुमानता डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण केला. पुढे एक वर्ष होमिओपॅथीचा अभ्यास केला. त्यानंतर दंतवैद्यकीचाही अभ्यास पूर्ण केला. त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मादाम कामा यांनी केला. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉक्टर हेडगेवार हे त्यांचे कॉलेजमधील सहकारी मित्र बनले. ते मुंबईत आल्यानंतर दंतवैद्य म्हणून व्यवसाय सुरू केला. गिरगावात त्यांनी दातांचे औषधालय काढले.

११) हिंदूची एखादी संघटना असावी असे विचार १९१० पासून डॉ. हेडगेवार यांच्या मनात घोळत होते. श्री. बाबाराव सावरकर यांची अनेक वेळा भेट झाल्यावर त्या विचारांना अधिक चालना मिळाली. बाबारावांच्या प्रभावी मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने हिंदूंची एक संघटनसंस्था १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे सुरू केली. १७ एप्रिल १९२६ मध्ये त्या संस्थेला सर्वानुमते 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' हे नांव देण्यात आले.

१२) गव्हर्नर जनरल लॉर्ड होर्डिंग यांच्या दिल्ली प्रवेशाला अपशकुन करण्यासाठी १९१२ मध्ये त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यात आला होता. त्या संबंधात नारायणराव सावरकर यांनाही इतर क्रांतिकारकांबरोबर पकडण्यात आले होते. काही दिवस त्यांना बंदी ठेवून शेवटी सोडून देण्यात आले.

१३) खेड्यातील हिंदू घटकापर्यंत संघाची विचारसरणी नेऊन पोचविली पाहिजे, अशी त्यांची विचारधारा होती. अखिल भारतीय दर्शन घडविणाऱ्या नि जागतिक कीर्तीच्या मुंबई शहरात आपल्या संघाची शाखा असली पाहिजे, ही त्यांच्या मनातील ओढ होती. या विचाराने प. पू. डॉक्टर हेडगेवार यांनी आपले वर्गमित्र डॉ. नारायण दामोदर सावरकर नि देशभक्त बाबाराव सावरकर यांच्याशी पत्रव्यवहार केला. एप्रिल १९३१ मध्ये प. पू. डॉक्टर मुंबईला आले. डॉ. सावरकरांनी गिरगावातील सोमण बिल्डिंगमध्ये आपल्या औषधालयात डॉ. हेडगेवार यांची बैठकीची जागा निश्चित केली. शहरातील काही प्रमुख व परिचित व्यक्तींना भेटणे सोयीचे व्हावे, म्हणून ही योजना होती.

१४) ज्या व्यक्ती संघकार्याला सहाय्य करतील, प्रत्यक्ष हातभार लावतील असे वाटत होते अशा निवडक व्यक्तींना एकत्र अथवा त्यांच्या सोयीच्या वेळेप्रमाणे आणण्याची जबाबदारी श्री. बाबाराव सावरकर अन् डॉ. नारायणराव सावरकर यांनी घेतली. त्या दृष्टीने अनेक बैठका डॉ. सावरकर यांचे औषधालयात झाल्या. प्रामुख्याने दादाराव नाईक, डॉक्टर मोतीराम बाळकृष्ण वेलकर, खानविलकर (खानसो) मोतीवाले, अनंत हरी गद्रे, का. ना. धारप, शिवरामपंत देवधर, आर. एन शिंदे, लक्ष्मणशास्त्री ओगले, परशुरामपंत महाजन (माधवाश्रमाचे मालक), शिवरामपंत धोंड, राजाराम देसाई, गोविंदराव वर्तक ह्या व्यक्ती उपस्थित होत्या. बाबारावांनी संघाची उपयुक्तता पटवून दिली. पू. डॉ. हेडगेवारानी संघाचा व्यापक दृष्टिकोन समजावून सांगितला. शंकानिरसन, चर्चा होऊन मुंबईत १९३२ मध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१५) सन १९३२ मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवडयातच सावरकरबंधूंना पुन्हा अटक झाली. दिनांक १४ जानेवारी १९३२ पासून मुंबईत हिंदु-मुसलमानांचा जोरदार दंगा सुरू झाला. काही काळ मुंबई शहर लष्कराच्या ताब्यात देण्यात आले होते. हा दंगा दीर्घकाळ म्हणजे ६ महिने चालला होता. ६ महिन्यांत रस्त्यावरील कचरासुद्धा झाडला नव्हता. अशा प्रकारे १९३२ चे वर्ष फुकट गेले.

१६) सन १९३३ ला पू. डॉ. हेडगेवार पुन्हा मुंबईत आले. सर्वांना भगव्या ध्वजासमोर उभे करुन प. पू डॉ. हेडगेवार यांनी संघाची प्रतिज्ञा दिली. अशा प्रकारे १९३३ मध्ये मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू झाली. डॉ. नारायणराव दामोदर सावरकर, दादाराव नाईक, सयाजीराव सिलम, माधव यशवंत सातवसे, कृष्णा वैद्य हे प्रारंभीचे स्वयंसेवक होते. बाबू तेलंग, विनू वालावलकर, राजा धारप, भालचंद्र पाटकर, सदानंद नाडकर्णी, दत्ता‌ नाडकर्णी, राजा राजाध्यक्ष, जया वाघ, जया वरळीकर, गोविंदराव जोगळेकर, रामू गोखले, लघाटे, लिमये हे त्यानंतर आले. पू. डॉ. हेडगेवार एक महिना मुंबईत राहिले. मुंबई शाखेची आणि संघ कार्याची सर्व जबाबदारी डॉ. नारायणराव सावरकर यांचेवर सोपवून ते नागपुरला परत गेले.

१७) हिंदुमहासभेचे दंग्यातील मदतकार्य, धर्मांतरितांचे शुद्धिकरण, इतर सामाजिक कामे तसेच संघाचे काम या सर्वांचा डॉ. सावरकर यांचेवर बराच ताण पडेल, याची डॉ. हेडगेवार यांना कल्पना होती. नागपुरला पोचल्यावर पु. डॉक्टरांनी श्री. गोपाळराव सदाशिव येरकुंटवार यांना ५ वर्षासाठी प्रचारक म्हणून मुंबईत पाठविले.

१८) डॉ. सावरकर आणि इतर स्वयंसेवकांच्या प्रयत्नांनी शाखेवर उपस्थिती चांगलीच वाढली होती. पण मोकळ्या वातावरणात शाखा भरविण्यासाठी सोईस्कर असे मोकळे प्रशस्त पटांगण मात्र मिळत नव्हते. डॉ. सावरकर यांनी शिकस्तीचे प्रयत्न करून राजा नारायणलाल बन्सिलाल पिटा या बड्या धनाढ्य व्यापाऱ्याच्या सध्यस्थिने गिरगावातील मारवाडी विद्यालयाचे भव्य पटांगण मिळविले. डॉ. सावरकरांच्या औषधालयात भरणारी संघाची शाखा सहा महिन्यानंतर मारवाडी विद्यालयाच्या पटांगणावर मारवाडी विद्यालय 'मुख्य शाखा' या नावाने भरू लागली.

१९) डॉ. सावरकर मुंबईतील संघशाखांचे प्रमुख अधिकारी या नात्याने काम पहात होते. संघाच्या प्रचारकाचे सर्व प्रश्न त्यांनीच सोडवावयाचे होते. आणि ती जबाबदारी त्यांनी अत्यंत आनंदाने आत्मविश्वासपूर्वक स्वीकारली होती. संघाकडे द्रव्य नसल्यामुळे प्रारंभी निर्माण होणारे बिकट प्रश्न प्रयत्नपूर्वक स्वतःच सोडविणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्ष संघशाखेत येणं शक्य नसेल तर त्यांच्याकडून परस्पर सहाय्याची अपेक्षा होती.

२०) संघटनेचे कार्य अविरत करता यावे आणि हिंदू संघटनेचे महान कार्यं यशस्वी व्हावे अशी मनापासून इच्छा असलेल्या जाणीवपूर्वक सहानुभूती असणाऱ्या व्यक्तीकडूनच आवश्यक तितक्याच आर्थिक सहाय्याची अपेक्षा केलेली होती.

२१) थोड्याच दिवसात आणखी तिसरी संघशाखा कामाठीपुरातील मरिअम्मा मंदिराचे आवारात सुरू करण्यात आली. माननीय डॉ. सावरकरांचे अगदी निकटचे लढवय्ये हिंदुत्वनिष्ठ स्नेही आणि कॉंग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्रीयुत सयाजीराव सिलम आणि डॉ. भुसरथ यांच्या प्रयत्नांनी प्रभावी शाखा सुरू केली. जातीय दंगलीची सरहद्द संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही योजना होती. अशा प्रकारे डॉ. नारायणराव सावरकर संघकार्याची स्वीकारलेली जबाबदारी अगदी योजनापूर्वक व्यवस्थितपणे पार पाडीत होते. त्यांचा कामाचा उरक खरोखरच अगदी वाखाणण्यासारखा होता.

२२) इच्छा असूनही संघकार्याला अधिक वेळ देता येत नाही, ही त्यांच्या मनातील खंत होती. म्हणून त्यांचे निकटवर्ती स्नेही दादाराव नाईक यांच्याशी विचार विनिमय करून विचारपूर्वक निर्णय घेतला आणि मुंबईच्या संघकार्याची सर्व जबाबदारी श्री. दादाराव नाईक यांच्यावर सोपविली. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन दादांनी संघकार्याची धुरा आनंदाने स्वीकारली. त्यानंतरही माननीय डॉ. नारायणराव सावरकर संघाच्या सांघिकला पूर्ण गणवेशात उपस्थित रहात होते. हा त्यांच्या संघकार्याचा इतिहास.

२३) हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. स्वामी श्रद्धानंद महिलाश्रमाची स्थापना केली. निर्भीड आणि प्रखर हिंदुत्ववादी वृत्तपत्र "श्रद्धानंद" त्यांनी सुरू केले. साडेतीन वर्षे त्यांनी ते एक टाकी लिहिले. त्यांच्या जहाल लिखाणामुळे अखेर सरकारने "श्रद्धानंद" या वृत्तपत्रांवर बंदी आणली.

२४) पंजाब व बंगालच्या क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेबरोबर त्यांचा संपर्क होता. त्यांचा दवाखाना म्हणजे क्रांतिकारकांचे आश्रयस्थान होते.

२५) गांधी-वधानंतर सावरकरांचं घरावर अहिंसावादी गुंडांनी हल्ला केला, त्यात ते जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली. केसरीत त्यांचे काही लेख प्रसिद्ध झाले होते. औषधालयाच्या दुपारच्या वेळी त्यांचे लेखन कार्य चाले. अखेर १९ ऑक्टोबर १९४९ मध्ये त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली.
🚩 🕉️ 🚩

#हिंदुत्व
#वंदे_मातरम्
#अखंडभारत

"अनिवार्य शक्ती उपासना": 🙏कुरुक्षेत्र युद्धाचे वेळी श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार अर्जुनाने रणभूमीवरच बगलामुखी देवीची आराधन...
24/05/2026

"अनिवार्य शक्ती उपासना": 🙏

कुरुक्षेत्र युद्धाचे वेळी श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार अर्जुनाने रणभूमीवरच बगलामुखी देवीची आराधना करून पूजन केले. याचप्रमाणे श्रीरामाने लंकेत प्रवेश करण्यापूर्वी देवीचे पूजन केले होते. दोन्ही वेळेस देवीने प्रसन्न होऊन दर्शन दिले. असुरी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी पराक्रमाची आवश्यकता असते आणि तो पराक्रम तमोगुणप्रधान असणार यात काहीही वावगे नाही. धर्मरक्षणासाठी अवैदिक, अधार्मिक, अघोरी, अहिंदू लोकांच्या तंत्र मंत्र यंत्रांची मदत घ्यावी लागली तरी चालेल, कारण उद्दिष्ट सनातन धर्माचे रक्षण हा आहे. कपटी शत्रूला खोट्या दया क्षमायाचना करून, भुलवून, फसवून कसाही पेलावा, ठेचावा ! अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फाडावेच लागते, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात.

"धर्म एव हतो हन्ति, धर्मो रक्षति रक्षित:"
🚩🕉️🚩

#अखंडभारत

#वंदे_मातरम्
#हिंदुत्व
#भारतरत्न_स्वातंत्र्यवीर_सावरकर
ातन_धर्म_की

अधिक ज्येष्ठ मास शुक्ल अष्टमी #दुर्गाष्टमी_Today 🙏 #त्वरिता_विद्या  #खड्गमाला  #अखंडभारत तुळजाभवानी (त्वरिता देवी) देवीन...
23/05/2026

अधिक ज्येष्ठ मास शुक्ल अष्टमी
#दुर्गाष्टमी_Today 🙏
#त्वरिता_विद्या
#खड्गमाला
#अखंडभारत

तुळजाभवानी (त्वरिता देवी) देवीने भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. त्वरिता देवी हीच अष्टमी तिथीची अधिष्ठात्री देवी आहे आणि तीच तुळजाभवानी आहे, हेच रहस्य होय. ही भवानी तलवार नंतर महाराजांनी आपले गुरु समर्थ रामदास स्वामी यांना दिली. प्रसादस्वरूप ती तलवार; समर्थ डोक्याजवळ ठेवून निजत असत, असा उल्लेख सापडतो.🙏

धर्मासाठी झुंजावे
झुंजोनी अवघ्यासी मारावे
मारीता मारीता घ्यावे, राज्य आपुले
देशद्रोही तितुके कुत्ते
मारोनी घालावे परतें....
निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारु
अखंड स्थितीचा निर्धारू
श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी

🚩💪 "जय भवानी जय शिवाजी" 💪🚩

" अपरा एकादशी Today ! "🙏🕉️🚩करवीर शक्तीपीठ (कोल्हापूर) मंदिरात, महालक्ष्मी देवीची योगमाया स्वरूप पूजा ! हीच महालक्ष्मी दे...
13/05/2026

" अपरा एकादशी Today ! "
🙏🕉️🚩

करवीर शक्तीपीठ (कोल्हापूर) मंदिरात, महालक्ष्मी देवीची योगमाया स्वरूप पूजा ! हीच महालक्ष्मी देवी तिरुपती स्थित बालाजी विष्णूची पत्नी होय, पण बालाजीवर रुसून इकडे येऊन बसली आणि कोलासुराचा वध केला, अशी आख्यायिका आहे. भगवंताच्या कानातून उत्पन्न मधु कैटभ दैत्य जेव्हा धावून आले, तेंव्हा विष्णू योगनिद्रेत होते. या दैत्यांचा संहार करण्यासाठी देवी प्रकट झाली. ही विष्णूची अपरा (स्वतःच्याच आत असलेली) शक्ती आहे. सप्तशतीतील अर्गला स्तोत्रात "मधु कैटभ विद्रावी विधातृ वरदे नमः" असे वर्णन आढळते. "महालक्ष्मी" हे ललिता सहस्त्रनाम स्तोत्रातील देवीचे २१० वे नाव आहे. दशमहाविद्यांमधील कमला लक्ष्मीने ललिता महात्रिपुरसुंदरीची आराधना करून सायुज्यता प्राप्त केली. कदाचित त्यामुळे श्रीयंत्र पूजा म्हणजे अनेकांना लक्ष्मी / महालक्ष्मीचीच पूजा वाटते. 🙏

#ललिता_सहस्त्रनाम
#महालक्ष्मी
#अपरा_एकादशी
#हिंदुत्व

"स्त्रीचा शाप" 🔱🕉️🚩 #अंबा  #शिखंडी #भीष्म१) सनातन हिंदू धर्म आणि अध्यात्म जे मानतात त्यांनाच कळेल, की पितृशाप, स्त्रीशाप...
04/05/2026

"स्त्रीचा शाप" 🔱🕉️🚩
#अंबा
#शिखंडी
#भीष्म

१) सनातन हिंदू धर्म आणि अध्यात्म जे मानतात त्यांनाच कळेल, की पितृशाप, स्त्रीशाप, गुरूचा शाप, देवता शाप, प्रेताचा शाप, आणि ब्रह्मशाप असे वेगवेगळे शाप आपल्या पापकर्मानुसार भोगावे लागतात.

२) शिखंडी हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रातील विष्णूचे २१९ वे नाव आहे. ज्याचा अर्थ डोक्यावर मुकुट धारण करणारा असा होतो. काशी राज्याची राजकुमारी अंबा हिचे भीष्मांनी अपहरण केल्यावर तिचा कुणीही स्वीकार केला नाही, आणि भीष्मांनी तर अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती.

३) अशा परिस्थितीत अंबा केवळ दुःख, अपमान आणि सूड भावनेने जळत राहिली, कारण भीष्मांचे गुरू परशुराम सुद्धा भीष्मांना युद्धात पराजित करू शकले नाहीत आणि परशुरामांनी अंबाला शिव शंकराकडे जाण्याचा सल्ला दिला कारण भगवान शिवच सर्व संहारक आहेत.

४) शंकरांनी दिलेल्या वरानुसार जन्मावर जन्म घेऊन अंबा पुढे द्रुपद राजाची मुलगी म्हणून जन्मास आली, आणि लिंग परिवर्तन करून घेऊन "शिखंडी" नावाचा पुरुष बनली. एका स्त्रीचा शाप आणि तळतळाट भीष्मांच्या मृत्यूचे निमित्त बनला. भीष्मांनी मागील जन्माची पापे पण होतीच. पण साक्षात श्रीकृष्णाच्या साक्षीने आणि सल्ल्याने शिखंडी आणि अर्जुन यांनी भीष्मांना पराजित केले.

५) यानंतर उत्तरायण चालू झाल्यावर भीष्मांनी श्रीकृष्णासमोरच विष्णू सहस्त्रनाम रचून प्राण त्याग केला. इतके दिवस शर शय्येवर काढावे लागले, गुरु द्रोण, आपले शिष्य, नातू यांचे मृत्यू आणि अनेक सैनिक योद्ध्यांचा गेलेला बळी त्यांना शरशय्येवरच सहन करावा लागला. हे सर्व मनुष्य देहाचे भोगच !

"तृतीय प्रकृती" सनातन हिंदू संस्कृती का अविभाज्य घटक है I ये लोग; किन्नर/तृतीयपंथी/हिजडा/जोगती/ खोजा/ अरावनी/ छक्के आदि ...
01/05/2026

"तृतीय प्रकृती" सनातन हिंदू संस्कृती का अविभाज्य घटक है I ये लोग; किन्नर/तृतीयपंथी/हिजडा/जोगती/ खोजा/ अरावनी/ छक्के आदि नामो से समाज मे प्रचलित होते है, इस समुदाय की पूजा तपस्या ओर धर्मकार्य सदा ही गुप्त रहा है I किन्नर समुदाय मे भी शिव उपासक, शक्ती उपासक तथा वैष्णव हैं, कोई मुसलमान हैं I तृतीयपंथी अधिकांश समय; यल्लंमा देवी, बहुचरा माता, एकवीरा, रेणुका, कामाख्या, कालीघाट, ५२ शक्तिपीठ, १२ ज्योतिर्लिंग आदी स्थानो पर उपासना अथवा पूजा करते है, यह मंदिर छोडे तो इनकी साधनाए बहुत गुप्त होती हैं I यह "तृतीय प्रकृती" स्वयं शिवशक्तीनेही निर्माण करी है I क्यूकी केवल सनातन हिंदू धर्म ही सर्व समावेशक है I

🚩 "जय अंबे" 🚩
🔱 "जय श्री महाकाल" 🔱

#तृतीयप्रकृती


#हिंदुत्व
#किन्नरआखाडा

बुद्ध & मातंगी 🔱🕉️🚩 #वैशाख_पौर्णिमा #भगवान_बुद्ध_जयंती१) मुंडमाला तंत्र अनुसार विष्णू के दशावतार होने की अदृश्य प्रेरकशक...
01/05/2026

बुद्ध & मातंगी 🔱🕉️🚩
#वैशाख_पौर्णिमा
#भगवान_बुद्ध_जयंती

१) मुंडमाला तंत्र अनुसार विष्णू के दशावतार होने की अदृश्य प्रेरकशक्ती १० महाविद्या की हर एक महाविद्या है I

२) सिद्धविद्या मातंगी ही बुद्ध अवतार की मूल प्रेरणाशक्ती है I मायामोह अर्हत रूप में प्रकट हुवा I बुद्ध के अनुयायी दैत्य जन, कलिकाल में दैत्य बौद्ध केहलाएंगे, ऐसा वर्णन वराह पुराण मी आता है I

३) सद्य:स्थिती में, स्वयं को बुद्ध केहेनेवाले लोगो को, वस्तुतः गौतम बुद्ध के परम ज्ञान, पंचशील, और बोधिसत्त्व से कोई लेना देना नहीं है I

४) अवलोकितेश्र्वर बुद्ध; तिबेट में भगवान शिव का ही एक अवतार माना गया है I तथा महायान - वज्रयान - हीनयान नामक शाखाये तांत्रिक बौद्ध संप्रदाय में है I

५) सनातन हिंदू धर्म की "चतुर्थ महाविद्या माता छिन्नमस्ता" का वर्णन डाकिणी /वज्रवैरोचनी नाम से तांत्रिक बुद्ध संप्रदाय मे आता है I तथा सहस्त्रबाहूवाला शांत, धीरगंभीर, साधनामग्न, और जिसका सहस्त्रार चक्र जागृत हुवा है; ऐसा बुद्ध अवलोकितेश्वर शिव, इनका उल्लेख तिबेटियन तांत्रिक बुद्ध संप्रदाय मे कई बार आता है I

६) इन अवलोकितेश्वर बुद्ध के पीछे योगिनीस्वरूप माता पार्वती भी उपस्थित होती है, ऐसी मूर्ती / चित्र कई बार तिबेटियन बुद्ध संप्रदाय मे देखने मिलते है I

७) इन सबका संबंध, सद्य:स्थिती मे आरक्षण की मांग करके, हाथ में निले झंडे पकडणे वाले, और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के नाम से जयघोष कर नाचनेवाले तथाकथित नवबौद्ध लोगो से होगा, ऐसा देखकर तो लगता नही I

८) कदाचित, यह सभी माया, मातंगी महाविद्या की ही है जो लोगों को भ्रमित करके उनका वशीकरण करती है I

#अवलोकितेश्वर
#अतुल्यभारत


#मुंडमाला_तंत्र
#सिद्धविद्या_मातंगी
#गौतम_बुद्ध

🚩🔱 "जय माँ मातंगी" 🔱🚩

प्रल्हादपुरी, मूलस्थान (मुलतान), पाकिस्तान पंजाब, येथील नरसिंहाचे मूळ मंदिर 🕉️🚩नरसिंह देव आजच्या दिवशी खांबातून प्रकटला ...
30/04/2026

प्रल्हादपुरी, मूलस्थान (मुलतान), पाकिस्तान पंजाब, येथील नरसिंहाचे मूळ मंदिर 🕉️🚩

नरसिंह देव आजच्या दिवशी खांबातून प्रकटला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला, ही घटना मुलतान येथे घडल्याचे सांगितले जाते. परंतु सध्या आहे मंदिर भग्न अवस्थेत आहे. 1992 वर्षी झालेल्या दंगलीनंतर इस्लामिक जिहादी लोकांनी, होते नव्हते ते मंदिराचे कळस सुद्धा तोडून टाकले आणि जवळपास मातीचा ढिगारा केला. मंदिराचे पुनरुत्थापन / डागडुजी करण्यासाठी अनेक अर्ज लिहिले गेले, खूप प्रयत्न झाले, परंतु अल्पसंख्यांक हिंदू आणि त्यांच्या भावना यांचे रक्षण पाकिस्तानात होत नाही. हिंदूंची ही शोकांतिका कोणास सांगावी ? 😔

🙏 नरसिंह जयंती Today 🙏

🚩 "नरसिंह (नृसिंह) जयंती विशेष" 🚩वैशाख शुक्ल चतुर्दशीनरसिंह देव प्रकटदिननरसिंह नवरात्र समाप्ती ३० मे २०२६---------------...
30/04/2026

🚩 "नरसिंह (नृसिंह) जयंती विशेष" 🚩

वैशाख शुक्ल चतुर्दशी
नरसिंह देव प्रकटदिन
नरसिंह नवरात्र समाप्ती
३० मे २०२६
---------------------- 🕉️ ----------------------
१) पुण्यामध्ये सदाशिव पेठ, पुणे विद्यार्थी गृह समोर एका वाड्यात लक्ष्मी नरसिंह मंदिरात संगमरवराची सुबक मूर्ती आहे. इथेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके काही काळ वास्तव्यास होते.

२) विष्णूच्या दशावतारातील चौथा अवतार "नरसिंह" आणि इजिप्शियन संस्कृती मधील जुनी देवता स्फिंक्स यांत साम्य आढळते. यावरून दिसते, की सनातन हिंदू संस्कृती पश्चिम आशियात सुद्धा, वेगळ्या चालीरीतीने (थोड्याफार फरकाने) अस्तित्वात होती.

३) आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये "नारसिंही" ह्या उग्र देवतेची मंदिरे आहेत. तिलाच "प्रत्यांगिरा" म्हणतात. इंद्रजित करीत असलेल्या गुप्तयज्ञाची देवी हीच होय, तिचा निकुंभला नावाने पण उल्लेख आढळतो. काळी जादू, इंद्रजाल, टोणा तोटका, तंत्र इत्यादी काटण्यासाठी प्रत्यंगिरा पूजा, तंत्र, होम प्रचलित आहे.

४) दशमहाविद्यांमधील सहावी महाविद्या "त्रिपुरभैरवी" हीच नरसिंह अवताराची प्रेरक शक्ती असल्याचे "मुंडमाला तंत्रात" सांगितले आहे.

५) हिरण्यकश्यपूचा वध केल्यावर त्याचा पणतू असलेल्या "बली राजाचा" उद्धार करण्यासाठी विष्णूचा नरसिंहानंतरचा पुढचा, म्हणजे ५ वा "वामन" अवतार झाला.

६) नरसिंह हा विष्णूचा सर्वात उग्र / तामसी अवतार आहे. असुरी शक्तीचा नाश करण्यासाठी पराक्रमाची आवश्यकता असते आणि तो पराक्रम तमोगुण प्रधान असला तरी त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. या अवतारात सर्वात शक्तिशाली पशुचे तत्व + मनुष्यतत्व आहे.

७) हिरण्यकश्यपू वध झाल्यावर सुद्धा तमोगुण प्राबल्यामुळे भगवान शांत होत नव्हते, तेंव्हा शंकराने शरभेश्वर अवतार घेऊन नरसिंहाशी युद्ध केले. यावेळी, नृसिंहापासून दोन मुखे असलेला "गंडभेरुंड" पक्षी निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून, तिथे नारसिंही (प्रत्यंगिरा) देवीने प्रकट झाली आणि तिने दोघांचा अग्नीत विलय केला; अशी कथा दक्षिण भारतात आहे.

८) श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात, अध्याय १० मध्ये, ३२ प्रकारच्या नरसिंह मूर्तींचे वर्णन आढळते.

९) द्वितीय दत्तावतार नृसिंह सरस्वती महाराज, म्हणजेच गाणगापूरचे श्रीगुरु, हे कालभैरव आणि त्रिपुरभैरवी यांच्या संयुक्त अवताराचे स्वरूप असेल, हे भविष्य १३ व्या शतकात सांगितले गेले. याच नृसिंह सरस्वती स्वामींचे ५२ अध्यायी चरित्र म्हणजेच "श्रीगुरुचरित्र" होय.

🚩🔱 "श्री नरसिंहा जय नरसिंहा" 🔱🚩


#नरसिंहजयंती
#नृसिंह_प्राकट्यदिन
#वैशाखशुद्धचतुर्दशी

#अतुल्यभारत

🚩 "मोहिनी एकादशी / वैशाख शुक्ल एकादशी व्रत कथा" 🚩सोमवार, दिनांक २७ एप्रिल २०२६------------------- 🕉️ -------------------...
27/04/2026

🚩 "मोहिनी एकादशी / वैशाख शुक्ल एकादशी व्रत कथा" 🚩
सोमवार, दिनांक २७ एप्रिल २०२६
------------------- 🕉️ -------------------
१) विष्णूचा अवतार असलेल्या मोहिनीने समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या १४ रत्नांमधील एक, अमृताचे वाटप केले. परंतु असुरांना मोहित करून, ते केवळ देवांना मिळेल, अशी योजना केली.

२) यावेळी असुर-कुळातील "महाबली राहू" कपटाने पंगतीत येऊन बसला. सूर्य चंद्राने त्याचे हे कपट ओळखून सर्वांना सावध केले. मोहिनीने सुदर्शन चक्राने "राहूचे" शिर धडावेगळे केले. त्यातून "शिराचा राहू तर धडाचा केतू" तयार झाला. परंतु अमृत प्रश्न केल्याने दोघे देवासमान अती दीर्घायुषी झाले.

३) मोहिनीने "भस्मासुराचा" सुद्धा मोठ्या चतुराईने वध केला. भस्मासुरास शिवाने वरदान दिले होते की, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. मोहिनीने नृत्य करत, भस्मासुराला मोहित करून, त्याचा हात त्याच्याच डोक्यावर ठेववला आणि त्याचा अंत झाला.

४) भस्मासुर वधानंतर, याच मोहिनीमागे महादेव शिव भावविभोर झाले होते, त्यांनी तिचा पळत पळत पाठलाग केला आणि एका निर्जन स्थळी त्यांना संयोग होऊन त्यांना "अयाप्पा" स्वामी हा पुत्र झाला, अशी कथा दक्षिण भारतात आहे.

५) पार्वतीने आपल्याच भावाचे हे मोहिनीसारखे हुबेहूब रूप "श्री म्हाळसादेवी अवतारात" घेतले. त्यामुळे, सत्ययुगात वैश्य वाण्याच्या घरी अवतरलेली म्हाळसा ही दिसायला अगदी मोहिनीसारखी होती, असे वर्णन आढळते. हीच खंडोबा देवाची पहिली पत्नी होय.

🚩🔱 "हरे कृष्ण" 🔱🚩

साभार: इस्कॉन गोपीनाथ मंदिर, गिरगाव चौपाटी, ग्रँट रोड (पश्चिम), मुंबई.

TCS आयटी कंपनी, S1 बिल्डिंग, Phase 3, हिंजवडी IT पार्क; या ऑफिसमध्ये sick रूम (म्हणजे बरं वाटत नसल्यास झोपण्यासाठी बेड ठ...
23/04/2026

TCS आयटी कंपनी, S1 बिल्डिंग, Phase 3, हिंजवडी IT पार्क; या ऑफिसमध्ये sick रूम (म्हणजे बरं वाटत नसल्यास झोपण्यासाठी बेड ठेवलेली रूम) असते तिथे नमाज पडला जातो आहे. याचे प्रत्यक्षदर्शी खूप जण ऑफिसमध्ये आहेत, even सिक्युरिटी गार्ड ना सुद्धा याची कल्पना आहे परंतु आपली नोकरी जाईल या भीतीने कोणी बोलत नाहीये. 😡

यावरून कल्पना करा की हिंदू किती घाबरलेला आहे स्वतःच्याच देशात !

#मूर्ख_हिंदू

#विकाऊ_HR

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हिंदू तृतीयपंथी संघटन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share