06/10/2023
सरपंच अनिल सूर्यवंशीनेच पाडली तलाठी कार्यालयांची भिंत.
नागरीकांचे उपोषण गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मागे.
खेराडे वांगी ता. कडेगांव येथील अज्ञात लोकांनी तलाठी कार्यालयाची भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले होते या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी खेराडे वांगी गावातील नागरिकांनी बुधवार पासून तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते.
तहसिल कार्यालया समोर मोठ मोठ्या घोषणा देण्यात आल्या या उपोषणास सांगली जिल्हा षरीषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे, शिवसेना कडेगाव तालुका अध्यक्ष प्रदीप कदम, सचिन जगताप, चंद्रकात पाटील, आबासाहेब करांडे, संभाजी यादव,सतीश जाधव, राजाराम पवार, गणेश पवार, संग्राम घार्गे, किशोर मिसाळ यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा देऊन भिंत पाडणाऱ्या लोकांन वर चौकशी होवून कारवाई करण्यात संदर्भात निवेदने दिलेली होती. तहसिलदार अजित शेलार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलसांनी आपली यंत्रणा लाऊन सदर गुन्हाचा तपास केला असता. खेराडे वांगी गावच्या सरपंच अनिल सूर्यवंशी यांनचा या गून्हामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शासकीय मालमत्तेचे नुकसान करून तलाठी कार्यालयाची भिंत जेसीबीच्या साह्याने पाडल्याने सरपंच अनिल सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी, कडेगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आप्पासो पडळकर यांच्या हस्ते उपोषण स्थगित करण्यात आले.