Sadguru Narayan Maharaj Muth

Sadguru Narayan Maharaj Muth सद्गुरु श्री नारायण महाराज यांना साक?

श्री समर्थ रामदास स्वामी शिष्य कल्याण स्वामी कथा  #डाळगप्पू.सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाहीत.पावस...
20/08/2024

श्री समर्थ रामदास स्वामी शिष्य कल्याण स्वामी कथा
#डाळगप्पू.
सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाहीत.पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागते.अशा पाण्यामुळे कफ वाढू शकतो.गडावर येण्यापूर्वी समर्थांना कफाची व्यथा होतीच.वैद्याने जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला. सज्जनगडापासून सर्वात जवळचे जिवंत पाण्याचे स्थान म्हणजे उरमोडी नदी.गडाच्या पायथ्याला असलेल्या परळी गावापासून ही नदी अडीच कि.मी.अंतरावर आहे.समर्थां साठी रोज दोन हंडे पाणी आणण्याची जबाबदारी कल्याणस्वामींनी स्विकारली.गुरु सेवेची उत्तम संधी मिळाल्याने त्यांना आनंद झाला.दोन भले मोठे हंडे घेऊन कल्याण उरमोडी नदीवर जाऊ लागले.व येताना भरलेल्या हंड्याची कावड करुन रोज पाणी आणू लागले.एक दिवस समर्थ गडाच्या तटावर उभे राहून किल्याचे निरीक्षण करीत आसता कल्याणस्वामींना पाणी आणतांना त्यांनी पाहीले.कल्याणाच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या.भुकेने व उन्हाने चेहरा काळवंडलेला होता.कल्याणाची काहींतरी न्याहरीची व्यवस्थाकेली तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करुन समर्थ कोठीवाल्याकडे गेले व त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी दोन शेर हरभऱ्याची डाळ,अर्धा शेर गुळ व पावशेर साजूक तूप देण्यास सांगितले.त्यानंतर त्यांनी कल्याणाला बोलावून घेतले व प्रकृती उत्तम रहाण्यासाठी दिलेला शिधा न्याहारीसाठी वापरण्यास सांगितले.दुसऱ्या दिवसापासून कल्याणस्वामींना रोज शिधा सुरु झाला.त्या मुळे बाकीच्या शिष्यांच्या पोटात दुखू लागले.माणसाने स्वतः जास्त खाल्ले तर त्याचे पोट दुखतेच,पण दुसऱ्याला भरपूर खायला मिळालेले पाहून त्याचे पोट दुखू शकते. कल्याणांना जास्तीचा शिधा मंजूर झाला म्हणून सारे जण त्यांना डाळगप्पू असे म्हणू लागले.खरतर त्यांच्या तोंडावर बोलायची कोणाचीच ताकद नव्हती.
🌻 "आता हा डाळगप्पूच पहा !" केवळ ढोर मेहनत आहे.भरमसाठ खायच आणि गुरासारख राबायचं,कधी जप करणे नाही,दासबोध वाचन नाही,अशा दिनचर्येने त्याच कधीही सार्थक होणार नाही."ही शिष्यांची चर्चा समर्थांच्या कानावर गेली.एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले *"तुमच्या पैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत.?"*सगळे शिष्य एकाच वेळी गलका करुन आपली पारायणसंख्या सांगू लागले.यात एकावन्न पासून अकराशे पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंतचा सर्वांचा समावेश त्यात होता.
🌻 *"ऐसा सद्गुरु पूर्णपणी"*पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही,तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल ?" सारे शिष्य गडबडले.अगदी अकराशे पारायणे झालेल्यासुध्दा लज्जायमान होऊन गप्प बसला.तेवढ्यात समर्थांनी कल्याणास हाक मारली व तीच ओवी विचारली तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले *"स्वामीजी,ऐसा सद्गुरु पूर्णपणी ! तुटे भेदाची कडसणी ! देहाविण लोटांगणे ! तया सद्गुरुसी !!" ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे."* कल्याण चुकला असेल म्हणून शिष्यांनी दासबोध काढून,पाहीला संपूर्ण बरोबर होती. समर्थांनी विचारले "कल्याणा,तुझी किती हजार पारायणे झाली." हात जोडून कल्याण म्हणाले "स्वामीजी, आपल्या कृपेने एकच पारायण मनापासून घडले." बरं ते जाऊ दे अलिकडे डाळगप्पू नावाचा कुणी साधक आला आहे काय ? हा डाळगप्पू कोण ? कल्याण म्हणाले "स्वामीजी ,जीव,शीव,माया,ब्रह्म,सुख-दुःख ही दोन दळं जो गप्प करुन टाकतो सदैव अद्वैत बोधात राहतो तो डाळगप्पू होय.मात्र ही व्यक्ति माझ्या पाहण्यात आली नाही."
🌻 कल्याणस्वामींच्या या उत्तराने सारे शिष्य खजील झाले.आपली चूक त्यांच्या लक्षांत आली,नंतर समर्थांनी अगदी खरमरीत शब्दांत सर्वांची हजेरी घेतली.व सर्व शिष्यांना सांगितले "उगीच नुसती पारायणे करु नका.दासबोध हे तंत्र आहे त्याचा मंत्र बनवू नका.शांतपणे वाचून अर्थ समजून घ्या.दासबोध जगायला शिका.कोणाची निंदा नालस्ती द्वेष करु नका."

🌻🙏🌻

'देवाला काळजी' असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्...
06/08/2024

'देवाला काळजी' असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. एके ठिकाणी,*
*विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे एका रांगेत उभे होते. सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले. तेवढ्यात एक फाटक्या वेषातील व्यक्ती, हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली. सेवकांनी तिला रांगेने ये सांगितले. परंतु, ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यवसान वाद-विवादात झाले. सेवक त्या व्यक्तीला मठाधीपती यांच्याकडे घेऊन आले. स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली. स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली, 'स्वामीजी, माझ्या घरात सहा लहान-लहान मुले आहेत. ती उपाशी आहेत. त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे.'*
*'अरे, पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना?'- स्वामीजी उत्तरले.*
*'काय सांगावं? भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर? मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो. म्हणून मी घुसखोरी केली. मला प्रसाद द्या स्वामी....'*
*स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला. प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, 'तू इथे विष्णुसहस्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसे मलाही म्हणून दाखवतोस?' तोंडघशी पडणार, या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.*
*ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु:।*
*भूतकृद् भूतभृद् .....*
*एवढे म्हणून ती थांबली. कारण पुढचे स्तोत्र पाठ नव्हते. त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामीजी म्हणाले, 'तुला १००० नावांपैकी फक्त ६ च नावे पाठ आहेत? त्या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर. 'भूतभृद्' म्हणजे, अशी व्यक्ती, जी अखिल विश्वाचा सांभाळ करते, पोषण करते. तुला जर, हा अर्थ उमगला असता, तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता. म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णुसहस्रनाम आत्मियतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर. ती व्यक्ती खजिल होऊन प्रसाद घेत निघून गेली. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तीभावाने विष्णुसहस्रनामाचे पठण करू लागली. मठात सामुहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते. मात्र, काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली. भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला. सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली. स्वामींना अचानक त्या दीन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर, त्या व्यक्तीचे येणे बंद झाले, असे कळले. सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला. स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची, असे ठरवले. ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होती. स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहीली आणि नतमस्तक झाली. स्वामीजींनी तिची ख्यालीखुशाली विचारली आणि मठात न येण्याचे कारण विचारले. आपण घरीच स्तोत्रपठण करतो, असे ती म्हणाली. कुटुंबाच्या पालपोषणाचे काय? असे विचारले असता, ती व्यक्ती म्हणाली...'स्वामीजी! विष्णुसहस्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसादपात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो. आपण एवढी कृपादृष्टी ठेवलीत, धन्य झालो.' यावर स्वामीजी म्हणाले, 'मी कोणीही सेवक पाठवला नाही. स्वयं परमात्मा तुमची क्षुधाशांती करण्यासाठी सेवकरूपाने तुझ्या द्वारी आला. हे तुझ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ आहे. भगवंतावर अशीच श्रद्धा कायम ठेव. कारण, तोच या जगाचा पालनकर्ता आहे.*

अक्षय्य तृतीया और भगवान परशुराम जयंती की सभी भक्तगणो को हार्दिक शुभकामनाये 🙏🌹... सद्गुरु श्री नारायण महाराज की जय 🚩🙏जय श...
10/05/2024

अक्षय्य तृतीया और भगवान परशुराम जयंती की सभी भक्तगणो को हार्दिक शुभकामनाये 🙏🌹...
सद्गुरु श्री नारायण महाराज की जय 🚩🙏
जय श्रीराम🚩🙏

संत श्री गजानन महाराज प्रकट दिन की सभी भक्तो को हार्दिक शुभकामनाये 🌹🙏
03/03/2024

संत श्री गजानन महाराज
प्रकट दिन की सभी भक्तो को हार्दिक शुभकामनाये 🌹🙏

सद्गुरु श्री नारायण महाराज की जय... 🙏🚩जय श्रीराम 🙏🚩
21/01/2024

सद्गुरु श्री नारायण महाराज की जय... 🙏🚩
जय श्रीराम 🙏🚩

श्री राम नवमी च्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा 🌹🙏🏼 जय श्रीराम 🚩सद्गुरु श्री नारायण महाराज की जय 🙏🏼🚩
29/03/2023

श्री राम नवमी च्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा 🌹🙏🏼
जय श्रीराम 🚩
सद्गुरु श्री नारायण महाराज की जय 🙏🏼🚩

🚩जय गजानन... श्री गजानन... 🚩आज श्री. गजानन महाराज विजय ग्रंथ जागतिक पारायण दिन आहे. श्री नारायण महाराज मठ हैदराबाद येथे ...
08/01/2023

🚩जय गजानन... श्री गजानन... 🚩
आज श्री. गजानन महाराज विजय ग्रंथ जागतिक पारायण दिन आहे. श्री नारायण महाराज मठ हैदराबाद येथे संपन्न होत आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
🚩जय श्रीराम 🚩

01/01/2023

🙏🏼सद्गुरु श्री नारायण महाराज की जय 🙏🏼
सर्व भक्तांना येणारा काळ सुख-समृद्धीमय, आरोग्यदायी होवो
🚩जय श्रीराम 🚩

12/12/2022

जय श्रीराम 🚩🙏🏼

आपण देवाला दाखवलेला प्रसाद देव खरंच खातात का?

आणि जर खात असतील तर तो प्रसाद संपलेला दिसत कां नाही?

आणि जर खात नसतील तर मग प्रसाद दाखवायचा तरी कशाला?

एकदा वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना एका शिष्याने हा प्रश्न आपल्या गुरूला विचारला.

गुरुने ह्या प्रश्नाचं लगेच काही उत्तर दिलं नाही. ते आपला वर्ग घेत राहिलेत, पण त्यादिवशी वर्ग संपल्यानंतर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पुढला श्लोक शिकवला:

"अँ: पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते"

------ बृहदारण्यक ।।

(अर्थ :- ब्रह्म सनातन पुर्ण पुरुष आहे. विश्व, जग, सृष्टी हे पण पुर्ण आहे. पुर्णातुनच पुर्ण निर्माण होते. पुर्णातुन पुर्ण काढले तरी बाकी पुर्णच रहाते. पुर्णाच्या पुर्णत्वाला घेऊन जग जेव्हा अव्यक्त अवस्थेत असते, तरी ते पुर्णच असते.)

श्लोक शिकवल्यानंतर गुरूंनी शिष्यांना सांगितलं की आता सर्वांनी पुस्तकात बघून हा श्लोक पाठ करायचा आहे.

एका तासानंतर गुरूंनी ज्या शिष्याने त्यांना प्रश्न विचारला होता त्याला विचारलं, "तुझा श्लोक पाठ झाला की नाही? यावर त्या शिष्याने पुस्तकातील श्लोक आपल्या गुरूला जसाच्या तसा पाठ म्हणून दाखवला. यावर गुरूंनी नकारार्थी मान हलवली. तेव्हा शिष्य गुरूंना म्हणाला, "गुरुजी, हवं तर तुम्ही पुस्तकात पहा, माझ्या म्हणण्या मध्ये काहीच चूक झालेली नाही मी तो श्लोक जसाच्या तसा पाठ म्हटलेला आहे."

यावर, पुस्तकाकडे पहात गुरु म्हणाले, "अरे श्लोक तर पुस्तकातच आहे, तर मग तो तुझ्या मेंदूपर्यंत कसाकाय जाऊन पोहोचला? यावर शिष्याला काहीच उत्तर देता आलं नाही.

तेव्हा गुरु म्हणाले, "पुस्तकात जो श्लोक आहे तो स्थूल रूपामध्ये आहे. तू जेव्हा श्लोक पुस्तकात पाहून वाचलास तेव्हा तो श्लोक सूक्ष्म स्वरूपात तुझ्या मेंदूमध्ये शिरला आणि त्याच सूक्ष्म स्वरूपात तो तुझ्या मेंदूमध्ये राहणार आहे. आणि जेव्हा तू पुस्तकात पाहून श्लोक पाठ केलास तेव्हाही पुस्तकामध्ये स्थूल रूपाने असलेल्या श्लोकामध्ये काहीही फरक पडलेला नाही. अशाच प्रकारे संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त परमात्मा आपल्या द्वारे दाखवल्या गेलेल्या प्रसादाचं सूक्ष्म रूपामध्ये ग्रहण करत असतो आणि त्यामुळे स्थूल स्वरूपातील वस्तुमध्ये कसलाही फरक पडलेला आपल्याला दिसत नाही आणि अशा रीतीने आपण देवानं सूक्ष्म स्वरूपात ग्रहण केलेलं अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण करीत असतो."

शिष्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं.

🙏राम कृष्ण हरी 🙏

08/12/2022

🙏🏼🚩सद्गुरु श्री नारायण महाराज की जय 🚩🙏🏼
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹

19/09/2022

सद्गुरु श्री नारायण महाराजांची कृपादृष्टी आपणा सर्वांवर राहो 🌸🙏
🚩जय श्रीराम 🚩

सद्गुरु श्री नारायण महाराज सर्व भक्तांचे कल्याण करो 🙏🌹 🚩 जय श्रीराम 🚩
11/09/2022

सद्गुरु श्री नारायण महाराज सर्व भक्तांचे कल्याण करो 🙏🌹
🚩 जय श्रीराम 🚩

Address

Hyderabad
500001

Telephone

+916281614023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadguru Narayan Maharaj Muth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category