15/12/2022
*_जनआक्रोश आंदोलन_*
*जनआक्रोश आंदोलन संकल्पना-*
आपण सगळे नवीन वर्ष, शिमगा,उन्हाळी सुट्टी,गणेशोत्सव,दिवाळीकरीता गावी जात असतो.या कालावधीत मागील 12 वर्षांपासून आपण खड्यातुन रस्ता शोधत गाडी चालवत आहोत.
मी रुपेश दर्गे दिवाळीसुट्टीनिमित्त गावी दुचाकीवर जाण्याचा योग आला आणि या कालावधीत खड्यात रस्ता पाहून मनात कुठेतरी हळहळ निर्माण झाली. आपल्यासारख्या धरधाकट व्यक्तीला एवढा त्रास होत असेल तर गावी वैदकीय उपचाराची उणीव असल्याने एखाद्या आजारी व्यक्तीला मुंबईत हलवावी लागते त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असेल,आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची अवस्था किती बिकट होत असेल आणि हे सगळं आपण तरुण उघड्या डोळ्याने पाहतोय हे पटण्यायोग्य न्हवत. मग सुरुवात झाली ती SOCIAL MEDIA चा वापर करून 10000 कोकणकरांना एकत्र आणण्याची.
मुंबई गोवा महामार्ग जखम असल्याने त्यावर शासनाकडून वेळोवेळी मलमपट्टी करण्यात येते पण पुन्हा ती जखम मोठी होते हे सर्वाना माहिती होत आणि या जखमेवर जालीम उपाय म्हणून सुचली ती जनआक्रोश आंदोलन संकल्पना...
*जनआक्रोश आंदोलन कशासाठी-*
1) 2010 ते 2022 12 वर्ष उलटूनही महाराष्ट्रातुन जाणारा 471 किलोमीटरचा महामार्ग बनायला 12 वर्ष लागतात मात्र 74 किलोमीटर रस्ता पूर्ण करून गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होत असेल तर आमच्या महामार्गाला एवढा वेळ का?
2)कोकणात एकजूट नसल्याने सरकार कोकणी माणसांचा गैरवापर करून घेत आहे आणि हा गैरवापर थांबून कोकणकरांना दबाव यंत्रणा बनवायची असेल तर सगळे हेवे दावे,राग,दोष, पक्ष विसरून कोकणकर म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे.
3)मागील 10 वर्षात 3000 कोकणकर अपघातात दगावले.कोणाच्या पोटचा गोळा गेला तर कोणाचा कर्ता कमावता गेला. कोणाची माय माऊली गेली.जेव्हा आपला हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हाच या 3000 कोकणकरांना खरी श्रद्धांजली राहील.
4) कोकणात अद्यापही मोठे सर्व सुविधांसहित एखादा सुसज्ज दवाखाना नाही त्यामुळे मुंबईशिवाय पर्याय नाही त्यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीला मुंबईला आणायला किमान रस्ता असणं गरजेचे आहे पण तो रस्ताच नसल्याने माझा कोकणकर जिवाला मुकतोय मग यासाठीच आपल जनआक्रोश आहे.
5) स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली यामध्ये कोकणाचा रस्ता बनवायला 12 वर्ष गेली. बनविण्यात येणारा रस्ता जर का आताच व्यवस्थित न बनवता फक्त मलमपट्टी लावली तर कोकणकरांना पुन्हा 50 वर्ष वाट पाहावी लागेल, हे अस न व्हावं रस्त्याला 10 वर्षात एकही खड्डा पडणार नाही अशा पद्धतीत रोड असावं यासाठी आपल जनआक्रोश आंदोलन.
6) 471 किलोमीटर रस्ता बनवण सोडून टोल नाके वसुलीकरिता उभे राहिले हे टोल 471 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत नाही तो पर्यंत चालु होऊ न देणे यासाठी जनआक्रोश आंदोलन.
7) एखाद्या घरातील कर्ता कमावता या मुंबई महामार्ग अपघातात मृत्यूमुखी पडला असेल किंवा या खड्यांमुळे एक जरी कोकणकर यापूढे जिवाला मुकला तर शासनाकडून नाही तर संबंधित ठेकेदाराकडून 10 लाख भरपाई मिळावी या तरतुदीसाठी जनआक्रोश
8) अपूर्ण महामार्ग असल्याने घडलेल्या अपघात क्षेत्रातील जिल्हाधिकारी,प्रांत अधिकारी, तहसीलदार,जिल्हा परिषद सदस्य,आमदार,खासदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी जनआक्रोश.
*जनआक्रोश आंदोलनाची जनजागृती कशी करावी-*
1)यासाठी गावागावात आणि वाडीवाडीत प्रत्येकाने पुढाकार घेऊन स्वतः संयोजक बनून लोकांच्या भेटी घेणे जेणेकरून शेवटचा व्यक्ती संपर्कात येईल.
2)आपण मुंबईत राहतो त्याठिकाणी अजूनही 20-25 कोकणकर राहत असतील त्यांना एकत्र जमवून जनआक्रोश आंदोलनबद्दल माहिती देणे.
3)मुंबईतील प्रत्येक विभाग /वॉर्डनुसार ज्याला जमेल तिथे स्वतः आयोजक/संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारून कोकणकरांना जनआक्रोशबाबत माहिती देणे.
4) आपल्या ओळखीतील मंडळ/संघटना/प्रतिष्ठान असतील त्यांना भेटी देणे
5) रेल्वेत प्रवास करताना आपल्या कोकणासाठी न लाजता जास्तीत जास्त जनआक्रोशबाबत प्रचार व प्रसार करणे.
6)रेल्वेस्टेशनला प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून एखादा 2X2 फूट साईझचा बॅनर घेऊन सही मोहीम राबविणे व वयक्तिक भेट घेऊन जनआक्रोशबाबत माहिती देणे.
7) वाहन चालक मालक संघटनानी स्वतःहून पुढाकार घेऊन सभा चालु करून जनआक्रोशबाबत माहिती देणे.
8)जिल्हा,तालुका,विभाग नुसार प्रत्येकाने आपआपल्या लेव्हलला सभा घेऊन जनआक्रोशबाबत माहिती देणे.
9)कोकण रेल्वेत प्रवाश्यांसोबत जनआक्रोश बाबत चर्चा करून त्यांचा यामध्ये सहभाग नोंदविणे.
10)ज्याला जमेल त्या पद्धतीने आपल्या चौकात, मुंबई गोवा हायवे लगत बॅनर लावणे.
11) या सर्व कामांसाठी कमिटी बनतील तेव्हा बनतील परंतु तत्पूर्वी आपण सगळ्यांनी वरील गोष्टींसाठी प्रयत्न करून झालेल्या भेटीबाबत ग्रुपवर माहिती सह फोटो शेअर करणे तसेच स्वतःच्या फेसबुक अकाउंटला माहिती प्रसारित करणे जेणेकरून लोकांचा उत्साह वाढेल.
12) आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी रडायला नाही तर लढायला शिकवलं आहे आणि आपण सगळे जनआक्रोशमध्ये सामील होण गरजेचं आहे. लढाई म्हणजे काठ्या-लाठ्या, तलवारी घेऊन लढायचा नाही तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या संविधानाद्वारेच लढायचा आहे.जेणेकरून कोणताही कोकणकर कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही.
जनआक्रोश कशासाठी? त्याची संकल्पना काय? जनजागृती कशी करावी याबाबत सर्व माहिती आहे. आपण सगळेच कामाला लागलोय पण आतापासूनच अगदी जोमाने कामाला लागा ही आपणांस विनंती.
चला सर्व कोकणकरांनी निर्धार करूया...
एक लाख कोकणकरांना जनआक्रोश आंदोलनात सामील करूया.
*जनआक्रोश आंदोलनात सामील होण्यासाठी
संपर्क करा*
❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️
एक कोकणकर
Adv स्मिता कदम
🙏🏻