24/10/2022
*🌹धम्म सकाळ🌹*
*त्रिसरण व पंचशिल गाथेचे बौध्द धम्मातील ऐतिहासिक महत्त्व*
जगाच्या पाठीवर जे जे बौध्द राष्ट्र आहेत, व तेथील बौद्ध अनुयायी आहेत,त्यांच्या कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमात त्रिसरण व पंचशील या गाथेस अनन्यसाधारण असे महत्व आहे.बौध्द कुटुंबातील जन्म, नामकरण,विवाह, म्रुत्यू किंवा इतर अनेक कार्यक्रम ,सोहळे,उत्सव या प्रसंगी त्रिसरण व पंचशील गाथेचे अग्रक्रमाने पठण केले जाते. ती गाथा प्रथम म्हटली जाते, त्याचा दुहेरी हेतू असतो तो म्हणजे पठण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे सातत्याने स्मरण रहावे व आपल्या जीवनात त्याने त्याचा कसोशीने अंगीकार करावा.त्रिसरण व पंचशील या गाथेचे दुसरे महत्त्व म्हणजे या गाथेचा उगम प्रथमतः तथागताच्या पवित्र वाणीतून झाला आहे. तथागतांनी प्रथमतः सारनाथ येथील मिगदाय वनात पंचवर्गीय भिक्खूंना धम्माचा उपदेश केला त्यास धम्मचक्रप्रवर्तन असे म्हटले जाते.धम्मचक्रप्रवर्तन हे केवळ बुध्दच करतात. त्यानंतर तथागतांनी प्रथम वर्षावास हा सारनाथ येथील म्रुगदाय वनातच केला.या वर्षावासात सतत तीन महिने अनेकांना धम्माची दिक्षा दिली व त्यांना धम्मात प्रशिक्षित केले.व ते सर्वजन
६०भिक्खू अर्हत पदास प्राप्त झाले. त्यावेळी जगात भगवान बुध्दासमवेत हे सर्वजन अर्हत भिक्खू होते. त्यावेळी आजूबाजूच्या ठिकाणाहून व लांब अंतरावरुन या भिक्खू समवेत नवनवीन ग्रुहस्थ भिक्खू संघात प्रवर्जीत होण्यासाठी येत असत त्यावेळी भिक्खूंना व प्रवर्जीत होणाऱ्यांना सुध्दा त्रासदायक होत होते ही व्यावहारिक अडचण दूर करण्यासाठी व हे सर्व अर्हत भिक्खू ;धम्मात निष्णात असल्याची खात्री झाल्यानंतर भगवान बुध्दाने अश्विनी पौर्णिमेस या साठ भिक्खूंना सांगितले की,जसा मी अर्हत आहे व सर्व ऐहिक व पारमार्थिक किंवा मानवी व दिव्य पाशातून मुक्त झालो आहे, तसेच तुम्हीसुद्धा माझ्या प्रमाणेच या दोन्ही प्रकारच्या पाशातून किंवा बंधनातून मुक्त झाला आहात.आता या धम्माचा उपदेश करण्यासाठी व माणसाच्या हितासाठी व सुखाकरीता प्रत्येक दिशेला चारीका करा
एका ठिकाणी तुम्ही एकट्यानेच जा! व देसना द्या! असे भगवान बुध्दाने का बरे म्हटले असावे, कारण प्रत्येक भिक्खू हा समर्थ व धम्मात निष्णात व वाकबगार होता हे भगवान बुध्दाने जाणले होते.
कुठल्याही ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दिक्षित करुन संघात घ्यायचे असेल तर सगळीकडे तथागत एकाचवेळी जाऊ शकणार नाही म्हणून, त्या उध्देशाने ;या साठ अर्हत भिक्खूंना अशी परवानगी दिली की,एखाद्या व्यक्तीस भिक्खू संघात प्रवर्जीत करायचे असेल तर अशा व्यक्तीला प्रथमतः त्याचे डोक्याचे व दाढीचे केस काढले (मुंडण केले )पाहिजे व नंतर त्यास चीवर परिधान करावयास लावणे(कशाय वस्र), एका खांद्यावर चीवरचा भाग टाकावा व त्याने उकीडवे बसावे अशा अवस्थेत त्याच्याकडून तीन वेळा मी बुध्दाला, धम्माला, संघाला शरण (सरण) जातो असे वदवून घ्यावे असे सांगितले. त्रिसरणाचा उदघोष हा प्रथमतः भगवान बुध्दाच्या पवित्र मुखातून झाल्यामुळे त्रिसरणाची व नंतर कालांतराने पंचशील त्या सोबत जोडून एकत्रित म्हणण्याची प्रथा सुरु झाली. ती आजही विद्यमान आहे.ह्या गाथेचा समावेश खुद्दकनिकायाच्या १५ ग्रंथापैकी खुद्दकपाठ या ग्रंथात आहे.
त्रिसरणाच्या सोबत पंचशील यासाठी जोडण्यात आले कारण तथागतांनी प्रथमतः पंचवर्गीय भिक्खूंना देसना देताना त्याचे महत्त्व सांगितले व त्यासोबत दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून आर्यअष्टांगिक मार्ग कथन केला,ते सर्वांसाठी शिलाचरणाचे महत्त्वाचे अंग आहे,म्हणून त्रिसरणासोबत त्याची प्रतिज्ञा घेतली जाते.
समाजात सर्वसामान्य व्यक्ती कडून नेहमीच विचारली जाणारी शंका म्हणजे, जीवनातील निरनिराळ्या प्रसंगी त्रिसरण व पंचशील म्हणण्याची काय भूमिका आहे? याचे उत्तर म्हणजे दुःखमुक्तीसाठी आर्य अष्टांगीक मार्ग म्हणजेच मध्यम मार्ग महत्त्वाचा जसा आहे, तसाच त्याची प्राथमिक गरज म्हणजे पंचशीलाचे पालन व बुध्द, धम्म,संघास शरण जाणे किंवा अनुसरण करणे होय.त्रिसरणाशिवाय दुःखमुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करणे अशक्य आहे. बुध्द,धम्म व संघ हे जगातील अनमोल असे रत्न समजले जाते त्यांची तुलना इतर कुठल्याही गोष्टींसी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अतुलनीय समजले जाते. कारण असंख्य कल्पानंतर बुध्द निर्माण होत असतात,व तेच धम्म प्रवर्तित करतात किंवा सामान्य जणांना सांगतात व अशा धम्माचे अनुसरण करणारा अर्हतांचा संघ असतो,ज्या संघात भगवान बुध्दाचा समावेश असतो. म्हणून बुध्द,बुध्दाचा धम्म व बुध्दाचा संघ स्रुष्टीत आदर्शवत असतो. म्हणून त्रिसरण व पंचशील हे सर्व गाथांचा पाया समजला जातो यासाठी त्रिसरण व पंचशीलाचे पठण सर्वच प्रसंगी केले जाते.
दुसरे असे की,संघ म्हणजे भगवान बुध्दाच्या काळात त्यांच्या महापरिनिर्वाणसमयी विद्यमान असणारा अर्हतांचा संघ व अशा संघाला सरण जाणे या उध्देशाने संघं शरणं गच्छामि म्हटले जाते.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर१९५६ला दिक्षा घेण्यापूर्वी संघं सरणं गच्छामि मी म्हणणार नाही असे मुद्दाम म्हटले होते,कारण त्यांना इतरांकडून याबद्दल स्पष्टीकरण हवे होते. बोधिसत्वांना ह्या सर्व गोष्टीची माहीती होती पण त्यांचे समाधान त्या काळातील दिक्षेसाठी उपस्थित असलेल्या भिक्खू संघाने केली नाही. सरतेशेवटी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी संघं सरणं गच्छामि याचाही उदघोष केला.कारण त्या संघात भगवान बुध्दाचा सुध्दा समावेश असतो. म्हणून भिक्खू, उपासक,सामान्य ग्रुहस्थ हे सर्वजण त्रिसरण व पंचशील याचे पठण समाजातील निरनिराळ्या प्रसंगी अग्रक्रमाने करतात हे त्याचे अत्यंत महत्व आहे.
सर्वांचे मंगल हो।