Young Dhamma Sewak"

Young Dhamma Sewak" Only Dr.Babasaheb Ambedkar's And Gautam Buddha's Dhamma...

22/08/2017

आजच्याच दिवशी म्हणजे २२/०७/१९४२ साली राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला एक ब्रीदवाक्य दिलं, ते म्हणजे...
" #शिका!
#संघटित_व्हा!!
#संघर्ष_करा!!! "
आज त्या गोष्टीला बरोबर ७५ वर्षे पूर्ण झाली.
या #पंचाहत्तरीनिमित्त_विश्वरत्न_ज्ञानाच्या_राजा_डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!!!

27/07/2017

नागपंचमी आणि बौद्ध धम्म....

भगवान बुद्धांचा पवित्र संदेश ज्या नागलोकांनी संपुर्ण भारतभर पसरवला त्या नागलोकांचा हा सण ,

नाग लोक भगवान बुद्धाचे उपासक होते...

💥💥💥💥💥

नागपंचमीचा संबंध “नाग” या सर्पाशी नसून,

नाग हे “टोटेम” असणाऱ्या पाच पराक्रमी नाग-राजांशी आहे.

त्यांची स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती.

🌷🌷🌷🌷🌷

यामध्ये अनंत हा सर्वात मोठा.

जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.

त्यानंतर दुसरा वासुकी नागराजा हा कैलास मानसरोवर क्षेत्राचा प्रमुख.

🌼🌼🌼🌼🌼

तिसरा नागराजा तक्षक, ज्याचे स्मृतीत आज पाकिस्थानातील तक्षशीला आहे.

चवथा नागराजा करकोटक तर पाचवा ऐरावत (रावी नदीच्या शेजारी).

या पाच नागराजांची गणराज्ये ऐकमेकांच्या राज्याला लागून होती.

💞💞💞💞💞

त्यांच्या क्षेत्रातील लोकांनी या पांच पराक्रमी राजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जो दरवर्षी उत्सव आयोजित केला तो नागपंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला.

त्याचे अनुकरण देशातील अन्य प्रांतातील लोकांनी केले.

🐾🐾🐾🐾🐾

नागपंचमी हा उत्सव देशभर साजरा होऊ लागला...

यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर सापात केले.

नाग ही सापांची पंचमी झाली व नागलोकांची पंचमी लुप्त झाली.

🍁🍁🍁🍁🍁

आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला.

तरीपण आजही आपण घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलो नाही.

हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत.

🎋🎋🎋🎋🎋

धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन नागपंचमी सणाचे महत्व नागवंशीयांनी जाणावे,

यासाठीच हा पोस्टप्रपंच....

12/10/2016

*आरक्षणाबद्दल संकलीत माहिती.* (^m^) (^j^) (मनोगते)

59 जातीच्या 15 % लोकासाठी SC कॅटेगिरी...
34 जातीच्या 7 % लोकासाठी ST कॅटेगिरी...
346 जातीच्या 53 % लोकासाठी OBC कॅटेगिरी...
89 जातीच्या 25 % लोकासाठी OPEN कॅटेगिरी

जी सिस्टीम आहे ती सर्वानुमते सुरुवातीच्या काळात डॉ.राजेन्द्रप्रसाद, पंडित नेहरु, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख ,मौलाना आझाद आदींनी स्विकारलेली आहे. आजही नरेंद्र मोदी, नितीन गडकरी,मोहन भागवत,शरद पवार,प्रफुल्ल पटेल,पी. चिदंबरम, प्रणव मुखर्जी सह खुप लोकांना ते मंजुर आहे याकडे लक्ष द्यावे...

जे वरील कॅटेगिरीत बसत नाहीत ते सर्व सिख,जैन, मुसलमान,ख्रिश्चन यांना कोणतेही नुकसान न पोहचवीता अल्पसंख्याकाच्या कोट्यातून वेगळे आरक्षण दिले आहे...

काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी फक्त बौद्धांना सर्व आरक्षण दिले, आता आरक्षणाचा तक्ताच बघू...
संपूर्ण आरक्षण = 50%. त्याची विभागणी खालील प्रमाणे...
ओबीसी = 27%
NT+ ST = 10 %
SC = 13%
आता SC मधे 60 जाती त्यात 1 बौद्ध बाकीचे सर्व हिंदु म्हणजे बौद्धांना 50 % पैकी फक्त 0.21% आरक्षण आणी बाकीचे सर्व हिंदुना. तरीही उच्चवर्णीय शंख करणार की, बाबासाहेबांनी फक्त बौद्धांना सर्व आरक्षण दिले.यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!

दुसरा महत्वाचा मुद्दा - आरक्षणाच्या टक्केवारीमुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो अशी आरोळी ठोकणारे काही महाभाग आहेत. त्यांच्यासाठी...

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक नसावे असे निर्देश दिले आहेत. NSSO च्या आकडेवारी(2006) नुसार देशातील सुमारे 25% लोकसंख्या SC/ST प्रवर्गात मोड़ते तर साधारणत: 40% च्या आसपास OBC प्रवर्ग. म्हणजे निव्वळ साधे बेरजेचे गणित लावले तरी सुमारे 65% लोकसंख्या मागास म्हणून गणली जाते. 65% मागास समाजासाठी 50% आरक्षण म्हणजे उरलेल्या 35% लोकसंख्येसाठी 50% जागा खुल्या प्रवर्गातून आहेत. ह्याचा अर्थ जितक्या जागा खुल्या प्रवर्गासाठी असायला हव्यात त्याहून अधिकच जागा उपलब्ध आहेत. तेव्हा खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो ही बोंब मारण्यात कसले आले आहे लॉजिक?

SECC २०११ च्या रिपोर्टनुसार SC / ST लोकसंख्येत (SC 18.46%, ST 10.97%) मध्ये वाढच झाल्याचे निदर्शनास आले आहे . त्यामुळेच इथे जे ३५% ला ५०% चे प्रमाण आहे त्यातून हेच अजून सिद्ध होते कि मागास प्रवर्गातील "मेरिटहोल्डर" खुल्या प्रवर्गातून जरी पुढे आले तरी ह्या प्रमाणानुसार मागासेतर लोकांवर कोणताही अन्याय होतो असे सिद्ध होत नाही.

तूम्हाला व तूमच्या परिवाराला🙏🙏🙏🙏🙏🙏60 धम्मचक्र प्रर्वतन दिन🌹🌹🌹🌹🌹🌹आणि राजा सम्राट अशोक विजयादशमी दिनाच्या हार्दिक शूभेच्छा...
11/10/2016

तूम्हाला व तूमच्या परिवाराला
🙏🙏🙏🙏🙏🙏
60 धम्मचक्र प्रर्वतन दिन
🌹🌹🌹🌹🌹🌹
आणि

राजा सम्राट अशोक विजयादशमी दिनाच्या हार्दिक शूभेच्छा
🙏🙏🙏🙏
शूभेच्छक:-सहयोग जावळे ....
🌹🌹🌹

29/07/2016

बाबासाहेबांच्या शेवटच्या ५ वर्षातील खरी घटना.
संध्याकाळची ९ वाजताची वेळ, नानकचंद रत्तु
बाबासाहेबांना म्हणाले, मी घरी जातोय तुम्हाला पाहीजे त्या सर्व वस्तु इथे ठेवलेल्या आहेत आणखी काही पाहीजे असेल तर सांगा.,
बाबासाहेब म्हणाले जा तु पण सकाळी लवकर याच वेळेस ये. एवढं ऐकुन नानकचंद घरी निघुन गेले.
पुन्हा सकाळी बाबासाहेबांनी सांगितलेल्या वेळेस बरोबर ९ वाजता हजर झाले, बघतात तर बाबासाहेबांचे लिखाण चालुच आहे..
ते तसेच बाजुला गप्प ऊभे राहिले..साधारण १५ -२० मिनिटे झाले असतील, बाबासाहेबांची अचानक उभ्या राहीलेल्या नानकचंद वर नजर गेली आणि बाबासाहेब म्हणाले .....
नानकचंद तु अजुन इथेच ऊभा का जा लवकर आणि सकाळी लवकर ये...
हे ऐकुन नानकचंदाच्या डोळ्यात ... अश्रु तरळले ते बाबासाहेबांना म्हणाले ,,
अहो बाबासाहेब सकाळ झाली ..मी घरी जाऊन परत आलोय.
तुमची प्रकृती बरी नाही..,एवढं जागे राहुन काय लिहीताय?
बाबासाहेब म्हणाले माझा समाज झोपेत आहे मला जागीच रहावे लागणार...ज्या वेळेस तो जागा होईल, मी हे लिहीलेलं वाचेल आणि त्यानुसार वाटचाल करेल. त्या वेळेस मी झोपेन, तेंव्हा मला सुखाची झोप लागेल...
आजची समाजाची स्थिति बघुन वाटते, बाबासाहेब अजुन झोपलेच नसतील, त्यांना आजपर्यंत सुखाची झोप लागलीच नसेल ...

28/07/2016

प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी.
आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना
माझी माणसं हिच माझी श्रीमंती
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो
जगण्यासाठी लागतात फक्त
प्रेमाची माणसं.....💐💐💐💐💐

27/07/2016

🎯 *_अॅट्रोसीटी कायद्याचे काही कळते तरी काय ?_*

हा लेख माझा नाही , हा लेख
📋✍🏻 *अनिल वैद्य* यांचा आहे , मी आपल्या पर्यंत हि माहिती पोचवत आहे कोणाला काही तक्रार असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावा


👉 अॅट्रोसीटी कायदा रद्द करा, म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना कायदा तरी कळतो काय ? हा कायदा का केला हे ह्यांना माहीती तरी आहे काय ?
👉 संविधानाने कलम १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केली, ही तरतूद आहे. या तरतुदीचे पालन केले नाही तर उपाय योजना म्हणून हा कायदा केला.
👉 संविधानात कलम १५ ने जात, धर्म या आधारे सरकारला कुणाशी भेद करता येत नाही, कुणाला जाती, धर्माच्या कारणाने सार्वजनिक स्थळी, हॉटेल, विहीर, शाळा ईत्यादी स्थळी प्रवेश नाकारता येत नाही. अशी तरतूद केली आहे.
👉 या संविधानिक तरतुदीचा भंग केला तर त्याला शिक्षा म्हणून अॅट्रॉसीटी कायदा केला आहे.
👉 जो पर्यंत संविधानात कलम १७, कलम १५ आहेत तो पर्यंत हा कायदा रद्द होऊ शकत नाही. या कायद्याचे मूळ संविधानात आह, हे तरी कळते काय ?
👉 आधी नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ ला आला. तो आजही लागु आहे. परंतु त्यातील तरतुदी अत्याचाराचा प्रतिबंध करण्यास पुरेशा नसल्याने अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मध्ये करण्यात आला. तो ३०/१/१९० पासून लागु झाला.
👉 त्या नंतर तरी जातीय अत्याचारास प्रतिबंध झाला का ?
नाही ...
👉 त्या नंतरच नागपूरचे मनोरमा कांबळे हत्या प्रकरण घडले. आरोपी निर्दोष सुटले.
👉 खैरलांजी प्रकरणात आरोपींना भा. द. वी. अंतर्गत शीक्षा झाली. परंतु अॅट्रोसीटी कायद्या मधून निर्दोष सोडलं.
👉 या कायद्याने आरोपीला शिक्षा जर होत नसेल, याचा अर्थ हाच की हा कायदा योग्य प्रकारे राबविल्या जात नाही.
👉 पोलीस स्टेशनला अॅट्रोसीटीची तक्रार, मोर्चा नेल्या शिवाय नोंदविली जात नाही. शिक्षा तर 3 टक्के ही नाही.
👉 विविध ऊच्च न्यायालायाचे असे काही निर्णय आहेत की आरोपीलाच फायदा होईल. आज पर्यंत या कायद्या अंतर्गत समित्या स्थापन केल्या नाहित, अनुसूचित जाती आयोगाने कधी कुणाला धारेवर धरले नाही, असे असतांना या कायद्याचा दुरुपयोग केला जातॊ अशी ओरड करणाऱ्यांना कायदा तरी कळतो काय ?
👉 मी यांना विचारतो, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग होत नाही काय ? कोणत्या कायद्याचा दुरुपयोग केला जात नाही ? जवळ जवळ सर्वच कायद्याचा दुरुपयोग केला जातो. भा. द. वी. चा सुध्दा लोक दुरुपयोग करतात. मग भा. द. वी. रद्द करणार काय ?

📋✒ *अनिल वैद्य, माजी न्यायाधीश*

25/07/2016

सैराट के बाद अब कबाली का जादू!
कबाली भारतीय फिल्म इतिहास में पहले दिन सबसे ज्यादा कारोबार करने वाली फिल्म बन गई है. पहले दिन की कमाई है 40 करोड़ रुपये. इससे पहले पहले दिन सबसे ज्यादा कमाई करने वाली फिल्म सुल्तान थी.
कबाली को जनता पसंद कर रही है. फिल्म समीक्षकों, पत्रकारों, संपादकों को पसंद नहीं आ रही है.
वजह -
1. फिल्म का हीरो रजनीकांत फिल्म में आंबेडकर को अपना आदर्श मानता है.
2. रजनीकांत जो स्कूल चलाता है, उसमें सबसे बड़ी तस्वीर बाबा साहेब की है.
3. फिल्म का हीरो काला है और इस बात को वह गर्व से कहता है.
4. हीरो कहता है कि भारत के लोग विदेश पहुंच गए, पर जाति लेकर गए.
5. हीरोईन जाति तोड़कर प्रेम और फिर शादी करती है.
और भी कई वजहें हैं... देख लीजिए यह फिल्म. हिंदी में भी है.

06/05/2016

बाबासाहेबामुळे तझे काॅलर टाईट आहे चळवळीच्या शत्रुशी रोज फाईट आहे झोपङी सोङून परक्याच्या हवेलीत शिरू नको स्वातंत्र्यापेक्षा गुलामी हजारोपट वाईट आहे

05/04/2016

💧आवश्यक वाचाच💧

🔹दुष्काळ कधी पडला नसता कधी जर डॉ बाबासाहेब यांचे ऐकले असते तर🔹

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आणि

नदीजोड प्रकल्प

➖➖➖➖➖➖➖

💧 ज्याला पाण्यापासून ठेवले होते वंचित, त्याच नेत्याने सर्वप्रथम मांडली "नदीजोड संकल्पना"...

💧 जगात तिसरे महायुद्ध हे पाण्यावरुन होईल असे अनेक तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत.

याचे भान 2015 मध्ये सरकारला आले आणि नदीजोड प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

💧 कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांना एकमेकांशी जोडून 17 सप्टेंबर रोजी देशात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

💧 मात्र नदीजोड प्रकल्प ही कल्पना आजची नाही तर पुढील 50 वर्षांनंतर देशाची लोकसंख्या किती असेल आणि त्यासाठी किती पाणी लागेल याचे नियोजन एका द्रष्ट्या नेत्याने स्वातंत्र्याआधीच केले होते. त्यांचे नाव
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर."

💧 ज्यावेळी उत्तर भारतात महापूर असतो तेव्हा महाराष्ट्रात पाण्याची चिंता सतावत असते.

एवढेच काय कोकणात लाखो लिटर पावसाचे पाणी वाहून जाते आणि मराठवाडात बाई हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत असते.

💧 आज आपण जल आणि ऊर्जासाक्षरता या शब्दांचा सर्रास प्रयोग करतो
पण, या शब्दांमागील भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्येच व्यक्त केली होती.

💧 पाण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा हा "नदीजोड प्रकल्प"च असल्याचे त्यांनी सांगून ठेवले होते.

हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शतकोत्तर रौप्यमोहत्सवी जयंती वर्ष म्हणून देशभर साजरे होत आहे.

💧 केंद्र सरकारने देखील त्याची जय्यत तयारी केली आहे आणि याच वर्षी नदीजोड प्रकल्पाला सुरुवात व्हावी हा मोठा योगायोग आहे.

💧 ज्या समाजाला हजारो वर्षे पाण्यापासून दूर ठेवले वंचित ठेवले...
त्याच समाजातील बाबासाहेबा आंबेडकरांनी देशवासीयांना मुबलक पाणी आणि वीज मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

2000 मध्ये भारताला किती पाणी लागेल याचे नियोजन त्यांनी त्याच वेळी केले होते.

💧 पाण्यापासून ठेवले होते वंचित, त्याच नेत्याने सर्वप्रथम मांडली नदीजोड संकल्पना...

कधी झाला पहिला प्रयत्न

💧 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसरायच्या मुंबई कौन्सिलचे सदस्य असतांना पाण्याचे व सिंचनाचे नियोजन कसे करावे याचा आराखडा तयार केला होता.

केंद्रीय पाटबंधारे मंत्री होते तेव्हा त्यांनी नदीजोड प्रकल्प आणला होता. दामोदर व्हॅली प्रकल्प, शेतीविषयी योजना आणि वीज याबद्दल आपले धोरण स्पष्ट केले होते.

💧 डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक हरी नरके म्हणतात,
"ज्या समाजाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले, त्याच समाजातील बाबासाहेबांनी देशवासियांसाठी पाण्याचे नियोजन करणे हा काळाने घेतलेला वेगळ्या प्रकारचा 'सूड' आहे."

💧 केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणला.

दामोदर, महानदी, कोसी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प त्यांनी हाती घेतले.

💧 आज ज्याप्रमाणे उत्तर भारतात पूरस्थिती असते तेव्हाही तिच स्थिती होती. या पूराचा सकारात्मक उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने मोठे विद्युत प्रकल्प उभारावेत.

नद्यांना कालवे काढून दुष्काळी भागात पाणी घेऊन जावे, धरणे बांधून समुद्रात जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीला, उद्योगधंद्यांना करता येईल व पुरात होणारी जीवित आणि आर्थिक हानी टाळता येईल याकडे
डॉ. आंबेडकरांनी सरकारचे लक्ष वेधले होते.

आज ज्या राज्यांमध्ये मुबलक पाणी आणि वीज आहे त्या राज्यांची भरभराट होताना दिसत आहे.
उद्योगांचे प्राधान्य अशाच राज्यांना आहे.

ही काळाची पावले बाबासाहेबांनी ओळखली होती.

💧 1942 मध्ये त्यांनी सिंचन, वीजनिर्मीती, जलवाहतूकीचा विकास आणि विस्तार या गोष्टी एकमेकांना पुरक असल्याचे सांगत त्यांच्या विकासावर भर देण्याचे सुचवले होते.

एका भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, या देशातिल लोकांना स्वस्त वीज नको आहे,
तर, जगातील सर्वात स्वस्त वीज या देशातील लोकांना मिळाली पाहिजे...

💧 डॉ. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीबद्दल अमेरिकन अभ्यासकाने लिहून ठेवले आहे.

प्रो. हर्ट या अमेरिकन अभ्यासकानं त्यांच्या पुस्तकात भारतात पाटबंधारे विकास आणि व्यवस्थापनाची राजकीय इच्छाशक्ती डॉ. आंबेडकर या मंत्र्यांनी दाखविली नसती तर पुढची 25-30 वर्षे भारतात या क्षेत्राचा विकास खुरटला असता, असे म्हटले आहे.

💧 नदीजोड प्रकल्पाची संकल्पनाही देशात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनींच 1942 मध्ये मांडली होती.

💧🌧☔💦💧

कल दौड़ा पूरा दिल्ली बाबा साहब के नाम पर ....किसी भी मीडिया ने नही दिखाया आखिर क्यू ????????👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
04/04/2016

कल दौड़ा पूरा दिल्ली बाबा साहब के नाम पर ....किसी भी मीडिया ने नही दिखाया आखिर क्यू ????????👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

धम्मसेवक परिवाराकडून शिवजयंति मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली , विशेष बाब म्हणजे कन्नड शहरामधे इतक्या शांतते मध्ये व क...
23/02/2016

धम्मसेवक परिवाराकडून शिवजयंति मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली , विशेष बाब म्हणजे कन्नड शहरामधे इतक्या शांतते मध्ये व कुठल्याही प्रकारचे नृत्य न करता ही शिवजयंती धम्मसेवक परीवाराने आयोजित केली होती , सजीव देखावा , ढोल पथक , शांतता , संयम , सर्व महापुरुषाच्या पुतळ्यास अभिवादन करुण शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली होती , यावेळी , रवि आढाव (अध्यक्ष) अमित जाधव (उपध्यक्ष)
निलेश निकाळजे (सचिव) जीतू सिरसाठ , सुनील कांबळे विक्की म्हस्के , विशाल तेलुरे , दिपक भालेराव, शिवराज तेली, विशाल मोरे , अमोल सिरसाठ , प्रकाश देहाडे ,भारत पवार , रवि भालेराव , योगेश देशमुख , दिपक कुमावत , पाटिल सर , पवन पंडित , ललित गायकवाड , इ

Address

Kannad
Aurangabad
431103

Telephone

+918793878281

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Young Dhamma Sewak" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share