धम्मदेसना

धम्मदेसना बुध्द धम्म संघ की विस्तृत जानकारी

गुढी पाडवा और बुद्ध धम्म से जुड़े मुख्य बिंदु:ऐतिहासिक बौद्ध संदर्भ: महाराष्ट्र के कई बहुजन और बौद्ध लोग गुढी पाडवा को श...
19/03/2026

गुढी पाडवा और बुद्ध धम्म से जुड़े मुख्य बिंदु:
ऐतिहासिक बौद्ध संदर्भ: महाराष्ट्र के कई बहुजन और बौद्ध लोग गुढी पाडवा को शालिवाहन (सातवाहन) राजाओं की याद में मनाते हैं, जिन्हें बौद्ध धर्म का अनुयायी माना जाता है।
शालिवाहन शक: कुछ मान्यताएं इस दिन को शालिवाहन शक संवत की शुरुआत मानती हैं, जो एक बौद्ध राजा की विजय का प्रतीक है।
विजय पताका: गुढी का अर्थ है 'विजय पताका'। ऐतिहासिक रूप से इसे बुराई पर अच्छाई और सांस्कृतिक गौरव के प्रतीक के रूप में देखा जाता है।
परंपरा में भिन्नता: हिंदू मान्यताओं में इसे ब्रह्मा द्वारा सृष्टि की रचना या राम की विजय के रूप में मनाया जाता है, जबकि बौद्ध परिप्रेक्ष्य में इसे एक ऐतिहासिक और सांस्कृतिक बौद्ध दिवस के रूप में देखा जा सकता है।
संक्षेप में, #गुढी_पाडवा का पारंपरिक उत्सव बहुआयामी है, जहाँ एक ओर यह हिंदू नववर्ष की शुरुआत है, वहीं महाराष्ट्र के बौद्ध इतिहास में यह शाक्यवंशी राजाओं की विजय से भी जुड़ा है।

*🔹 , #फाल्गुन  #पौर्णिमा*🔹       फाल्गुन पौर्णिमेला पाली भाषेत 'फग्गुन मासो' म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः मार्च महिन्या...
10/03/2026

*🔹 , #फाल्गुन #पौर्णिमा*🔹
फाल्गुन पौर्णिमेला पाली भाषेत 'फग्गुन मासो' म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः मार्च महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या पुढील प्रमाणे.
*▪️ कपिलवस्तूस भगवंतांची भेट*▪️
भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर राजा शुद्धोदनाने निरोप पाठविला की," मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे.त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही."
पित्यासमोर भगवंत बसताच राजा शुद्धोदनाच्या भावना उचंबळून आल्या. त्याला स्वतःच्या मुलाचा अभिमान वाटत होता.तो दुःखात आनंद आणि आनंद दुःख म्हणू लागला. पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या.
शुद्धोधन म्हणाला," मी तुला माझे राज्य देईल, तरी ते तू मातीमोल मानशील". यावर भगवंत म्हणाले," आपल्या पुत्राबद्दल आपणास अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो.पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेम बंधनांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्राशी जखडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल."
*▪️ पुत्र राहुलची धम्मदीक्षा.*▪️
सारिपुत्त यांच्याकडे वळून भगवंत म्हणाले," माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी देऊ शकत नाही,परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मी मात्र त्याला देऊ शकेल."
राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले," सोने, रूपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु अध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व जतन करण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे अध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय???
*▪️ नंद याची धम्मदीक्षा.*▪️
सिद्धार्थ गौतमाचा सावत्र व मावस भाऊ म्हणजे नंद.तो महाप्रजापती गौतमीचा पुत्रत्न होता.महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थास दुग्धपान करविले आणि आपले बाळ नंद यास दाईच्या हवाली केले.नंदला योग्य वळणावर आणण्यासाठी बुद्धांनी प्रयत्न केला.नंदची प्रवज्जा ही फाल्गुन पौर्णिमेला झाली होती.
अशा या फाल्गुन पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा🌹🌹🌹
( संदर्भ- भीमनिर्णय दिनदर्शिका,2020,माहे- मार्च.)

🔹ग्रीकांचा पुनरोदय.🔹    ◾भाग-३◾• मूळ सर्वास्तीवाद्यांच्या विनयपिटकाच्या तिबेटी आवृत्तीमध्ये(वायव्य प्रदेशातील) औदुंबराची...
20/02/2026

🔹ग्रीकांचा पुनरोदय.🔹
◾भाग-३◾
• मूळ सर्वास्तीवाद्यांच्या विनयपिटकाच्या तिबेटी आवृत्तीमध्ये(वायव्य प्रदेशातील) औदुंबराची राजधानी बौद्धधम्माचा गढ असल्याचे नमूद केले आहे.
• #प्राझुल्स्की च्या म्हणण्यानुसार औदुंबरांनी सांस्कृतिक आणि भौतिक दृष्टीने खूप प्रगती केली होती आणि ते इ.स.च्या पहिल्या शतकातील महत्त्वाचे #बौद्धधम्म प्रचारक होते.
• रूपर येथील उत्खननात सापडलेल्या औदुंबरांच्या काही नाण्यांवर बौद्ध स्तूप उत्किर्ण केलेले आहेत. त्यावरून या भागातील समाज आणि #औदुंबर ही बौद्ध धर्माचे #प्रचारक होते ही दिसून येते.
• #कुलींद म्हणजे श्रृघ्न(सुग) येथील राजा धनभुतीच्या राजघराण्यातील वंशज होता असे अलेक्झांडर कॅनिंगहमने मांडले आहे.
• हिमाचल प्रदेशातील पर्वतराजीमधील #कनेट हे कुनिंदच असून ते वाढत्या आक्रमणामुळे पर्वतमय प्रदेशात स्थलांतरित झाले असावे.
• #बियास आणि टोन्स या नद्यांच्या मधल्या प्रदेशात जवळपास दोन तृतीयांश लोकसंख्या कनेट या समाजाची आहे.
• कुनवर किंवा किन्नरची ही उत्पत्ती कनेट मधूनच झाली आहे.
• कुलु खोरे,सिमला,किनौर या प्रदेशांमध्ये त्यांची संख्या ५८ ते ६७ % पर्यंत आहे.
• महत्त्वाची बाब म्हणजे किन्नर #कांगडा (कुले) आणि #लाहोर जिल्ह्यातील हे लोक मोठ्या प्रमाणात आजही बौद्धधर्मीय आहेत.

संदर्भ:
#भारतातील #बुद्धधम्माचा #इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२७२.

🔹ग्रीकांचा पुनरोदय.🔹      ◾भाग -२◾• बौद्ध झाल्यावर  #मिलिंद बुद्धधम्माचा कडवा प्रचारक झाला.• त्याने  #सागल (हल्लीचे सिया...
20/02/2026

🔹ग्रीकांचा पुनरोदय.🔹
◾भाग -२◾
• बौद्ध झाल्यावर #मिलिंद बुद्धधम्माचा कडवा प्रचारक झाला.
• त्याने #सागल (हल्लीचे सियालकोट) येथे महाकाय विहार बांधून भन्ते नागसेन आणि इतर भिक्खूंच्या निवासाची सोय केली.
• इतर ठिकाणच्या संघांनाही त्याने भरपूर दान दिले.
• शिनकोट येथील अभिलेखानुसार मिलिंदराजाने बुद्धधम्माच्या प्रचारासाठी भरीव मदत केली असल्याचे नमूद केले आहे.
• बाजौर नजीकच्या या शिनकोट येथे एक अस्थिधातुंचा कलश सुद्धा सापडला आहे.
• त्या कलशावर #खरोष्टी लिपीमध्ये मिलिंद काळात होऊन गेलेल्या विजयमित्राचे नाव कोरलेले आहे.
• मिलिंदच्या नाण्यांवर #धम्मचक्र कोरलेले आहे. त्यावरून तो ही अत्यंत श्रद्धावंत बौद्ध उपासक होता हे दिसून येते.
• ग्रीकांचा प्रभाव कमी झाल्यावर पंजाब प्रांत छोट्या-छोट्या राज्यांमध्ये विभागला गेला.त्या लोकांवर स्थानिक लोकांनी राज्य केले.
• त्यापैकी किमान औदुंबर आणि कुणींद यांचा उल्लेख #बौद्ध वाङ्मयात आढळतो.
• औदुंबरांनी गुरुदासपूर आणि होशीयार पूर या बियास खोऱ्याच्या उर्ध्वभागात राज्य केले.
• कुणींदांनी #सतलज आणि यमुना खोऱ्यांच्या लुधियानापासून सहारनपूर पर्यंतच्या भूभागावर राज्य केले.

🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२७१.)🔹

🔹 ग्रीकांचा पुनरोदय.🔹• इ.स.पू.२३२ साली सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर मौर्य साम्राज्याला हळूहळू उतरती कळा लागली.• इ.स....
20/02/2026

🔹 ग्रीकांचा पुनरोदय.🔹
• इ.स.पू.२३२ साली सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर मौर्य साम्राज्याला हळूहळू उतरती कळा लागली.
• इ.स.पू.१८५ च्या आसपास #मौर्य साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर बॅक्ट्रीयाच्या #ग्रीक राजाने- डिमेट्रीयसने भारतावर स्वारी केली.
• गांधार(तक्षशिला) काबीज केल्यानंतर त्याचे दोन सेनापती अपोलोटोस आणि #मिनांडर (मिलिंद) यांनी अनुक्रमे(अंदाजे इ.स.पू.१७५ साली) उज्जैन आणि पाटलीपुत्र ताब्यात घेतले.
• त्यानंतर मिलिंद गांधार प्रांतात परतला आणि आपली राजधानी त्यांनी साकल किंवा सागल (सियालकोट) येथे स्थापन केली.
• इ.स.पू.१६६ मध्ये #डिमेट्रीयस मृत्यू पावला आणि इ.स.पू.१६१ मध्ये अपोलोडोटस हा त्याचा जवळचा नातेसंबंधी वारला तेव्हा मिनांडरने पंजाबमध्ये आपले साम्राज्य स्थापन केले.
• या साम्राज्यात गांधार, सिंध आणि पंजाबचा समावेश होता.
• त्याची राजधानी ही बौद्धधर्मीयांचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होती.
• मिलिंद स्वतः विद्वान होता परंतु भारतीयांशी तात्विक चर्चा केल्यानंतर तो निराश झाला होता.
• भारत देश तत्वज्ञानाच्या दिशेने निव्वळ कस्पट असल्याचा त्याचा आरोप होता.
• योगायोगाने एकदा त्याचा आणि बौद्ध स्थविर #नागसेन याचा वाद झाला. या वादानंतर विद्वान मिलिंदच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक तत्वकुशल स्थविर नागसेन यांनी केल्यानंतर राजा मिलिंद बुद्धधम्माचा अनुयायी झाला.
• हा संपूर्ण संवाद आणि, सियालकोटची भौगोलिक पार्श्वभूमी,बौद्ध अनुपिटक साहित्यातील #मिलिंद_प्रश्न (मिलिंद पन्ह) या सुप्रतिष्ठित धर्मग्रंथात सविस्तर नोंदविलेला आहे.

🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२७१.)🔹

🔹सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹    ◾भाग-५◾• सम्राट अशोकाच्या नंतरही स्थानिक राजघराण्यांनी बुद्धधम्माचा प्रचार-प्रसार केला...
18/02/2026

🔹सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹
◾भाग-५◾
• सम्राट अशोकाच्या नंतरही स्थानिक राजघराण्यांनी बुद्धधम्माचा प्रचार-प्रसार केला.
• शृघ्न किंवा आधुनिक सुघ या ठिकाणी राज्य करणाऱ्या #धनभूती या प्रसिद्ध राजाचे राज्य १००० मैलाच्या परिघात पसरले होते.
• त्याने इ.स.पू.२४० ते २१० पर्यंत राज्य केले.
• या बौद्ध राजाने आपल्या राज्यात स्तूप,विहार तर उभारलेच,त्याशिवाय मध्यभारतातील भारहूत येथे इ.स.पू.२५० ते २०० या काळात उभारलेल्या स्तूपास सुद्धा सढळ हाताने दान दिले.
• भारहुत येथे सापडलेल्या एका लेखावरून राजा धनभूतीने भारहुत स्तूपाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या उभारणीसाठी संपूर्ण खर्च दिला होता.
• कदाचित इतर तीन प्रवेशद्वारांचे दान सुद्धा राजा धनभूतीनेच दिले असावे असे अलेक्झांडर कनींगहम चे मत आहे.
• सम्राट अशोकापासून प्रेरणा घेऊन राजा धनभूतीने आपल्या या राजधानीच्या सुघ(शुघ्न) शहरात व सभोवताच्या सभोवताली अनेक स्तूप उभारले होते.
• ह्यु-एन-त्संगने लिहून ठेवले आहे की अशोकाच्या स्तूपाशिवाय सारिपुत्त आणि मोग्गलायनाच्या शरीरावशेषांवर स्थापलेले स्तूप त्याने येथे पाहिले.
• त्यापैकी एक छोटा स्तूप जगध्रीपासून तीन किलोमीटर अंतरावरील चनेती येथे कुरुक्षेत्र विद्यापीठातील देवेंद्र हांडा यांनी शोधून काढला आहे. हा स्तूप धनभुतीने बांधला असावा.
• आणि धनभुतीने बांधलेल्या अनेक स्तूपापैकी तो एक असावा असे मत त्यांनी मांडले आहे.
• धनभूतीचा पुत्र वधपाल (इ.स.पू.२१०) आणि त्याचा पुत्र धनभुती दुसरा(इ.स.पू. १८०) यांनीसुद्धा पंजाब बाहेरच्याही #बौद्ध विहारांना देणगी दिल्याचे उल्लेख भारहुत आणि मथुरा येथील शिलालेखात आढळून येतात.
🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२७०.)🔹

🔹 सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹   ◾भाग -४◾• मौर्य साम्राज्याच्या वायव्य प्रातांचे मुख्य ठिकाण तक्षशिला अखंड भारताच्या पा...
18/02/2026

🔹 सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹
◾भाग -४◾
• मौर्य साम्राज्याच्या वायव्य प्रातांचे मुख्य ठिकाण तक्षशिला अखंड भारताच्या पाकिस्तानात गेलेल्या भागात आहे.
• या तक्षशिला येथेच स्वाभाविकपणे बौद्धधर्माचे मोठे केंद्र सम्राट अशोक यांच्या काळात होते.
• ह्यु-एन-त्संगने तक्षशिलाच्या परिसरात लाहोर पासून ५५ कि.मी. वरील नरसिंह(आधुनिक रान्शी),तकी(गुजरातच्या नवादा जिल्ह्यातील आधुनिक असरूर),साकल (आधुनिक सियालकोट), सिंहपुरी(पिडदादात खान पासून२५ किलोमीटर अंतरावर असलेले आधुनिक केटस), तक्षशिलेपासून आग्नेय दिशेला ४० किलोमीटरवर असलेले मानिक्यला आणि खुद्द तक्षशिला येथे दोन महाकाय स्तूप पाहिल्याचे त्याने लिहून ठेवले आहे.
• पंजाबमधील सर्व महत्त्वाच्या स्मारकावशेषामध्ये #तक्षशिला येथील धर्मराजिक स्तूप सर्वात महत्त्वाचा आहे.
• अशोकाने हा #स्तुप,त्याने जे तथागतांच्या पवित्र अस्थी धातूंवर बांधलेले सात स्तूप होते ते उघडून, त्यातील धातूंवर आपल्या साम्राज्य क्षेत्रात जे ८१ हजार स्तूप बांधले होते, त्यापैकी एक धर्मराजिक स्तूप असावा,असे वाटते.
• या स्तूपामध्ये दोन धातूपेटिका सापडल्या होत्या.
• पंजाबमधील अंबाला शहराजवळच्या टोपरा या गावात सम्राट अशोकाने स्थापलेला एक #स्तंभ सापडला होता.
• इ.स.पू.२४३ मध्ये स्थापलेल्या या स्तंभावरील लेखांमध्ये अशोकाच्या धम्मविजयासंबंधी ७ राजाज्ञा खोदविलेल्या होत्या,ज्या गांधार प्रांतातील प्रजाजनांसाठी मार्गदर्शक होत्या.
• या सात राज्याज्ञामधील विषय धर्मपालनाबद्दलचा उपदेश,धम्मपालन म्हणजे काय याबद्दल उपदेश, अकुशल कर्माविरुद्ध जागृत राहण्याबद्दल उपदेश, राज्जूकांचे कर्तव्य, प्राणीमात्रांची हत्या आणि दुखापतीला प्रतिबंधककारक उपदेश, धम्मलेख लिहिण्यामागील अशोकाची भूमिका, अशोकाच्या आयुष्यभराच्या कार्याची समीक्षा आदि विषयांचा अंतर्भाव होता.
• अशाप्रकारे अशोकाने पंजाबमधील आपल्या प्रजाजनांमध्ये बुद्धधम्माची रुजवण व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केल्याचे दिसून येते.
• हा शिलास्तंभ इ.स.१३५६ साली फेरोजशाहा तुघलक यांनी टोपरा येथून हालवून तो दिल्ली येथे फिरोजशहा कोटला या ठिकाणी स्थापन केला आहे.
🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२७०.)🔹

🔹 सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹     ◾भाग-३◾• इ.स.६२० ते ६४४ पर्यंत भारताच्या बौद्धधम्म स्थानांना भेट देण्यास आलेल्या ह्य...
18/02/2026

🔹 सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹
◾भाग-३◾
• इ.स.६२० ते ६४४ पर्यंत भारताच्या बौद्धधम्म स्थानांना भेट देण्यास आलेल्या ह्यु-एन-त्संग या #बौद्ध भिक्खूने लिहून ठेवलेल्या हरकतीवरून त्याने पंजाब,हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात किमान पाच ठिकाणच्या मोठ्या बौद्ध-धर्मीय केंद्रांना भेट दिल्याची आणि त्या ठिकाणी #बुद्धविहार,स्तूप आणि स्तंभ पहिल्याची माहिती मिळते.
• त्यांनी केलेल्या नोंदीनुसार पाहिलेली स्थळे खालील प्रमाणे आहेत.
स्थळ- आजची ओळख
१. सतद्रू -आधुनिक सिरहिंद(पंजाब)
२. स्थानेश्वर-आधुनिक ठानेसर(हरियाणा)
३. शृघ्न-सुघ (हरियाणातील जगद्री नजीक.)
४. कुलुट-कुल्लु (हिमाचल प्रदेश.)
५. ताम्सवन-सुलतानपूर किंवा रघुनाथपूर (हिमाचल प्रदेश)
• सम्राट अशोकाने तथागतांच्या आणि #प्राचीन बौद्धांच्या जीवनातील घटकांशी संबंधित स्थळांवर हे स्तूप आणि स्मारकस्तंभ उभे केले होते.
• ह्यु-एन-त्संग च्या म्हणण्यानुसार सिरहिंदचा स्तूप हा ज्या ठिकाणी पूर्वीच्या चार बुद्धांनी स्थान ग्रहण केले आणि थांबले त्या ठिकाणी बांधला होता.
• ठाणेश्वरच्या स्तूपामध्ये तथागतांच्या अस्थि ठेवलेल्या होत्या.
• सुघ येथील स्तूप; ज्या ठिकाणी तथागतांनी सामान्य जनांना #धम्मदेसना देऊन दीक्षा दिली होती,त्या ठिकाणी अशोकाने बांधला होता.
• तथागतांच्या कुलूभेटीच्या स्मरणार्थ कुलू येथे एक स्तूपदेखील चार प्राचीनकालीन बुद्धांच्या निवासस्थानावर बांधले होते.

🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२६९.)🔹

🔹 #सम्राट_अशोक धम्म प्रचार.🔹   ◾भाग - २ ◾• त्यामधीलच  #गांधार आणि योन या वायव्य प्रांतात धम्मप्रसारासाठी मज्झन्तिक आणि म...
18/02/2026

🔹 #सम्राट_अशोक धम्म प्रचार.🔹
◾भाग - २ ◾
• त्यामधीलच #गांधार आणि योन या वायव्य प्रांतात धम्मप्रसारासाठी मज्झन्तिक आणि महारक्खित या स्थविरांना पाठविले.
• या धम्मप्रसाराच्या कार्यासाठी सहाय्यभूत ठरावेत आणि धम्मविजयाची आपली राजकीय धोरणे समाजमनात रुजावी या हेतूने अशोकाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्या साम्राज्यात विविध ठिकाणी बुद्धविहारांची स्थापना केली, #स्तूप बांधले तसेच स्तंभ आणि इतर शिल्प उभारून शिलालेखांद्वारेही आपले धम्मविजयाचे धोरण राबविले.
• अशोकाचे हे #लेख स्तंभालेखाच्या रूपाने, शिलालेखाच्या रूपाने, बुद्धलेणी आणि विहारांच्या रूपाने आजही सबंध भारतात आढळून येत आहेत.
• वसाहती युरोपीयन शासकांनी आपल्या ज्ञानलालसेने यातले अनेक स्तूप,स्तंभ आणि #शिल्प व बुद्धलेणींचे उत्खनन करून ती सुरक्षित राखण्यासाठी पुरातत्व संशोधन खात्यामार्फत प्रयत्न केले आहेत.
• सम्राट अशोकाच्या या शिलाशासनांच्या अनेक प्रती उत्तरेकडील लुंबिनीपासून दक्षिणेकडील नागार्जुनकोंडा, सन्नतीपर्यंत तसेच पूर्वेकडील धौली (ओडीसा)पासून ते पश्चिमेकडे सोपारा,गिरनार आणि वायव्येकडे बामीयान पर्यंत सापडले आहेत.
• सम्राट अशोकाच्या काळात आणि नंतर जवळपास १००० वर्ष #बुद्धधम्म सबंध भारतात समाजधर्म झाला होता.
• पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश हे तात्कालीन गांधारचे प्रांत सुद्धा बुद्धमय झाले होते.

🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२६८.)🔹

🔹 सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹• ग्रीक सम्राट अलेक्झांडरने काबीज केलेला प्रदेश,तो इ.स.पु.३२५ साली मायदेशी परत गेल्यानंतर...
18/02/2026

🔹 सम्राट अशोकांचा धम्म प्रचार.🔹
• ग्रीक सम्राट अलेक्झांडरने काबीज केलेला प्रदेश,तो इ.स.पु.३२५ साली मायदेशी परत गेल्यानंतर मौर्यांच्या काळापर्यंत तक्षशिलेचा राजा अंभी, सैंधव प्रांताचा राजा पोरस आणि छोट्या-मोठ्या राजांद्वारा शासित होता.
• सम्राट अशोकांचे आजोबा #चंद्रगुप्त_मौर्य यांनी साम्राज्याचा विस्तार केल्यानंतर हा गांधार प्रांत मौर्य साम्राज्याचा भाग झाला.
• #कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने आपली शासनप्रणाली युद्धनीती ऐवजी धर्मघोषाची आणि धर्मविजयाची ठरविली.
• सम्राट अशोक बुद्धधम्मास शरण गेले आणि मानवी समता,स्वातंत्र्य,बंधुभाव आदींचा पाया ठरणारे समाजमन घडविण्यासाठी त्यांनी धर्मघोष सुरू केला.
• सम्राट अशोकाने #पाटीलपुत्र येथे तिसरी #धम्मसंगीती आयोजित करून धम्मशुद्धीकरणाची आणि नव्याने धम्मप्रचाराची मोहीम हाती घेतली.
• या मोहिमेचा भाग म्हणून भारताच्या विविध प्रांतात आणि नजीकच्या देशात धम्मप्रचारक,स्थविर भिक्षु पाठविले.

🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शं.मोरे,पान नं.२६८.)🔹

#सम्राट_अशोक

Address

C/O Mr. Kiran Gudadhe, Prashant Nagar
Amravati
444606

Telephone

7769944245

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धम्मदेसना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share