Shree Swami Samarth

Shree Swami Samarth || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

इ.स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली

. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...

आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.


अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

श्री स्वामी समर्थ
13/06/2026

श्री स्वामी समर्थ

ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll
11/06/2026

ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

01/06/2026

#स्वामीसमर्थ

ll श्री स्वामी समर्थ ll
28/05/2026

ll श्री स्वामी समर्थ ll

ll श्री स्वामी समर्थ llदत्त गुरूंच्या मंदिरात सकाळी प्रवेश करताच एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळते. ताज्या फुलांचा सुग...
18/05/2026

ll श्री स्वामी समर्थ ll

दत्त गुरूंच्या मंदिरात सकाळी प्रवेश करताच एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळते. ताज्या फुलांचा सुगंध, चंदनाचा गंध, कापूर आणि उदबत्तीचा मंद दरवळ, नुकत्याच झालेल्या पूजेमुळे तेजाळलेल्या श्रीदत्तांच्या पादुका, मंद स्वरात सुरू असलेले नामस्मरण, घंटानाद... हे सगळच कस आपल्या चित्ताला शांत करणार, मनाला स्थिर करणार आणि पंचेंद्रियांना सुखावणार असत.हो ना??

श्रीदत्तांच्या समोर उभे राहिल्यावर मनातील चिंता हळूहळू विरघळू लागतात. मीच करतो हा भाव कमी होऊन सर्व काही गुरूकृपेनेच घडते ही जाणीव अंतःकरणात दृढ होते. त्यांच्या चरणी माथा टेकवताना आपण एकटे नाही, आपल्या पाठीशी सदैव गुरूंचा कृपाहस्त आहे, असा विश्वास मनात जागृत होतो...

मंदिरात काही क्षण शांत बसून दत्तनामाचा जप करत राहिलो की मनाची धूळ झटकली जाते. काळजी, भीती, अस्वस्थता आणि ताण हळूहळू दूर होतात. मनाला धीर मिळतो, आपल्या बुद्धीला दिशा मिळते... आधार मिळतो. परिस्थिती तीच असते, पण ती स्वीकारण्याची आणि समर्थपणे जगण्याची शक्ती मिळते.

फक्त देवळात जाऊन नमस्कार करून परत आलो, एवढंच घडत नाही. श्रीदत्तांच्या दर्शनाने अंतर्मनात शांतता, विश्वास, समाधान आणि गुरूकृपेची अनुभूती जागृत होते. आपण बाहेरून रिकाम्या हाताने परतत असलो, तरी आतून नव्या उर्जेने, नव्या श्रद्धेने आणि नव्या आशेने समृद्ध होऊन परततो.

ही प्रसन्नता, ही अंतर्मनाला स्पर्श करणारी शांतता, हे सुंदर गुरुदर्शन आणि ही अनामिक कृपा लाभते, ती केवळ श्री दत्त महाराजांच्या करुणेमुळेच. तेच आपल्याला अलगद फुलासारखे सांभाळून घेतात, जीवनप्रवासात योग्य दिशा दाखवतात आणि प्रत्येक वेळी पुन्हा आपल्या चरणी आणून उभे करतात.

॥ श्री गुरुदेव दत्त ॥
ll श्री स्वामी समर्थ ll

🌹श्री स्वामी समर्थ🌹कसा असतो स्वामीभक्त…स्वतःच्या घरातली प्रत्येक नवीन गोष्ट, वस्तू, व्यक्ती, घटना स्वामींच्या पुढे सादर ...
15/05/2026

🌹श्री स्वामी समर्थ🌹
कसा असतो स्वामीभक्त…
स्वतःच्या घरातली प्रत्येक नवीन गोष्ट, वस्तू, व्यक्ती, घटना स्वामींच्या पुढे सादर करतो…तो असतो स्वामीभक्त..

दुसऱ्याच्या घरी गेल्यावर स्वामींचा फोटो दिसला की आपलाच कुलबंधू भेटल्याचा आनंद ज्याला होतो .. तो असतो स्वामीभक्त..

घरातून निघताना चला स्वामी माझ्याबरोबर असं स्वामींना सांगून जो निघतो आणि प्रचंड स्वामीबळ आपल्या पाठीशी आहे हे जो विसरत नाही .. तो असतो स्वामीभक्त..

संकटातून सुटकेसाठी धाव घेणारा ते कितीही संकटं आली तरी त्याची पर्वाच वाटेनासा होणारा.. तो असतो स्वामीभक्त..

सांसारिक सुखदुःखांची अशी भलीमोठी यादी घेऊन जाणारा… आणि कालांतराने नुसते हात जोडून नतमस्तक होऊन त्यांच्या पुढे उभा राहतो…तो असतो स्वामीभक्त..

कसा आहेस..काय चाललंय.. ह्या प्रश्नाला.. स्वामींची कृपा आहे.. हे उत्तर जो देतो.. तो असतो स्वामीभक्त..

मैं गया नही जिंदा है..ह्या वचनाची अनेकदा प्रचिती आल्यामुळे वेडंवाकडं वागण्याची अवज्ञा ज्याच्याकडून होत नाही.. तो असतो स्वामीभक्त..

स्वामी हो .. अशी जातायेता आर्त हाक मारतो.. आणि त्या हाकेतून आपल्या अंतर्यामीचे सर्व भाव त्यांच्या पर्यंत पोहोचवतो.. तो असतो स्वामीभक्त🙏

Address

Akalkot

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category