02/09/2019
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
-कुसुमाग्रज
खरोखर आज या लहानपणी च्या कवितेची आठवण होत आहे आज आपल्या महाराष्ट्रात या कवितेतील नदी सारखेच रुद्रावतार कृष्णा आणि वारणा नदीने घेतला आणि सर्व #सांगली_सातारा_कोल्हापूर जिल्हे पुराच्या पाण्यात वाहून गेले मागील आठवड्यात संपुर्ण #आधारस्तंभ_फौंडेशन टीम तेथे जाऊन आपल्या बांधवांना ीचा_हात म्हणून जीवनावश्यक वस्तू कपडे व इतर समान घेऊन गेलो आणि या बांधवांशी संवाद साधला त्यांची सध्याची स्थिती समजून घेतली यावेळेस आम्हाला #दुधगाव #मोरगाव #सांगली #कसबेडीग्रस #कोल्हापूर #शिरटी आणि अन्य छोटे छोटे वस्ती कसबे मिळाले अश्या लोकांना मदत कार्य करण्याची संधी या वर्षी पुन्हा मिळाली.