05/09/2025
125 वर्षांची अखंड परंपरा असलेला माजलगावचा महाराजा #श्री_टेबे_गणेश
महाराष्ट्रात गणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन होते.... मात्र माजलगाव येथील टेंबे गणपतीचे आगमन निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला होते..... अर्थातच याला कारणही तसेच आहे....!
तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे निजाम राजवटीत कोणताही सण साजरा करण्यासाठी रजाकारांची परवानगी लागत
असे.... गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या स्थापनेसाठी मंडळाच्या सदस्यांनी रजाकारांची परवानगी न घेता मिरवणूक काढली..... यावेळी ही मिरवणूक मशीद
चौकात अडविण्यात आली व त्यांना गणपती बाप्पाच्या स्थापनेचा परवाना निजाम सरकारकडून मागितला गेला.... परंतु या मंडळाकडे परवाना नसल्याने काही तत्कालीन सदस्य परवाना आणण्यासाठी घोड्यावरुन हैदराबादला गेले.... कारण त्याकाळी वाहनांची सोय नव्हती.... व तिथून ताम्रपटावर गणपती स्थापनेची परवानगी त्यांनी आणली....!
पण तोपर्यंत म्हणजे हैदराबादला जाण्या-येण्यात तीन-चार दिवस निघून गेले.... यामुळे भाद्रपद एकादशीला या गणपतीची स्थापना करण्यात आली व याचे विसर्जन प्रतिपदेला करण्यात येऊ लागले... त्यामुळे
कधी पाच तर कधी सहा दिवसांचा हा गणपती बसविण्यात येतो....!
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की " श्री टेंबे गणेश " हे असे नाव कसे काय पडले....??
गणपतीची स्थापना करण्यात आल्यानंतर... एका महिलेने संतती होत नसल्यामुळे या गणपतीला नवस करुन.... माझ्या वंशाला दिवा मिळाल्यास गणपतीसमोर टेंबा लावील.... अशा प्रकारचा नवस केला व तिला एका वर्षातच मूल झाले.... तिने आपला नवस फेडण्यासाठी गणपतीला टेंबा अर्पण केला.... तेंव्हापासून या गणपतीस
नवसाला पावणारा " टेंबे गणपती " असे नाव पडले आहे.... नवसपूर्ती झालेले असंख्य भावीक या गणपतीच्या मिरवणूकीमध्ये हातात टेंबे घेउन सहभागी होतात.....!
महाराष्ट्रातील या आगळ्यावेगळ्या व नवसाला पावणाऱ्या टेंबे गणपतीने 125 वर्षांपासून चालत आलेल्या " इको फ्रेंडली "ची संकल्पना चालू ठेवली आहे..... या गणेश मंडळाने ७ ते ८ फुटाची मूर्ती शेणा, मातीपासून बनविली आहे..... या श्री टेंबे गणेशाचे येत्या मंगळवारी विसर्जन होणार
होणार...!
नवसाला पावणाऱ्या , 125 वर्षांची अखंड परंपरा असलेला व माजलगावचा महाराजा असलेल्या या श्री टेंबे गणेश मंडळाला एक वेळेस आवश्य भेट द्या....!!