Hindu Veershaiv Lingayat Manch, Maha. हिंदू वीरशैव लिंगायत मंच,महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Pune
  • Hindu Veershaiv Lingayat Manch, Maha. हिंदू वीरशैव लिंगायत मंच,महाराष्ट्र

Hindu Veershaiv Lingayat Manch, Maha.  हिंदू वीरशैव लिंगायत मंच,महाराष्ट्र होय आम्ही सर्व वीरशैव लिंगायत हिंदूच!
ಹೌದು, ನಾವು ಎಲ್ಲರೂ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಹಿಂದುಗಳು !

समस्त वीरशैव लिंगायत समाजाला जाहीर विनम्र आवाहन!
================================

आगामी राष्ट्रीय जनगणना २०२३ च्या निमित्ताने भारतमातेचा पुत्ररूप समाज असलेल्या हिंदू वीरशैव लिंगायत समाजाने नेमकी काय भूमिका घ्यावी याचे सुस्पष्ट विवेचन करणारे आवाहन आम्ही सदरच्या पत्राद्वारे करत आहोत.

येत्या जनगणनेत, अनेक समाज समूहांना स्वतःच्या हिंदू असण्याचा विसर पडावा, यासाठी काही परक्या विचारांवर पोसलेल्या शक्त

ींकडून जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत. विविधतेतून एकता साधणाऱ्या भारतीय समाज समूहातील वैविध्यतेच्या मुद्यांना विद्रोहाचे साधन बनवणारा बुध्दिभेद सर्वदूर पसरवला जात आहे. हिंदू वीरशैव लिंगायत समाजातील काही गटांचे नेते अशा प्रकारच्या बुद्धिभेदाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे समस्त वीरशैव लिंगायत समाज सध्या दोन प्रकारच्या अग्निदिव्यातून वाटचाल करत आहे. एका बाजूला 'वीरशैव' आणि 'लिंगायत' हे वेगळे आहेत, असे सांगून शब्दभेद करून समाजात उभी फाळणी घडवण्याचे पाताळयंत्री कारस्थान आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्राच्या मूळ प्रवाहापासून वीरशैव लिंगायत समाजाचा मोठा हिस्सा 'स्वतंत्र धर्म' म्हणून बाजूला काढण्याचे राष्ट्रविघातक षडयंत्र.

केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा १३ जून २०१४ रोजीचा अभिप्राय राज्य शासनास पाठवला आहे. त्यात लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचे नमूद केले आहे. तसेच महारजिस्ट्रार (गृह मंत्रालय, केंद्र सरकार) यांनी १४ नोव्हेंबर २०१३ च्या पत्रान्वये लिंगायत हा हिंदू धर्माचा पंथ असल्याने,

२०२२ च्या जनगणनेनुसार लिंगायत समाजाची स्वतंत्र नोंद घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा व अल्पसंख्याक दर्जा देणे अनुज्ञेय नाही, असे राज्य सरकारनेही म्हटले आहे.

भारतीय राज्यघटनेत नवीन धर्म जन्माला घालण्याची किंवा कोणत्याही धर्माच्या अंतरंगात हस्तक्षेप करण्याची तरतूद मुळीच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते २०११ पर्यंतच्या जनगणनेपर्यंत हिंदू वीरशैव लिंगायत समाजाने स्वत:चा धर्म नोंदवताना 'हिंदू' असाच नोंदवला आहे. हिंदू वीरशैव लिंगायत समाजाच्या पूर्वजांनीसुद्धा, त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक जनगणनेच्या वेळी स्वतःची नोंद हिंदू अशीच केलेली आहे. वर्षानुवर्षे वीरशैव लिंगायत समाज स्वत:ची नोंद हिंदू अशी करत आला असताना या समाजाला विशिष्ट भूलथापांच्या जंजाळात अडकवून वा समाजाची खरी ओळख मिटवू पाहणारे राष्ट्रविघातक प्रयत्न हाणून पाडण्याची निश्चित वेळ आता आली आहे.

या जनगणनेतसुद्धा समस्त वीरशैव लिंगायत समाज 'हिंदू' म्हणून स्वत:ची नोंद करण्याचा ऐतिहासिक परिपाठ दृढतापूर्वक आचरणात आणेल, याविषयी शंका नाही. हिंदू वीरशैव लिंगायत मंच या पत्रकाद्वारे आवाहन करत आहे की, आगामी जनगणना २०२२ च्या निमित्ताने प्रत्येक वीरशैव लिंगायत व्यक्तीने हिंदू धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद करावी आणि स्वत:च्या राष्ट्रभक्तीचा परिचय द्यावा.

समाजभक्ती हीच प्रेरणा, राष्ट्रभक्ती हे रूप तिचे । देशद्रोही निष्प्रभ होतील, दर्शन घडता शक्तीचे ।।

डॉ. शामा घोणसे शरद गंजीवाले डॉ. राजेंद्र हिरेमठ
(प्रांत मार्गदर्शिका) (प्रांत संयोजक) (प्रांत मार्गदर्शक)

🚩हिंदू वीरशैव लिंगायत मंच 🚩
(महाराष्ट्र प्रांत)

स्वतंत्र धर्म आंदोलन, सामाजिक विभाजन आणि राष्ट्रएकात्मतेपुढील आव्हानभारत हा हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, अध्यात्म आ...
29/05/2026

स्वतंत्र धर्म आंदोलन, सामाजिक विभाजन आणि राष्ट्रएकात्मतेपुढील आव्हान
भारत हा हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, अध्यात्म आणि विविधतेतून निर्माण झालेला एक प्राचीन राष्ट्रभाव असलेला देश आहे. येथे अनेक पंथ, परंपरा, साधना पद्धती आणि सामाजिक प्रवाह उदयास आले; पण या सर्वांचा मूलाधार भारतीय संस्कृती आणि व्यापक हिंदू सभ्यता हाच राहिला. शैव, वैष्णव, नाथ, वारकरी, लिंगायत, आर्यसमाज, भक्ती परंपरा, वेदांत, तंत्र, सिद्ध, महानुभाव — या सर्व प्रवाहांनी मतभिन्नता असूनही भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेला तडा जाऊ दिला नाही.
परंतु गेल्या काही दशकांत विविध समाजांमध्ये “स्वतंत्र धर्म” म्हणून वेगळी ओळख निर्माण करण्याची चळवळ वाढताना दिसत आहे. विशेषतः स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलन, तसेच इतर काही समाजांतील स्वतंत्र धार्मिक ओळखीच्या मागण्या, या केवळ धार्मिक प्रश्न राहत नाहीत; त्या सामाजिक आणि राष्ट्रीय परिणाम घडविणाऱ्या ठरतात. समाजाला वेगळे धार्मिक अस्तित्व देण्याचा आग्रह वाढला, तर त्याचा परिणाम हिंदू समाजाच्या एकात्मतेवर आणि पर्यायाने राष्ट्राच्या सामूहिक ओळखीवर होऊ शकतो.
लिंगायत समाजाचा इतिहास पाहिला तर तो भारतीय शैव परंपरेशी जोडलेला आहे. Basaveshwara यांनी कर्मकांड, जातिभेद आणि सामाजिक विषमता यांवर प्रहार केला; पण त्यांनी भारतीय अध्यात्म किंवा शिवतत्त्व नाकारले नाही. त्यांच्या वचनांमध्ये “कूडलसंगमदेव”, “महादेव”, “शिवयोग” यांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. वीरशैव-लिंगायत परंपरेने समाजसुधारणा केली, पण भारतीय संस्कृतीपासून पूर्णतः वेगळे अस्तित्व मांडले नाही. त्यामुळे आधुनिक काळात राजकीय किंवा प्रशासकीय कारणांसाठी “स्वतंत्र धर्म” ही संकल्पना पुढे आली, तेव्हा समाजात मोठी वैचारिक फूट निर्माण झाली.
या प्रकारच्या आंदोलनांचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे हिंदू समाजाची संख्या, एकता आणि सामूहिक राजकीय-सामाजिक ताकद कमी होणे. भारतात हिंदू समाज आधीच भाषा, जात, प्रांत आणि परंपरांमध्ये विभागलेला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक उपसंप्रदाय किंवा परंपरा स्वतंत्र धार्मिक ओळख घेऊ लागली, तर व्यापक हिंदू समाज अधिक तुकड्यांत विभागला जाईल. यामुळे समाजातील परस्पर ऐक्य कमकुवत होईल आणि सामूहिक प्रश्नांवर एकत्रित भूमिका घेणे कठीण बनेल.
इतिहासात “फोडा आणि राज्य करा” ही नीती अनेक परकीय सत्तांनी वापरली. Partition of India हा त्याच विभाजनकारी राजकारणाचा सर्वात मोठा परिणाम मानला जातो. जेव्हा धार्मिक आणि सामाजिक ओळखी राष्ट्रीय ओळखीपेक्षा मोठ्या बनतात, तेव्हा संघर्ष आणि विभाजन निर्माण होतात. त्यामुळे कोणतीही वेगळी धार्मिक चळवळ केवळ एका समाजापुरती मर्यादित राहत नाही; तिचे दीर्घकालीन परिणाम राष्ट्रीय एकात्मतेवरही होतात.
आज अनेक स्वतंत्र धर्म आंदोलनांमध्ये सामाजिक प्रश्नांपेक्षा राजकीय गणित अधिक दिसून येते. अल्पसंख्यांक दर्जा, स्वतंत्र संस्था नियंत्रण, शैक्षणिक अधिकार किंवा वेगळे राजकीय प्रतिनिधित्व यांसाठी समाजांना स्वतंत्र धार्मिक ओळख देण्याची मागणी केली जाते. पण याचा फायदा संपूर्ण समाजाला होतोच असे नाही. अनेकदा त्याचा लाभ काही संस्था, नेते किंवा राजकीय गटांपुरताच मर्यादित राहतो; मात्र समाजामध्ये कायमस्वरूपी वैचारिक फूट निर्माण होते.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे; पण त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्यही अधोरेखित केले आहे. भारताची शक्ती ही “अनेकतेतील ऐक्य” यात आहे. जर प्रत्येक समाजाने “आम्ही वेगळे” ही भूमिका स्वीकारली, तर पुढे जाती, पंथ, उपपंथ आणि प्रादेशिक गट यांच्या असंख्य स्वतंत्र ओळखी निर्माण होतील. अशा परिस्थितीत राष्ट्रीय ओळख दुबळी होईल आणि समाजात स्पर्धात्मक अस्मितांचे राजकारण वाढेल.
आज गरज आहे ती समाजसुधारणेची, शिक्षणाची, आर्थिक प्रगतीची आणि सामाजिक समतेची — वेगळेपणाच्या राजकारणाची नाही. कोणतीही परंपरा, पंथ किंवा समाज हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, ही भावना मजबूत होणे आवश्यक आहे. स्वतःची परंपरा जपत असताना व्यापक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवणे, हेच भारताच्या भविष्यासाठी आवश्यक आहे.
राष्ट्र हे केवळ राजकीय सीमा नसते; ते सांस्कृतिक सातत्य, सामूहिक स्मृती आणि एकत्र राहण्याच्या इच्छेवर उभे असते. म्हणूनच स्वतंत्र धर्माच्या नावाखाली समाजामध्ये भिंती उभ्या करण्याऐवजी परस्पर ऐक्य, सांस्कृतिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे, ही काळाची गरज आहे.

29/05/2026

कुटुंबाची धार्मिक, कायदेशीर शासकीय नोंद हिंदू म्हणून गणली.म्हणून प्रत्येक पिढीत शैक्षणिक, सामाजिक आरक्षण अबाधित, लाभदायक ठरले!

29/05/2026

शासकीय दस्तात नांव,तारखा जरी चुकल्या किती पुढे मनस्ताप होतो. जनगनणेत हिंदू न लिहल्यास काय परिणाम होतील!याची जबाबदारी कोणं घेणार?

जातीयवादी झुरळांनो, वीरशैव लिंगायताना मूर्ख समजता की काय?  7व्या शतकापासून इस्लामी आक्रमकाने प्रयत्न केले, इंग्रजांनी फू...
26/05/2026

जातीयवादी झुरळांनो,
वीरशैव लिंगायताना मूर्ख समजता की काय?
7व्या शतकापासून इस्लामी आक्रमकाने प्रयत्न केले, इंग्रजांनी फूट पाडून प्रयत्न केले, धर्म विचारून गोळ्या घातल्या तरी आमच्या बापजाद्यानी स्वतःची हिंदू ओळख पुसू दिली नाही. शिवभक्तीचा दिखावा करणाऱ्या जातीयवादी झूरळांनो या रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरात समोरचा हा नंदी आजही याची साक्ष देऊन सांगतोय, वीरशैव लिंगायत समाजाला स्वतःची ओळख शासकीय कागदावर काय द्यायची.
============

#कार्यकर्ताप्रशिक्षण #राष्ट्रीयजनगणना2027
#सकलहिंदु #वीरशैवलिंगायत

26/05/2026

🔶भारतभूमीत राहणारा प्रत्येक जण हिंदू - मुकुलजी कानेटकर

सोलापूरकरंचा निर्धार! होय आम्ही धर्माच्या कॉलम मध्ये  #हिंदू नोंद करणार. सकल वीरशैव लिंगायत समाज संविधानिक जबाबदारी म्हण...
25/05/2026

सोलापूरकरंचा निर्धार! होय आम्ही धर्माच्या कॉलम मध्ये #हिंदू नोंद करणार. सकल वीरशैव लिंगायत समाज संविधानिक जबाबदारी म्हणून समाज बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आरक्षण अबाधित ठेवणार.

#कार्यकर्ताप्रशिक्षण #राष्ट्रीयजनगनणा2027
#सकलहिंदु #वीरशैवलिंगायत

बघा, मागच्या पिढीने जे कृती केलेली असतेत्याचे वाईट परिणाम पुढच्या पिढीला भोगावं लागते. नेमकं या प्रकरणात पहा तो पीडित गय...
22/05/2026

बघा, मागच्या पिढीने जे कृती केलेली असते
त्याचे वाईट परिणाम पुढच्या पिढीला भोगावं
लागते. नेमकं या प्रकरणात पहा तो पीडित गयावया करत काय सांगतोय!

(कमेंट मधील बातमीतील चौकट वाचा!)

#राष्ट्रीयजनगणना2027
#सकलहिंदु #वीरशैवलिंगायत

शिवशरनार्थ 🙏🏼समाज बांधवानो! व्यक्त व्हा..     #राष्ट्रीयजनगणना2027  #सकलहिंदु  #वीरशैवलिंगायत
21/05/2026

शिवशरनार्थ 🙏🏼समाज बांधवानो! व्यक्त व्हा..

#राष्ट्रीयजनगणना2027
#सकलहिंदु #वीरशैवलिंगायत

काय म्हणता समाज बांधवानो! व्यक्त व्हा..     #राष्ट्रीयजनगणना2027  #सकलहिंदु  #वीरशैवलिंगायत
20/05/2026

काय म्हणता समाज बांधवानो! व्यक्त व्हा..

#राष्ट्रीयजनगणना2027
#सकलहिंदु #वीरशैवलिंगायत

20/05/2026

"आधी धर्म म्हणून हिंदू मग जात म्हणून लिंगायत..
- पंचमसाली पीठ जगद्गुरू श्री वचनानंद महास्वामी
==============
'लिंगायत हे हिंदू नाही' या धर्मविरोधी चळवळीवर वचनानंद महास्वामी यांची कडाडून टीका.
हिंदू आमचा धर्म तर लिंगायत ही परंपरा असल्याचे स्पष्टोच्चार केला. महात्मा बसवेश्र्वरांनी माणसं जोडण्याचे काम केले, हिंदू म्हणून एक राहाल तर सुरक्षित राहाल, असेही महास्वामी म्हणाले.


#राष्ट्रीयजनगणना2027
#सकलहिंदु #वीरशैवलिंगायत
Shwaasa Guru Panchamasali Jagadguru Peetha,Harihar

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 12am
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindu Veershaiv Lingayat Manch, Maha. हिंदू वीरशैव लिंगायत मंच,महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Hindu Veershaiv Lingayat Manch, Maha. हिंदू वीरशैव लिंगायत मंच,महाराष्ट्र:

Share